Headlines

Admin

'घराबाहेर पडू नका, पर्यटन टाळा!':मुंबईत पावसाचा कहर, परिस्थिती किती भयंकर? पाहा PHOTOS आणि VIDEO

राज्यासह मुंबई आणि पुण्यात पावसाने रौद्ररूप धारण केले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पावसाचा हा हाहाकार पाहता आजचा दिवस राज्यासाठी अत्यंत धोक्याचा असून, दुपारनंतर ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा धडकी भरवणारा अलर्ट प्रशासनाने जारी केला आहे. अतिवृष्टीमुळे…

Read More

चांदी ₹2,046 ने घसरून ₹2.32 किलोवर आली:सोनंही ₹832 स्वस्त, ₹1.46 लाखांना 10 ग्रॅम; कॅरेटनुसार किंमत पाहा

सोन्या-चांदीच्या दरात आज 6 जुलै रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 832 रुपयांनी घसरून 1.46 लाख रुपयांवर आले आहे. तर, एक किलो चांदी 2,046 रुपयांनी घसरून 2.32 लाख रुपयांवर आली आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत स्रोत: goodreturns 6 जुलै 2026 यावर्षी…

Read More

आषाढी वारीवर पावसाचे संकट:आळंदीत येऊ नका, वारकऱ्यांना प्रशासनाचे तातडीचे आवाहन; पुणे-मुंबई एसटी सेवा बंद, धरणांत वाढू लागला पाणीसाठा

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून कोकण, मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि घाटमाथा भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडत महापुराचे रूप धारण केले आहे. नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेल्यामुळे आळंदीचा संपर्क तुटला असून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांना आळंदीत न येण्याचे कडक…

Read More

मुंबईसह राज्यात अतिवृष्टीचा कहर:रेड अलर्टनंतर 'वर्क फ्रॉम होम', सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे, 5 जिल्ह्यांत शाळा-बंद, एसटी सेवा स्थगित

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, नाशिकसह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक रस्ते, पूल आणि महामार्ग बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासह काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने…

Read More

पावसाचा रेड अलर्ट अन् मुंबई-पुणे मार्ग ठप्प:दरड कोसळल्याने वाहतूक स्थगित; मंत्री गिरीश महाजन म्हणाले- पर्यटनाचा मोह टाळा

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली असून, मुंबईत पर्यटनासाठी येऊ नका, अन्यथा सक्तीची पावले उचलावी लागतील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. मुंबई-पुणे…

Read More

Devendra Fadnavis Speech in Assembly Over Pune Mumbai Rain Incidents

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज विधानसभेचे कामकाज तातडीने स्थगित करण्यात आले आहे. हवामानाच्या अत्यंत गंभीर आणि रौद्र परिस्थितीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुंबईतील वि . याचबरोबर “आज दुपारनंतर वाऱ्याचा वेग प्रचंड वाढणार असून ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी…

Read More

मुंबईसह राज्यातील पावसाच्या दुर्घटनांची उच्चस्तरीय चौकशी करा:दोषींवर कठोर कारवाईची विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची मागणी

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह अनेक भागांत घडलेल्या दुर्घटनांमध्ये निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचा मुद्दा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी विधानसभेत उपस्थित केला. या सर्व घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी आणि यंत्रणांची जबाबदारी निश्चित करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी सरकारकडे केली. मुंबईतील दुर्घटनांवर सरकारला धारेवर विधानसभेचे…

Read More

'आवाज दाबण्यासाठी जॅमर लावले, पण सरकारला कानठळ्या बसणारच!':पेपरफुटीविरोधात रोहित पवार अन् अभिजित दिपकेंचा संभाजीनगरात एल्गार

राज्यात आणि देशात उघडकीस आलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणांवरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याच अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती’च्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आणि विद्यार्थी नेते अभिजित दिपके यांनी थेट मैदानात…

Read More

जोधपूरमध्ये आज कवी शैलेश लोढा यांच्या मुलीचे लग्न:संगीत कार्यक्रमात बॉलिवूड गाण्यांवर नृत्य, कुटुंबाने येथे फोटोशूटही केले

कवी आणि अभिनेता शैलेश लोढा यांची कन्या स्वरा लोढा सोमवारी जोधपूरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये सप्तपदी घेणार आहेत. रविवार (5 जुलै) रोजी आयटीसीच्या वेलकम हॉटेलमध्ये संगीत कार्यक्रम पार पडला. गायक सुदेश भोसले यांच्या गाण्यांवर कवी, त्यांची पत्नी आणि मुलीनेही खूप डान्स केला. यापूर्वी उमेद भवनमध्ये मेहंदीचा कार्यक्रम झाला. कुटुंबाने येथे फोटोशूटही करून घेतले. आज होणाऱ्या विवाह…

Read More

मुंबई-गोवा महामार्गावर संकट आणखी गडद:कशेडी बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली; 24 तासांपासून वाहतूक ठप्प, हजारो प्रवासी अडकले

राज्यभर मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून कोकणातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रायगड, रत्नागिरी आणि चिपळूणसह अनेक भागांत नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याचदरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा मोठी दुर्घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी बोगद्याजवळ खवटी परिसरात दगड-मातीचा प्रचंड ढिगारा महामार्गावर कोसळल्याने दोन्ही मार्गिका पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी गेल्या तब्बल…

Read More