Headlines

दोन सरकारी नोकऱ्या त्यागून पूर्ण केले PSI होण्याचे स्वप्न:शिवणी रसुलापूरच्या अजिंक्य ढोकेची गावकऱ्यांनी काढली मिरवणूक‎

नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या शिवणी रसुलापूर येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा अजिंक्य ढोके यांची मुंबई पोलिस उपनिरीक्षकपदी (पीएसआय) निवड झाली. ही निवड पूर्णत्वास जाण्यासाठी त्याने त्यापूर्वीच्या दोन सरकारी नोकऱ्यांचा त्याग केला. त्याचा तो त्याग आणि पीएसआयचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीची जिद्द ही गावकऱ्यांसाठी कौतुकाची बाब ठरली आहे. त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गावकऱ्यांनी मिरवणूक काढून हा…

Read More

दिव्यांग उमेदवारांना 38 पायऱ्या चढून‎द्यावी लागली ‘MPSC’ची परीक्षा‎:पोलिस, पालक, नागरिकांच्या आधाराने गाठावी लागली परीक्षा केंद्रातील खोली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) पूर्व परीक्षा रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर झाली. मात्र शहरातील एका परीक्षा केंद्रावर दिव्यांग उमेदवारांना ज्या परिस्थितीत परीक्षा द्यावी लागली, त्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रॅम्प, व्हीलचेअर किंवा पर्यायी प्रवेशमार्गाची व्यवस्था नसल्याने अनेक दिव्यांग उमेदवारांना परीक्षा केंद्र गाठण्यासाठी तब्बल ३८ पायऱ्या चढाव्या लागल्या….

Read More

मंगळवेढ्यात 10.87 लाखांचा भेसळयुक्त खताचा साठा जप्त:कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यात कारवाई

पाटखळ येथे कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल १० लाख ८७ हजार ५७५ रुपयांचा भेसळयुक्त रासायनिक खतांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी प्रहार उद्योग समूह व कृषी केंद्र चालक सतीश मनोहर भोसले (रा. पाटखळ, ता. मंगळवेढा) व अवधूत अॅग्रो इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि. या खत उत्पादक कंपनीचा संचालक रविराज शंकर कणसे (रा. सातारा) यांच्यावर गुन्हा…

Read More

शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हास्तरीय समिती:अटींचा बसणार फटका; पात्र लाभार्थी, अपात्र शेतकऱ्यांची यादी होणार जाहीर‎

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक‎अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती‎योजने’अंतर्गत आता जिल्हाधिकाऱ्यांच्या‎अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचा‎महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्जमुक्तीची प्रक्रिया‎पारदर्शक, वेगवान आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ‎पोहोचण्याच्या अनुषंगाने समिती गठित करण्यात आली‎आहे. पात्र तसेच अपात्र शेतकऱ्यांची यादी जवळपास‎तयार झाली आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या दोन‎कर्जमाफी योजनांमध्ये ८१ हजार शेतकरी वंचित राहिले‎होते. त्यामुळे आता नवीन योजनेतील अटी, निकषांचा‎फटका किती शेतकऱ्यांना…

Read More

बालविवाहाची अनिष्ट प्रथा करंदीतून कायमची हद्दपार:गाव बालविवाहमुक्त करण्याचा ग्रामस्थांनी केला निर्धार, आता प्रत्येक मुलगी शिकणार

जिथे काही वर्षांपूर्वी विवाहाच्या अक्षदा पडताना वयाचा विचार दुय्यम असायचा, त्याच पारनेर तालुक्यातील ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक करंदी गावाने बालविवाहाच्या अनिष्ट प्रथेला हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. आमच्या गावात आता एकही बालविवाह होणार नाही, उलट प्रत्येक मुलीच्या हाती शिक्षणाची पाटी असेल,’ असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. ‘स्नेहालय’ संस्थेच्या ‘उडान’ प्रकल्पाच्या सोबतीने गावाने प्रत्यक्ष कृती आराखडा…

Read More

विधान परिषदेचा उमेदवार दिल्लीचा नव्हे, मंत्री महाजनांनी दिला:रक्षा खडसेंचा दावा, महायुतीमधील तिढा सुटल्यानंतर प्रथमच मेळावा

