हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्याने केळीच्या बागा उध्वस्त:20 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज, प्रशासाकडून पंचनामा सुरु
हिंगोली जिल्ह्यात शनिवारी ता. १३ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कळमनुरी व वसमत तालुक्यात केळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार केळीच्या बागांचे सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर हिंगोली तालुक्यातील पहेणी येथे ६० ते ७० घरावरील टीनपत्रे उडून गेली आहेत. हिंगोली जिल्हयात वसमत व कळमनुरी तालुक्यात केळीचे पिक अधिक प्रमाणात घेतले…