सातारकरांना मोठा दिलासा:कास धरण सांडव्यावरून वाहू लागले, वर्षभराच्या पाणीपुरवठ्याची चिंता दूर
सातारा शहरासाठी जीवनदायी ठरणारे कास धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोमवारी मध्यरात्री धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे सातारा शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनच्या दमदार पुनरागमनानंतर कास परिसरात सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा थेट परिणाम…