Headlines

Admin

मुंबई-गोवा महामार्गावर संकट आणखी गडद:कशेडी बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली; 24 तासांपासून वाहतूक ठप्प, हजारो प्रवासी अडकले

राज्यभर मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून कोकणातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रायगड, रत्नागिरी आणि चिपळूणसह अनेक भागांत नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याचदरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा मोठी दुर्घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी बोगद्याजवळ खवटी परिसरात दगड-मातीचा प्रचंड ढिगारा महामार्गावर कोसळल्याने दोन्ही मार्गिका पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी गेल्या तब्बल…

Read More

Ayodhya Ram Mandir Donation Theft Cover-Up; Champat Rai & Anil Mishra Under Scrutiny

Marathi News National Ayodhya Ram Mandir Donation Theft Cover Up; Champat Rai & Anil Mishra Under Scrutiny उत्तर प्रदेश27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि सदस्य डॉ. अनिल मिश्रा अद्याप पोलिस कारवाईतून बाहेर आहेत. अशा परिस्थितीत एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे, तो…

Read More

घरी बोलावून बॉयफ्रेंडची हत्या, कुऱ्हाडीने मान कापली:फरीदकोटमध्ये हात-पाय आणि तोंड बांधले; वडील पंजाब पोलिसात हेड कॉन्स्टेबल

फरीदकोटमध्ये प्रियकराला घरी बोलावून त्याची हत्या करण्यात आली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, महिलेने त्याला भेटण्यासाठी बोलावले होते, परंतु महिलेचा पती, भाऊ आणि तिने मिळून तरुणाचे हात-पाय आणि तोंड बांधले. त्यानंतर कुऱ्हाडीने त्याची मान कापली. मृताची ओळख धारा सिंग कॉलनी येथील रहिवासी अर्शदीप सिंग (26) अशी झाली आहे. तो मूळचा हसनभट्टी गावाचा रहिवासी होता. वडील हरनेक सिंग यांनी…

Read More

आमिर-गौरीचे लग्न; इनसाइड फोटो:मुलांनी अंगठ्या दिल्या, पत्नीच्या हाताचे चुंबन घेतले, माजी पत्नी किरण-रीना पोहोचल्या नाहीत

बॉलिवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी 5 जुलै रोजी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी लग्न केले आहे. हे लग्न आमिरच्या घरी झाले, ज्यात केवळ कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. विशेष म्हणजे आमिरच्या मागील 2 लग्नांमधील मुले इरा, जुनैद आणि आझाद लग्नाला उपस्थित होते, मात्र प्रत्येक खास कार्यक्रमात सोबत असणाऱ्या त्यांच्या दोन्ही माजी पत्नी रीना…

Read More

पहिल्याच पावसात 'मिसिंग लिंक'ची पोलखोल?:स्लॅब कोसळताच रोहित पवारांसह विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी नव्या मार्गावर खड्डे पडल्याची चर्चा सुरू असतानाच, सोमवारी पहाटे मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटजवळ स्लॅबचा काही भाग कोसळला. डोंगरावरील माती आणि पाण्याचा मोठा लोंढा रस्त्यावर आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका…

Read More

Dr Shyama Prasad Mukherjee 125th Jayanti: Nation, Education & Democracy

नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची सोमवारी १२५ वी जयंती आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, २०१९ मध्ये कलम ३७० आणि ३५ए रद्द करणे ही त्यांच्या बलिदानाला सर्वात मोठी श्रद्धांजली होती. ते म्हणाले की, मुखर्जी यांनी जम्मू-काश्मीरच्या भारतात पूर्ण एकीकरणासाठी संघर्ष केला आणि याच आंदोलनादरम्यान १९५३…

Read More

आळंदीत इंद्रायणीचा रौद्रावतार!:नदीवरील चारही पूल पाण्याखाली; अडीचशे वारकऱ्यांची सुटका, पालखी सोहळ्यापूर्वी प्रशासन अलर्ट

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पुणे जिल्ह्यालाही बसत असून आळंदीत इंद्रायणी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तसेच धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेले असून प्रशासनाने ते वाहतुकीसाठी बंद केले…

Read More

चंपात राय-अनिल मिश्रा षडयंत्र रचल्याचे आरोपी बनतील का?:राम मंदिरात चोरीची गोष्ट लपवली, नाकाखाली दरोडा पडत राहिला

अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि सदस्य डॉ. अनिल मिश्रा अद्याप पोलीस कारवाईतून बाहेर आहेत. अशा परिस्थितीत मोठा प्रश्न- हे दोघे गुन्हेगार नाहीत का? कायद्याच्या जाणकारांनुसार, या दोघांवर दोन आरोप लागतात. पाहिला- गुन्हा लपवण्याचा. दुसरा- महासचिव, विश्वस्त यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर असताना, त्यांच्या नाकाखाली देणगी चोरी झाल्याची…

Read More

कर टाळण्यासाठी खासगी जागेमध्ये अनधिकृत पत्राशेड बांधून व्यवसाय:2 हजारांवर विनापरवाना पत्रा शेड, मनपाकडून फक्त सर्वेक्षण, कारवाई नाही

अहिल्यानगर शहरात व विशेषतः उपनगर भागात मोकळ्या खासगी जागांवर पत्र्याचे मोठे शेड उभारून व्यावसायिक दुकाने, हॉटेल, शोरुम थाटण्याचे प्रकार वाढले आहेत. महापालिकेने काही वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल दोन हजारांहून अधिक अशी पत्र्याची शेड असल्याचे व यापैकी बहुतांश बांधकामे ही महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आल्याचे समोर आले होते. महापालिकेचा मालमत्ता कर व…

Read More

मानखुर्दमध्ये तीन मजली चाळ पत्त्यासारखी कोसळली:5 चिमुकल्यांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आणखी एक भीषण दुर्घटना घडली आहे. मानखुर्दमधील जनता नगर परिसरात रविवारी रात्री तीन मजली कच्च्या चाळीचा भाग अचानक कोसळल्याने पाच निष्पाप लहान मुले आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण जखमी झाला आहे. ही चाळ धोकादायक असल्याने रहिवासी घरातील सामान बाहेर काढत असतानाच अचानक संपूर्ण बांधकाम…

Read More