Headlines

Admin

खरातच्या कार्यालयात एसआयटी, ईडीची झडती:कारवाईत बंद पाकिटांमधील पुरावे, बॅगा भरून महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात

भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्यावर सक्तवसुली संचालनालयाने आपला फास अधिक घट्ट केला आहे. कॅनडा कॉर्नर परिसरातील खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर’ या कार्यालयावर शुक्रवारी ईडी आणि एसआयटीच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या मॅरेथॉन झाडाझडतीनंतर पथकाने कार्यालयातून महत्त्वपूर्ण दस्तऐवज आणि बंद पाकिटांमधील पुरावे बॅगा भरून जप्त केले आहेत. दुपारी १२…

Read More

नेवाशामध्ये 7 महिन्यांत पाइपलाइनवर 40 लाख खर्च, तरीही 7 दिवसांनी पाणी!

नेवासे नगरपंचायतीचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव, मुख्याधिकाऱ्यांची मनमानी आणि पाइपलाइन दुरुस्तीच्या नावाखाली झालेला लाखांचा कथित खर्च यावरून नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी धाव घेतली आहे. “नगरपंचायतीत नक्की चाललंय काय?” असा सवाल करत संतप्त नगरसेवकांनी जिल्हा सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) हराळ यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली. विरोधी नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे…

Read More

आरोग्य शिबिराच्या माध्यमातून‎जपली सामाजिक बांधिलकी‎:शहरात संत गोरोबा काका समाधी सोहळा उत्साहात, नागरिकांचा सहभाग

शहरातील कुंभार गल्ली येथे संत गोरोबा काका समाधी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त आरोग्य शिबीर घेण्यात आले. स्थानिक नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच विविध…

Read More

घराघरातील मोबाइलमुळे लहान मुलांचे बालपणही हिरावले गेले:आईवडिलांनी मुलांना वेळ दिलाच पाहिजे, राधाकृष्ण महाराज यांचे प्रतिपादन‎

घराघरात आलेल्या मोबाइलने बालकांचे बालपण हिरावून घेतले आहे. आजच्या काळातील उपलब्ध सुख साधनांचा कसा आणि किती प्रमाणात वापर करायचा हे कळले पाहिजे. बालमनावर सुसंस्कार करण्यासाठी मातापित्यांनी वेळ दिलाच पाहिजे.‌ करिअरच्या मागे धावताना उत्तम जगण्याचा आनंद घेणे राहून गेले, असे व्हायला नको. ज्या घरात महिला आनंदी असतात त्याच घरात धनाचा वर्षाव होतो. घरातील सर्वांनी एक-दुसऱ्यांच्या सुखाचा…

Read More

बेदाण्यासह शेतकऱ्यांच्या स्वप्नांचाही चिखल:मुंगशी परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, 7 ते 8 टन बेदाणा मातीमोल‎

बार्शी तालुक्यातील मुंगशी व परिसरातील दहिटणे, सासुरे, राळेरास, तडवळे, यावली, इर्लेवाडी आदी गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या अस्मानी संकटामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून, हातातोंडाशी आलेल्या बेदाण्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. वर्षभर पोटच्या लेकराप्रमाणे जोपासलेल्या द्राक्ष बागेवर एका क्षणात पाणी फेरले गेल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. मुंगशी येथील शेतकरी…

Read More

अखेर 18 वर्षीय तरुणी गेली तरी कुठे?:हात हवेत वर करत कुणीतरी खेचून नेल्यासारखी एकटीच चालत गेली; चक्रावून टाकणारी घटना

धुळे शहरातील एक 18 वर्षीय तरुणी हवेत हात वर करत म्हणजे कुणीतरी हाताला धरू नेल्यासारखे अचानक बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ही तरुणी अत्यंत गुढपणे चालत जात असल्याची दिसून येत आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, संजीवनी राहुल वराडे असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती धुळ्यातील…

Read More

हळदवाडी साठवण तलावामुळे 298 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार:दोन गावांची तहान भागणार, मे अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

हिंगोली तालुक्यातील हळदवाडी साठवण तलावाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु झाले असून कामाला गती आली आहे. या तलावात 1.646 दशलक्ष घनमीटर पाणीसठा होणार असून त्यातून दोन गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. या शिवाय 298 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. तलावाच्या कामाची शनिवारी ता. 18 आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी…

Read More

उजनी लाभक्षेत्रात चोरट्यांचा धुमाकूळ:पोलिस निष्क्रिय, बळीराजा आक्रमक‎, पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी‎

वाशिंबे4 तासांपूर्वी कॉपी लिंक वाशिंबे उजनी लाभक्षेत्रात विद्युत पंपातील वायडींग तारा तसेच विद्युत पंप चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उंदरगाव व सोगाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी विद्युत पंपाच्या आतील वायडींग तारा तसेच Source link

Read More

Women protest at Mahavitaran to remove 33 KV line

मोहोळ शहरातील बागवान नगर आणि अहिल्यानगर परिसरात घरावरील ३३ केव्ही विद्युत वाहिनीचा शॉक लागून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि महिलांनी मंगळवारी (१६ एप्रिल) महावितरणच्या कार्यालयावर धडक देत सकाळपासून ठ . दि. १५ एप्रिल रोजी बागवान नगरमधील लक्ष्मी विजय आदलिंगे (वय ३२) या यात्रेनिमित्त घराच्या स्लॅबवर स्वच्छता करत…

Read More

महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक 54 मतांनी नामंजूर:पास होण्यासाठी 352 मते हवी होती, मिळाली 298; मोदी सरकार विधेयक मंजूर करण्यात पहिल्यांदाच अपयशी

महिला आरक्षणाशी संबंधित संविधानाचे 131 वे दुरुस्ती विधेयक सरकार लोकसभेत मंजूर करू शकले नाही. यात संसदेच्या 543 जागा वाढवून 850 करण्याचा प्रस्ताव होता. लोकसभेत विधेयकावर 21 तास चर्चा झाल्यानंतर मतदान झाले. उपस्थित 528 खासदारांनी मतदान केले. बाजूने 298, विरोधात 230 मते पडली. विधेयक मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती. 528 चे दोन तृतीयांश 352…

Read More