Headlines

बुलेट ट्रेनसाठी देशात पहिल्यांदाच ‘टनेल हूड्स’ तंत्रज्ञानाचा वापर!:अत्याधुनिक सुविधेमुळे प्रवाशांचा प्रवास शांत आणि आरामदायी होणार

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत भारतात पहिल्यांदाच डोंगराळ बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवर प्रगत “टनेल हूड्स’ तंत्रज्ञान बसवण्यात येत आहे. ३०० किमी/तास पेक्षा जास्त वेगाने धावणारी ट्रेन जेव्हा बोगद्यात प्रवेश करेल तेव्हा सिलिंडरमधील पिस्टनप्रमाणे हवेचा प्रचंड दाब निर्माण होतो. या दबावामुळे ट्रेन बाहेर पडताना होणारा तीव्र “टनेल बूम’ (धडधडणारा आवाज) आणि हादरे रोखण्याचे मोठे काम हे हूड्स करणार आहेत….

Read More

ठाकरे गटात एकजूट:‘मातोश्री’वरील बैठकीला 4 खासदार हजर, 5 ऑनलाइन; पक्षांतराचा धोका नसल्याचे दाखवण्यात तूर्तास यश

लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित खासदारांची तातडीची बैठक घेत पक्षाची एकजूट दाखवून दिली. या बैठकीला सर्व नऊ खासदार उपस्थित होते, ज्यापैकी चौघांनी प्रत्यक्ष, तर ५ जणांनी ऑनलाइन सहभाग नोंदवल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. आगामी लोकसभा अधिवेशनाच्या…

Read More

उच्च शिक्षणात देश महाराष्ट्राकडे आशावादाने पाहतोय:डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे स.प. महाविद्यालयाच्या वर्धापन दिनी मत

महाराष्ट्र उच्च शिक्षणाच्या संक्रमण अवस्थेतून जात असून, देशातील सर्वाधिक विद्यापीठे आणि महाविद्यालये महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात देश महाराष्ट्राकडे आशावादाने पाहत असल्याचे मत राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले. ते शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या ११० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. डॉ. देवळाणकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात उच्च…

Read More

रमेश माटेंनी रायपूरमध्ये 100 किलो वजन उचलले:सत्तराव्या वर्षी दोन सुवर्णपदके पटकावली

नागपूर: पश्चिम नागपूरचे ७० वर्षीय रमेश माटे यांनी छत्तीसगडमधील रायपूर येथे आयोजित ‘मिनी इंडियाबुल्स पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. त्यांनी १०० किलो वजन उचलून ही कामगिरी केली. माटे हे पश्चिम नागपूर नागरिक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि रामनगर व्यायामशाळेचे आजीव सभासद आहेत. रामनगर व्यायामशाळेचे वरिष्ठ मल्ल असलेल्या माटे यांनी राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत दोन…

Read More

डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार:मोर्शी, वरुड रुग्णालयातील अतुलनीय कामगिरीबद्दल गौरव

मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय आणि वरुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शस्त्रक्रिया आणि रक्तदानाच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल तसेच दोन्ही रुग्णालयांच्या कायापालटासाठी त्यांना गौरविण्यात आले. हा सत्कार श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने…

Read More

तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या भानगडीत पडू नका, अन्यथा…:मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा, नेमके काय म्हणाले जरांगे?

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यात भेसळखोरांविरोधात उघडलेली धडक मोहीम सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या कारवाईच्या धास्तीने राज्यातील अनेक पानाच्या टपऱ्या बंद असल्याचे चित्र आहे. अन्नपदार्थांत भेसळ केल्याचे उघडकीस आल्यास थेट मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे कठोर आदेश मुंढे यांनी दिल्याने भेसळखोरांचे चांगलेच धाबे दणाणले…

Read More

रोहित पवारांचं उपोषण म्हणजे 'जरांगे स्टाईल नौटंकी:भाजप आमदार परिणय फुकेंची टीका, म्हणाले- 'अन्नत्याग'ऐवजी 'मीडिया त्याग' करावा

शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ‘अन्नत्याग आंदोलन’ सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला विविध शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षनेत्यांचा वाढता पाठिंबा मिळत असला तरी, सत्ताधारी नेत्यांकडून मात्र यावर जोरदार टीका केली जात आहे. आमदार सदाभाऊ…

Read More

अमरावती होमगार्ड कार्यालयाला कचऱ्याचा विळखा:नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, प्रशासनावर संताप

अमरावती येथील काँग्रेस नगर रोडवरील गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) कार्यालयाची भिंत कचऱ्याने वेढली आहे. भिंतीलगत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. बाजूलाच मुख्य रस्ता असल्याने या कचऱ्यातून निर्माण होणारे जीवजंतू नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे. नागरिकांच्या मते, वारंवार तक्रारी…

Read More

शाळा 15 ऐवजी 30 जूनपासून सुरू:विदर्भातील उष्णतामान, न्यायालयीन निर्देशामुळे शिक्षण विभागाचा निर्णय

अमरावती जिल्ह्यातील सीबीएसई आणि राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आता १५ जूनऐवजी ३० जूनपासून सुरू होतील. विदर्भातील सध्याचे उष्णतामान, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश लक्षात घेऊन शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शाळा व्यवस्थापनांना याबाबतचे निर्देश जारी केले…

Read More

नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षकांना प्रशिक्षण, 10 जुलै अंतिम तारीख:राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने जारी केले वेळापत्रक

राज्यात यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, नवी पाठ्यपुस्तके लागू झाली आहेत. या बदललेल्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण अद्यापही अपूर्ण आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी १० जुलै ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये जनगणनेची कामे सुरू झाल्यामुळे शिक्षकांचे प्रशिक्षण पुढे ढकलण्यात आले…

Read More