Headlines

नीलम गोऱ्हेंना पुन्हा उमेदवारी नको!:पुणे शिवसेना महिला आघाडीचा एकनाथ शिंदेंना 'लेटर बॉम्ब'; पत्रात गंभीर आरोप

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांपैकी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने शिवसेनेकडून कुणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडीने उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

शिकाऊ उमेदवारांसाठी आता ‘महाचतुर एआय चॅटबॉट‘:कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता, मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार

राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा ‘महाचतुर एआय चॅटबॉट‘ हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. या चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता…

Read More

विज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीची कामे सकाळच्या वेळीच पूर्ण केली जाणार:वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता विज कंपनीचा निर्णय

मराठवाड्यात विज कंपनीच्या वतीन मान्सूनपुर्व कामे आता सकाळी सात ते आकरा यावेळेतच केली जाणार आहेत. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या तडाख्यात कर्मचाऱ्यांचा बचाव होणार असून नागरीकांनाही दुपारच्या वेळी सुरळीत विज पुरवठ्यामुळे दिलासा मिळणार आहे. मराठवाड्यात विज कंपनीकडून मागील काही दिवसांपासून मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. पावसाळ्यात वारंवार विज पुरवठा खंडीत होऊ नये या उद्देशाने हि…

Read More

पद्म पुरस्कारांच्या शिफारस समितीमधून सांस्कृतिक मंत्र्यांना डच्चू:आशिष शेलार यांना वगळल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या नावांची पद्म पुरस्कार २०२७ साठी शिफारस करण्याकरिता शासनाने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. ही समिती पद्म पुरस्कारांसाठी विविध माध्यमातून प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन केंद्र शासनाकडे पाठविण्यासाठी योग्य मान्यवरांच्या नावांची शिफारस राज्य शासनास करेल. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. मात्र, या समितीमधून राज्याचे…

Read More

धीरेंद्र शास्त्रींविरोधात काँग्रेसचे अमरावतीत आंदोलन:शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक टिप्पणी केल्याने राजकमल चौकात निदर्शने

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात अमरावतीत काँग्रेसने तीव्र निदर्शने केली. रविवार, २६ एप्रिल रोजी राजकमल चौकात हे आंदोलन करण्यात आले, ज्यामुळे परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी…

Read More

Kalpanaraje Bhosale Angry on Maratha Empire Map Removal by NCERT

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी केंद्र सरकारविरुद्ध तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. “मराठा साम्राज्याचा नका . इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याच्या ‘NCERT’च्या निर्णयामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर कल्पनाराजे भोसले यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. NCERTच्या…

Read More

राजापेठेत व्यापारी संकुलाच्या जागेवर महापालिकेचा कचरा डेपो:हमरस्त्यावर दुर्गंधी; नागरिक, नगरसेवकांचा तीव्र विरोध

महापालिका प्रशासनाने राजापेठ येथे नवीन कचरा डेपो सुरू केला आहे. अमरावती शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या जागेवर व्यापारी संकुल उभारून पालिकेला उत्पन्नाचा नवा स्रोत मिळू शकला असता. मात्र, त्याच जागेवर कचरा डेपो सुरू केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा नवीन कचरा डेपो राजापेठ पोलीस ठाणे, मनपाचे व्यापारी संकुल आणि झोन कार्यालयाच्या अगदी…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान स्वप्नातही करू शकत नाही:कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो – धीरेंद्र शास्त्री

नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता माफीनामा सादर केला आहे. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, त्यांचा अवमान करण्याचा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही,” असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानामुळे दुखावलेल्या भावनांबद्दल माफी…

Read More

मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'ची एकनाथ शिंदेंकडून पाहणी:म्हणाले – 'हा एक तंत्रज्ञानाचा चमत्कार', 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

पुणे प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरणाऱ्या बोरघाटातील वाहतूक कोंडी आता कायमची इतिहासजमा होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून हा प्रकल्प तंत्रज्ञानाचा…

Read More

समृद्धी महामार्गावर स्कॉर्पियोचा भीषण अपघात:टायर फुटल्याने गाडी पलटली; गुजरातचे 5 प्रवासी जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाशिम जिल्ह्यांतर्गत कारंजाजवळ चॅनेल क्रमांक १६७ वर एका स्कार्पिओ गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील पाच प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हे सर्व प्रवासी गुजरात राज्यातील वापी येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या तापी-वापी भागातील…

Read More