मोबाइलच्या युगात देश-धर्म-संस्कृतीचे संरक्षण होणे आवश्यक- प्रमोद पोकळे:दासटेकडी येथील सुसंस्कार शिबिरात भजनातून प्रबोधन, मान्यवरांचे मार्गदर्शन
“मुलांच्या हातात मोबाइल नाही तर शिस्त द्या आणि गेम नाही तर सुसंस्कार द्या’ या विचाराला अनुसरून तालुक्यातील गुरुकुंज-मोझरी जवळील राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथील श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना केवळ धार्मिक शिक्षणच नव्हे तर जीवन जगण्याची सुयोग्य दिशा व वळण देणारे शास्त्रशुद्ध सुसंस्कार दिले जात आहेत. आज सुसंस्कारांची अत्यंत गरज असून नवपिढीमध्ये सुसंस्कारांसोबतच अध्यात्म, नैतिक…