Headlines

राज्याचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होणार:कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत 3 आठवड्यांच्या सत्रावर शिक्कामोर्तब

महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी आज मुंबईत पार पडलेली ‘कामकाज सल्लागार समितीची’ महत्त्वाची बैठक आता संपली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सविस्तर चर्चा…

Read More

एआयसाठी नियामक पद्धत निर्माण करा – विवेक सावंत:मानवजातीची सेवा करावी, तिची जागा घेऊ नये अशी मागणी

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मेंटॉर विवेक सावंत यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (एआय) नियामक पद्धत निर्माण करण्याची गरज व्यक्त केली आहे. पुणे येथे आयोजित ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यातील सत्यशोधन’ या संवाद सत्रात ते बोलत होते. एआयने मानवजातीची सेवा करावी, तिची जागा घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. अमेरिकेसह जगभरात एआय आणि डेटा सेंटरला विरोध होत असून, भारतातही नागरी समाजाने…

Read More

राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा एल्गार:16 जूनपासून सेवा ठप्प होण्याची शक्यता; वाचा काय आहेत मागण्या

अनेक प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार दाद मागूनही प्रशासन केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत, राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. उद्यापासून (16 जून) राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा एल्गार पुकारला आहे. या संपामुळे राज्यातील वाहन परवाने, गाड्यांचे पासिंग, आरसी बुक यांसह आरटीओ कार्यालयातील बहुतांश सर्वच कामे ठप्प होण्याची शक्यता असून सर्वसामान्यांना फटका बसणार…

Read More

वखार महामंडळाच्या गोदामातील हरभरा भिजल्याचे प्रकरण:अधिकारी म्हणतात – शेतकऱ्याचे नुकसान नाही, जास्तीत जास्त विमा मिळविण्यासाठी प्रयत्न

हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाच्या गोदामातील हरभरा भिजल्याचे प्रकरण चांगलेच तापू लागले असून या प्रकरणात आता उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या प्रकरणात अधिकारी मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसल्याचे सांगत असून शासनाचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहोत. जास्तीत जास्त विमा मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे गोदाम भाडेतत्वावर घेतांना योग्य…

Read More

हिंगोलीत शाळांमध्ये आजपासून वाजली पहिली घंटा:'पाऊलठसे' घेत नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांसह खाजगी शाळांमध्ये सोमवारी ता. १५ नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. नव प्रवेशितांना गुलाब पुष्प, गणवेश पाठयपुस्तके देण्यात आली तर काही ठिकाणी मुलांच्या पायाचे ठसे घेऊन शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी शाळामध्ये अल्हाददायक वातावरण दिसून आले. हिंगोली जिल्हयातील सुमारे 1 हजार शाळांमधून नवीन शैक्षणिक वर्षात शाळा…

Read More

Eknath Shinde Excluded; Naresh Mhaskes Shiv Sena Style Warning

नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकृत निमंत्रण पत्रिकेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. पालिकेतर्फे उद्या (मंगळवार) होणाऱ्या विविध आरोग्यविषयक सुविधांच्या . नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध आरोग्य सेवांच्या कामांचा लोकार्पण सोहळा उद्या आयोजित करण्यात आला आहे. पालिकेने या कार्यक्रमासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार…

Read More

'बंगालमध्ये एकनाथ शिंदे आणि समृद्धी महामार्ग नव्हता म्हणून…':तृणमूलमधील फुटीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली असून पक्षाचे बंडखोर खासदार केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर थेट ‘नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) या पक्षात विलीन झाले आहेत. हे खासदार आता एनडीएला (NDA) पाठिंबा देणार असल्याचे समोर…

Read More

उजनी धरणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा 35 टीएमसी पाणीसाठा कमी:उपयुक्त पातळी उणे 23.72 टक्क्यांवर,

चालू वर्षी जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात माढा तालुक्यासह उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात अपेक्षित पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. अपवाद वगळता बहुतांश भाग कोरडाच राहिल्याने खरीप हंगामाची सुरुवात रखडली आहे. यंदा अल निनोच्या परिणामामुळे पाऊस कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, उजनी धरणातील पाणीसाठ्यातही लक्षणीय घट झाली आहे. १४ जून २०२६…

Read More

अमरावती विमानतळावर नाईट लॅण्डींग:धावपट्टीवर लाईट्ससह डीव्हीओआर यंत्रणेचे काम पूर्ण, रात्री विमानोड्डाण केव्हा याबाबत अनिश्चितता‎

बेलोरा विमानतळावरून रात्री विमानोड्डाण केव्हा होणार याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. रात्री विमानोड्डाणासाठी आवश्यक डॉपलर व्हीएचएफ ओम्नीडायरेक्शनल रेंज (डीव्हीओअर) यंत्रणा उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, त्याची यशस्वी चाचणी देखील झाली आहे. धावपट्टीवर लाईट्सही बसवण्यात आले असून, विमान हवेत झेपावण्यासह धावपट्टीवर उतरण्यासाठी आवश्यक या दोन्ही महत्त्वपूर्ण दिशादर्शक, मार्गदर्शक यंत्रणा बसवण्याचे काम अगदी अचूक पूर्ण झाले…

Read More

विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट!:तानाजी सावंत आणि बसवराज पाटील यांची पुण्यातील भेट, बंद दाराआड तासभर खलबतं, महायुतीचे टेन्शन मिटलं?

धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत थेट आणि अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. मात्र, मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना एका बंद दाराआड झालेल्या राजकीय भेटीने संपूर्ण निवडणुकीचे चित्रच पालटल्याची चर्चा रंगली आहे. महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी थेट पुण्यात जाऊन शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत…

Read More