कोल्ही प्रकल्पातील अवैध पाणी उपसा अद्यापही थांबेना:केवळ 33% साठा, खंडाळा परिसरातील विहिरींनी देखील गाठला तळ
वैजापूर तालुक्यातील खंडाळा, कोल्ही, सुदामवाडी, आलापुरवाडी, शिवूर या गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्ही येथील मध्य प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीत वाढत्या उष्णतेमुळे झपाट्याने घट होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच अवैधरित्या होत असलेल्या पाणीउपशामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या कोल्ही प्रकल्पात अवघा ३३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सदरील गावांचा पिण्याच्या…