Headlines

मृदा परीक्षण अन् सेंद्रिय शेती काळाची गरज:शिंगणापुरात घुमला आधुनिक शेतीचा संदेश, कृषीदिंडीचे नागरिकांकडून ठिकठिकाणी स्वागत, कृषी दिन उत्साहात साजरा

कृषी दिनानिमित्त ‘रावे’ कार्यक्रमांतर्गत शनैश्वर माध्यमिक विद्यालय शनिशिंगणापूर येथे विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेती, शेतकऱ्यांचे योगदान आणि शाश्वत कृषी पद्धतींबाबत जागरूकता निर्माण केली. का . यावेळी विद्यार्थ्यांनी कृषीदिंडीचे आयोजन करून कृषीविषयक घोषवाक्ये, माहितीपर फलक, शेतकरी संवाद तसेच विविध कृषी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली. या उपक्रमात कृषीकन्या भूमिका घुगे,…

Read More

बोरटेंभेजवळ महामार्ग खचला; अपघाताचा धोका वाढला:इगतपुरी तालुक्यातील घटना;‎त्वरित दुरुस्तीची मागणी‎

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील इगतपुरीजवळील बोरटेंभे परिसरात रस्ता खचून महामार्गाच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसमोर अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला असून परिसरात चिंतेचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने खड्ड्याभोवती तातडीने बॅरिकेड्स उभारण्यात आले असून वाहनचालकांना सावधगिरीचा…

Read More

दुर्लक्ष:पैठण एमआयडीसीतील सांडपाणी, विषारी वायुमुळे नागरिकांचे आरोग्य, शेती धोक्यात

एमआयडीसी परिसरातील रासायनिक (केमिकल) उद्योगांमधून बाहेर पडणाऱ्या दूषित सांडपाण्यामुळे आणि विषारी वायूमुळे मुधळवाडी, कारखाना परिसर, नारायणगाव आणि वाहेगाव परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना फुफ्फुसाचे गंभीर आजार जडले असून, शेती पूर्णपणे नापीक झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक…

Read More

मुस्लिम समाजाने गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा- डॉ. खान:मायनॉरिटी एज्युकेशनल ऑर्गनायझेशनतर्फे जाहीर सत्कार‎

छत्रपती संभाजीनगर सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थित्यंतरे वेगाने घडत आहे. अशा वेळी मुस्लिम समाजाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. संयमित, सकारात्मक आणि शिस्तबद्ध वागणुकीतून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवण्यावर भर द्यावा. त्यानेच समाजाची सर्वांगीण प्रगती साधता येईल, असे प्रतिपादन माजी खासदार तथा माजी मंत्री डॉ. फौजिया खान यांनी केले. सामाजिक कार्य तसेच राज्यसभेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल फेडरेशन ऑफ…

Read More

भाजप नगरसेवक, जि.प. सदस्यांना बँकेच्या निवडणुकीची जबाबदारी:जिल्हा बँक महायुतीच्या ताब्यात घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न

स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि जिल्हा परिषदेनंतर आता भारतीय जनता पक्षाने आपला मोर्चा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वळवला आहे. जिल्हा बँक महायुतीच्या ताब्यात यावी म्हणून भाजपने नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना प्रचारासाठी लावले आहे. येत्या ४ जुलै रोजी जिल्हा बँकेसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर ५ जुलै रोजी मतमोजणी होईल….

Read More

संभाजीनगरातून ‘आयएसआय’च्या हेरांना चार वर्षांपासून रसद पुरवणारा गजाआड:राजस्थान सीआयडी पथकाकडून हर्सूलमध्ये आरोपी रफिक चांदला अटक

पाकिस्तानी गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयला माहिती पुरवणाऱ्या गुप्तहेरांना पैशांची रसद पुरवणाऱ्या एका एजंटला राजस्थान पोलिसांच्या सीआयडी पथकाने छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. रफिक चांद शेख (वय ४१, रा. सईदा कॉलनी, हर्सूल) असे या आरोपीचे नाव असून, त्याला ३० जून रोजी ताब्यात घेण्यात आले. तो गेल्या ४ वर्षांपासून या देशविघातक कृत्यात सक्रिय होता. या नेटवर्कशी जोडलेल्या…

Read More

एमपीएससी परीक्षा ऑफलाईन घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी:अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, शासनाला निवेदन सादर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) आगामी पूर्व परीक्षा संगणकाधारित (सीबीटी) पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. विद्यार्थ्यांनी हा निर्णय बदलून परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक ऑफलाईन (ओएमआर) पद्धतीने घेण्याची मागणी केली आहे. कॅम्प रस्त्यावर एकत्र येत शेकडो विद्यार्थ्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला आणि तेथे निदर्शने केली. आंदोलनाच्या शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन…

Read More

4 जुलै रोजी घडणार 'अपसूर्य' खगोलीय घटना:पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर जाणार, अंतर 15.21 कोटी किमी राहील

शनिवार, ४ जुलै रोजी एक विशेष खगोलीय घटना घडणार आहे. या दिवशी पृथ्वी सूर्यापासून तिच्या कक्षेतील सर्वात जास्त अंतरावर असेल. खगोलशास्त्रात या स्थितीला ‘अपसूर्य’ असे म्हटले जाते. मराठी विज्ञान परिषदेचे खगोल अभ्यासक विजय गिरुळकर आणि प्रवीण गुल्हाने यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या मते, पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार आहे. यामुळे वर्षभरात एकदा…

Read More

9 जुलैला शिक्षकांकडून 'शाळा बंद'ची हाक:टीईटी, संचमान्यता धोरण आणि अशैक्षणिक कामांच्या विरोधात आंदोलन

शिक्षक अभियोग्यता परीक्षेमुळे (टीईटी) निर्माण झालेली सेवा विषयक अस्थिरता, पदोन्नतीची हिरावलेली संधी, संच मान्यता धोरण आणि बीएलओ नियुक्तीसंबंधीच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शिक्षकांनी ९ जुलै रोजी सामूहिक रजा घेत ‘शाळा बंद’ची घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शिक्षक संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण शिक्षक कृती…

Read More

आषाढी वारीसाठी मानाच्या 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान:सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या १,४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये इतके अनुदान वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, यासाठी २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी दिली. राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी सांगितले की, वारकरी संप्रदाय…

Read More