Headlines

पावसाने घेतली उसंत; भंडारदरा परिसर पर्यटकांनी गजबजला!:ऑगस्टच्या पहिल्याच विकेंडला हजारोंची गर्दी; पार्किंगअभावी पर्यटकांची गैरसोय ‎

अहिल्यानगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांवर गेल्या पंधरवड्यापर्यंत सक्रिय असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. शनिवार-रविवारपासून आकाशातील काळेनिळे ढग दूर होऊन निरभ्र आकाश दिसू लागल्याने भंडा . यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून ९ ऑगस्टपर्यंत घाटघर येथे सर्वाधिक ३७६० मिमी, रतनवाडीत ३१४१ मिमी, पांजरे येथे २४४३ मिमी, भंडारदरा येथे २१३९ मिमी, तर वाकी…

Read More

पोलिसांच्या कार्यपद्धतीची घेतली माहिती:होरायझन अ कॅडमीच्या विद्यार्थ्यांनी दिली निफाड पाेलिस ठाण्याला भेट‎

‘अनुभवातून शिक्षण’ या संकल्पनेनुसार मविप्र संस्था संचलित येथील होरायझन ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी निफाड पोलिस ठाण्याला भेट देत पोलिस प्रशासनाच्या प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेतली. शालेय अभ्यासक्रमातील ‘गुन्हेगारी प्रणाली पद्धत’ व ‘ग्रामीण प्रशासन’ या पाठांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निफाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित सोनावणे, पोलिस…

Read More

आयशरमुळे अजिंठा घाटात तीन तास वाहतुकीची कोंडी:घाटाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लागल्या रांगा‎

अजिंठा घाटात एक आयशर ट्रक रस्त्यालगतच्या नालीत जाऊन बंद पडल्याने रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली. सुमारे तीन तास रस्ता अडकून पडल्याने घाटाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक (एमएच २० ईजी ४३५६) रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अजिंठा घाटातून जात होता. घाट चढताना चालकाचा ताबा…

Read More

पुन्हा हादरा:नाशिकमध्ये सात तासांत भूकंपाचे 4 धक्के; सर्वात मोठा 4.3 रिश्टरचा, 25 जुलैपासून 22 हादरे, ऑगस्ट महिन्यात बसले 10 धक्के

नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सुरूच असून शनिवारी (दि. ८) रात्री १०.०१ ते रविवारी (दि. ९) पहाटे ५.३३ वाजेपर्यंत भूकंपाचे ४ धक्के बसले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदीनुसार तिन्ही भूकंपांची तीव्रता २.९ ते ४.३ रिश्टर स्केलदरम्यान होती. चारही भूकंपांची खोली ५ किमी होती. पहिला धक्का शनिवारी रात्री १०.०१ वाजता बसला त्याची तिव्रता ४.३ रिश्टर इतकी होती….

Read More

जेवणातून औषधे दिल्याच्या संशयातून मुलाने‎बॅटने आईची हत्या करत स्वत:लाही संपवले‎:आईवर हल्ला केल्यानंतर मुलाची दुसऱ्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या‎, नांदेडची घटना

तरुणाने बॅटने वार करुन आईची हत्या केली.‎त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या‎केली. ही घटना नांदेड शहरातील तरोडा‎भागातील राहुल कॉलनीत शनिवारी रात्री‎उशिरा घडली. प्रतीक चौथरे (२४) आणि‎भारती चौथरे (५२) अशी दोघा मृतांची नावे‎आहेत. प्रतीकवर मानसोपचार तज्ज् . राहुल कॉलनी येथील बालाजी सोपान‎चौथरे हे सीआरपीएफमध्ये पाँडिचेरी येथे‎कर्तव्य बजावतात. त्यांची मुलगी प्राची पुणे‎येथे शिकते, तर पत्नी भारती आणि मुलगा‎प्रतीक…

Read More

प्रगतिशील शेतकरी:ओसाड माळरानावर ड्रॅगन फ्रूटची लागवड; उत्पन्न 12 पट वाढले, एकरी दीड लाखाची कमाई, नांदेडच्या शेतकऱ्याचा प्रयोग

दुष्काळी परिस्थिती, पाण्याचे दुर्भिक्ष आणि पारंपरिक पिकांमधून हाती येणारा अत्यल्प मोबदला यामुळे खचलेल्या शेतकऱ्यांसाठी नांदेड जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याचा प्रयोग आशेचा नवा किरण ठरत आहे. मुखेड तालुक्यातील उंद्री येथील संभाजी पाटील मुकनर यांनी आपल्या अवघ्या एक एकर ओसाड माळरानावर, जिथे वर्षाला सोयाबीनमधून केवळ 10 ते 12 हजार रुपये मिळत होते, तिथे ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड…

Read More

संपत्तीच्या वादातून सख्ख्या चुलत भावाची गोळ्या झाडून हत्या:अकोला जिल्ह्यात खळबळ; निंबी मालोकार गावातील थरार

अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या निंबी मालोकार गावात एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. शेतीच्या आणि कौटुंबिक संपत्तीच्या वादातून दोन सख्ख्या चुलत भावांमध्ये झालेल्या भांडणाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. या घटनेत अमोल गजानन मालोकार या तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली असून, त्याचा चुलत भाऊ अजय मालोकार यानेच ही…

Read More

बुलढाणा जिल्ह्याचे नाव 'राजमाता जिजाऊनगर' होणार?:आमदार श्वेता महाले यांची मागणी, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश

बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण करण्याची मागणी आता जोर धरू लागली असून, जिल्ह्याचे नाव बदलून ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे, अशी अधिकृत मागणी भाजप आमदार श्वेता महाले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले असून, मुख्यमंत्र्यांनीही या पत्राची तात्काळ दखल घेत प्रशासनाला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या सकारात्मक प्रतिसादामुळे राजमाता जिजाऊंच्या नावाने…

Read More

रस्त्यांवरील झाडांच्या छाटलेल्या फांद्या बेवारस:महापालिकेच्या दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त

अमरावती शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर झाडांची छाटणी केल्यानंतर कचरा उचलण्याकडे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, रस्त्याच्या कडेला पडलेल्या डहाळ्या, पाने आणि फांद्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, तसेच अपघाताचा धोकाही वाढला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर किंवा नियमित देखभालीचा भाग म्हणून मनपाच्या वृक्ष प्राधिकरणातर्फे रस्त्यांवरील झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्याचे काम हाती…

Read More

श्री गाडगे महाराज मिशनचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांचे निधन:मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी व्यक्त केला शोक

श्री संत गाडगे महाराज मिशनचे उपाध्यक्ष आणि संत गाडगेबाबा धर्मशाला ट्रस्ट मुंबई, नाशिक व अमरावतीचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांचे रविवारी पहाटे २.३० वाजता नागरवाडी (ता. चांदूरबाजार) येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी श्री गाडगे महाराज गोरक्षण संस्था, मूर्तिजापूर येथे अंत्यसंस्कार…

Read More