Headlines

साताऱ्यात कृषी विभागाची मोठी कारवाई:वडूजमध्ये 30 लाखांचा बनावट खत-कीटकनाशकांचा साठा जप्त, बाप-लेक गजाआड

सातारा जिल्ह्यातील वडूज येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट रासायनिक खते व कीटकनाशकांचा तब्बल ₹30 लाख 60 हजार 520 किमतीचा साठा जप्त केला. या प्रकरणी दिलीप सीताराम काळे (वय 60) व प्रतिक दिलीप काळे (वय 34, दोघे रा. विठ्ठलनगर, वडूज जि. सातारा ) यांच्याविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

अर्धे तिकिट देण्याच्या कारणावरून वाहकाला मारहाण:9 जणांवर गुन्हा दाखल, हिंगोली आगाराचे कामकाज काही काळ विस्कळीत

हिंगोली येथील बसस्थानकामध्ये एका टोळक्याने अर्धे तिकीट देण्याच्या करणावरून वाहकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे आगाराचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले होते. या प्रकरणी नऊ जणांवर गुरुवारी ता. २ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तातडीने पथक स्थापन करून ८ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली आगाराची केंद्रा ते हिंगोली बस गोरेगाव…

Read More

'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' चित्रपटावरून रूपाली चाकणकर संतप्त:अभिनेत्री दिपाली सय्यदसह दिग्दर्शकांविरोधात नोटीस काढणार

नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. याच वादग्रस्त प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र, या चित्रपटावरून आता नवा राजकीय आणि कायदेशीर वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी या चित्रपटाच्या निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा थेट इशारा दिला आहे….

Read More

वाशिम न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!:कोठडीतील मृत्यू प्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; 15 वर्षांनंतर पारधी कुटुंबाला न्याय

वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला आहे. सन २०११ मध्ये पोलिस कोठडीत असताना झालेल्या अमानुष मारहाणीत एका संशयित तरुणाचा मृत्यू झाला होता. या ‘कस्टोडियल डेथ’ प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने तत्कालीन ठाणेदारासह तब्बल नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल…

Read More

बालभारतीच्या अभ्यासक्रमावरून पुन्हा नवा वाद:सहावीच्या मराठी पुस्तकातून महाराष्ट्राचीच लोकनृत्ये गायब; केवळ परराज्यांतील नृत्यांना स्थान

राज्यात एका बाजूला शालेय शिक्षणात ‘सीबीएसई’ पॅटर्न राबवण्यावर आणि मराठी भाषा सक्तीची करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, दुसरीकडे शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्र आणि मराठी भाषेच्या संदर्भात सातत्याने त्रुटी समोर येत आहेत. आता बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील एका धड्यावरून नवा वाद उफाळून आला आहे. या पुस्तकातील ‘लोकनृत्य’ या पाठात महाराष्ट्रातील समृद्ध लोककलांना डावलून…

Read More

माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना स्थगिती:मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारानंतर राज्य माहिती आयोगाची माघार; अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मोठे यश

राज्य सरकारने माहिती अधिकार (RTI) कायद्यात केलेल्या वादग्रस्त बदलांना अखेर तूर्तास स्थगिती दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बदलांविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत राज्य माहिती आयोगाशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर राज्याचे मुख्य माहिती आयुक्तांनी 12 जून रोजी जारी करण्यात आलेल्या सुधारित नियमांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे…

Read More

माऊलींच्या पालखी रथाला हिंगोलीचा साज:बैलजोडी आळंदीत सजणार, वारकरी सोहळ्याची जय्यत तयारी

संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या आळंदी येथील पालखी रथाची बैलजोडी हिंगोलीच्या साजाने सजणार असून या बैलजोडीसाठी आवश्‍यक असलेला साज आळंदी येथे संस्थानकडे सूपुर्द करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून पालखी सोहळे विट्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जातात. लाखो वारकरी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन तृप्त होता. हरिनामाचा गजर करीत निघालेल्या पालखी सोहळा, दिंडी यामुळे संपूर्ण वातावरण…

Read More

'दुपारी 2 वाजता दाखवून देतो…':काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना पुन्हा बिश्नोई गँगची धमकी; फोन रेकॉर्डिंग व्हायरल, विधानसभेत गदारोळ

पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आलेल्या धमकीच्या फोनमध्ये खंडणीची मागणी करण्यात आली असून, पैसे न दिल्यास हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ‘आमचे…

Read More

Sanjay Shirsat Slams NCP Over Amol Kolhe & Rohit Pawar Statement

खासदार अमोल कोल्हे यांनी ‘ऑफर आल्यास विचार करू’ असे केलेले सूचक विधान आणि त्यापाठोपाठ रोहित पवार यांनी ‘कुणीही कुठेही जाणार नाही’ असे केलेले स्पष्टीकरण, यावरून शिवसेना नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षावर जोरद . अमोल कोल्हेंच्या विधानावर शिरसाट काय म्हणाले? अमोल कोल्हेंच्या विधानावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “अमोल कोल्हे हे…

Read More

पुण्यात लोकमान्यनगरमध्ये घरफोडी, 12 लाखांचा ऐवज चोरीला:विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू

पुण्यातील नवी पेठेतील लोकमान्यनगर येथे एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी 11 लाख 89 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 30 जून रोजी मध्यरात्री घडली असून, 1 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि त्यांचे कुटुंबीय लोकमान्यनगरमधील इमारत क्रमांक नऊमध्ये राहतात….

Read More