विधान परिषद निवडणुकीत भाजपचे‎उमेदवार नंदकिशोर महाजन यांना‎उमेदवारी नेमकी कोणी मिळवून दिली‎याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट‎चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल‎करण्याच्या दिवशी अंतर्गत नाराजी‎टाळण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी‎दिल्लीवरून उमेदवारी जाहीर झाल्याचे‎स्पष्ट केले होते; मात्र रविवारी‎महायुतीच्या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री‎तथा खासदार रक्षा खडसे यांनी‎उमेदवार दिल्लीचा नव्हे तर मंत्री गिरीश‎महाजनांनी दिल्याचा दावा केल्याने‎खळबळ उडाली; मात्र महाजनांनी‎खडसेंचा हा दावा खोडून काढत…

Read More

खिडक्या तुटल्या, फरशा उखडल्या, पत्रे‎गंजले…; तरीही आज "स्कूल चले हम’‎:जिल्ह्यातील 2084 पैकी 1212 शाळांच्या दुरुस्तीची मागणी ‎

आजपासुन शाळांना सुरुवात होत असून‎ग्रामीण भागातील चिमुकल्यांना बसायला‎सुरक्षित वर्गखोल्याच नाहीत. पावसाळ्यापूर्वी‎आपत्ती व्यवस्थापन आणि भौतिक सुविधांच्या‎नावाखाली प्रशासनाकडून केवळ वल्गना‎केल्या जात आहेत. जिल्ह्यातील २०८४ पैकी‎तब्बल १२१२ जिल्हा परिषद शाळा अक्षरशः‎मोडकळीस आल्याचे भयंकर वास्तव समोर‎आले आहे. गंजलेले पत्रे, फुटलेल्या फरशा,‎गळके छत, गायब स्वच्छतागृहे. या दयनीय ‎‎अवस्थेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी ‎‎दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी दिला जातो. ‎‎तरीही शाळांची…

Read More

पिंपळगाव जि.प. शाळेचे‎ पत्रे वादळी वाऱ्यात उडाले:शालतील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर, दुरुस्तीची मागणी

फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव गंगादेव येथील जिल्हा परिषद शाळेची पत्रे शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यात उडून गेली. काही पत्रे शाळेला लागून असलेल्या लिंबाच्या झाडावर अडकली, तर काही पत्रे शाळेच्या परिसरातील घरांवर जाऊन पडली. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांनी सांगितले, शाळेच्या निकृष्ट व जीर्ण अवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याच…

Read More

Film style fight between doctors and nurses at Ladsawangi Health Center

लाडसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णाच्या उपचारावरून वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांच्यात झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले. या प्रकरणी दोन्ही महिला कर्मचाऱ्यांनी एकमेकांविरुद्ध करमाड ठाण्यात तक्रार . शनिवारी दुपारी सुमारे साडेबारा वाजेच्या सुमारास पिंपळकुंठा येथील गरोदर महिला प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात आल्या. त्यांच्या प्रसूतीची जबाबदारी नेमकी कोणी घ्यावी, यावरून वैद्यकीय अधिकारी डॉ….

Read More

नदीत वाहून जाणाऱ्या शाम्पू पुड्या पकडताना तिघींचा बुडून मृत्यू:दोन बहिणींसह काकूचा करुण अंत, मोहळा येथील गोदावरी नदीपात्रात घटना

सोनपेठ तालुक्यातील मोहळा येथे गोदावरी नदीपात्रात धुणे धुण्यासाठी व पोहण्यासाठी गेल्यानंतर तरुणीच्या हातातील शाम्पूच्या १० पुड्या निसटून पाण्यात वाहू लागल्या. त्या घेण्यासाठी तिने तेलाचा प्लास्टिकचा रिकामा डबा हातात घेऊन खोल पाण्यात प्रवेश केला. पाण्यात डब्याचे झाकण उघडले. डब्यात पाणी शिरले. त्याच वेळी तरुणी पाण्यात बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी तिची बहीण पाण्यात गेली. बहिणींच्या मागे काकूही…

Read More