Headlines

वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात:पुणे स्थानकाजवळ रेल्वे डबा रुळावरून घसरला; कोणतीही जीवितहानी नाही, सर्व प्रवासी सुखरुप

पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रेल्वे रुळावरून घसरला. CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22225) ही पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करत असताना सायंकाळी ७:३० वाजता डायमंड क्रॉसिंगवर चौथ्या डब्याची एक ट्रॉली घसरली. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनास्थळावरील व्हिडिओ… वंदे भारत ट्रेन रुळावरून घसरल्याची पहिलीच घटना पुणे स्थानकाच्या…

Read More

बागेश्वर बाबाच्या वक्तव्याविरोधात नांदगाव, चांदूरबाजारमध्ये आंदोलन:छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप; कडक कारवाईची मागणी

धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ ‘बागेश्वर बाबा’ यांच्या कथित अवमानकारक विधानांविरोधात काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून नांदगाव खंडेश्वर, चांदूरबाजार आणि अंजनगाव सुर्जी येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी तहसील कार्यालयांवर धडक देत बाबावर तात्काळ आणि कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली. नांदगाव खंडेश्वर येथील आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे…

Read More

विद्यापीठीय कर्मचारी 18 मे पासून आंदोलन करणार:प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शासनाविरुद्ध एल्गार

राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाविरुद्ध आंदोलनाची घोषणा केली आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे कर्मचारी १८ मे पासून साखळी आंदोलन सुरू करणार आहेत. ‘महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती’चे अध्यक्ष अजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जळगाव येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाकडे वारंवार निवेदने देण्यात…

Read More

भारतीय विद्यापीठ संघाची 100 वी वार्षिक सभा पुण्यात:राज्यपालांच्या हस्ते उद्या उद्घाटन; 400 कुलगुरू सहभागी होणार

भारतीय उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असलेल्या ‘भारतीय विद्यापीठ संघाची’ (AIU) १०० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद यंदा पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) या परिषदेचे यजमानपद भूषवत आहे. हा शैक्षणिक सोहळा २८ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत संपन्न होईल. १९२५ मध्ये स्थापन…

Read More

नीलम गोऱ्हेंना पुन्हा उमेदवारी नको!:पुणे शिवसेना महिला आघाडीचा एकनाथ शिंदेंना 'लेटर बॉम्ब'; पत्रात गंभीर आरोप

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांपैकी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने शिवसेनेकडून कुणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडीने उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

शिकाऊ उमेदवारांसाठी आता ‘महाचतुर एआय चॅटबॉट‘:कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता, मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार

राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा ‘महाचतुर एआय चॅटबॉट‘ हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. या चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता…

Read More

विज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीची कामे सकाळच्या वेळीच पूर्ण केली जाणार:वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता विज कंपनीचा निर्णय

मराठवाड्यात विज कंपनीच्या वतीन मान्सूनपुर्व कामे आता सकाळी सात ते आकरा यावेळेतच केली जाणार आहेत. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या तडाख्यात कर्मचाऱ्यांचा बचाव होणार असून नागरीकांनाही दुपारच्या वेळी सुरळीत विज पुरवठ्यामुळे दिलासा मिळणार आहे. मराठवाड्यात विज कंपनीकडून मागील काही दिवसांपासून मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. पावसाळ्यात वारंवार विज पुरवठा खंडीत होऊ नये या उद्देशाने हि…

Read More

पद्म पुरस्कारांच्या शिफारस समितीमधून सांस्कृतिक मंत्र्यांना डच्चू:आशिष शेलार यांना वगळल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या नावांची पद्म पुरस्कार २०२७ साठी शिफारस करण्याकरिता शासनाने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. ही समिती पद्म पुरस्कारांसाठी विविध माध्यमातून प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन केंद्र शासनाकडे पाठविण्यासाठी योग्य मान्यवरांच्या नावांची शिफारस राज्य शासनास करेल. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. मात्र, या समितीमधून राज्याचे…

Read More

धीरेंद्र शास्त्रींविरोधात काँग्रेसचे अमरावतीत आंदोलन:शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक टिप्पणी केल्याने राजकमल चौकात निदर्शने

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात अमरावतीत काँग्रेसने तीव्र निदर्शने केली. रविवार, २६ एप्रिल रोजी राजकमल चौकात हे आंदोलन करण्यात आले, ज्यामुळे परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी…

Read More

Kalpanaraje Bhosale Angry on Maratha Empire Map Removal by NCERT

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी केंद्र सरकारविरुद्ध तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. “मराठा साम्राज्याचा नका . इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याच्या ‘NCERT’च्या निर्णयामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर कल्पनाराजे भोसले यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. NCERTच्या…

Read More