Headlines

व्यवस्थेचे बळी:आश्रमशाळांतील विद्यार्थी सुरक्षेसाठी नवी ‘एसओपी’ ठरवणार- जयस्वाल, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल- उईके

गडचिरोलीतील जतपलाई येथे सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू झाला. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांसाठी नवीन प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात येईल, असे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले. मृत मुलींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले की, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली…

Read More

सर्पदंश झालेल्या गरोदर महिलेला जीवदान:सर्पदंश डॉक्टरांनी वाचवले आई अन् बाळाचे प्राण

छत्रपती संभाजीनगर येथील मेडिकव्हर रुग्णालयात सर्पदंश झालेल्या एका गरोदर महिलेवर डॉक्टरांच्या पथकाने यशस्वी उपचार केले. या उपचारामुळे आई आणि गर्भातील बाळाचे प्राण वाचले असून, महिलेची प्रकृती आता स्थिर आहे. सर्पदंश झाल्यानंतर या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्पविषाचा शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेऊन तिच्यावर त्वरित उपचार सुरू करण्यात आले. गर्भावस्थेमुळे आईच्या आरोग्यासोबतच गर्भातील…

Read More

प्रकल्पग्रस्तांचे अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन:जमिनीच्या मोबदल्यासह विविध मागण्यांसाठी, पुढील टप्पा मुख्यमंत्र्यांकडे

अमरावती येथे बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. जमिनीच्या मोबदल्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचा पुढील टप्पा थेट मुख्यमंत्र्यांकडे असेल, असे यावेळी ठरवण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हे आंदोलन झाले. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा आणि…

Read More

शाळेजवळ चिखलाचे तळे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न:अंजनगाव बारी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अंजनगाव बारी येथे पावसाळ्यामुळे रस्त्यांची दूरवस्था झाली असून, मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल साचला आहे. यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणी येत आहेत. विशेषतः जिल्हा परिषद मुलांच्या शाळेजवळ चिखलाचे तळे साचल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शाळेजवळच एक मोठा खड्डा तयार झाला असून, त्यात पावसाचे पाणी…

Read More

पुणे मनपा रस्ते निविदांमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप:25 कोटींच्या 3 कामांवर महापौरांसह 2 आमदारांच्या सहभागाचा आरोप

पुणे महापालिकेच्या सुमारे २५ कोटी रुपयांच्या तीन रस्ते कामांच्या निविदांमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केला आहे. या निविदा रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. शिंदे यांच्या मते, या निविदांबाबत २६ जुलै रोजी महापौर बंगल्यावर बैठक झाली होती. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महापालिकेतील…

Read More

नागपुरात पत्नीच्या प्रियकरावर चाकूने हल्ला:भरदिवसा घडली घटना, पतीला अटक

नागपूरमध्ये नात्यातील वादातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या प्रियकरावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही थरारक घटना सोमवारी दुपारी महाल परिसरातील लाकडी पुलाजवळ घडली. या हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित आकाश गुलाबराव ढोमणे (शिवाजी नगर) हा ऑटोचालक आहे. आरोपी गणेश दिलीप वानखेडे (वय ३५) याच्या…

Read More

कामगार संघटनांचे जेलभरो आंदोलन:नवीन कामगार कायदे रद्द करून जुने लागू करण्याची मागणी

केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन कामगार कायद्यांविरोधात कामगार संघटना संयुक्त कृती समितीने सोमवारी पिंपरी येथे ‘जेलभरो’ आंदोलन केले. हे नवीन कायदे कामगारांचे आर्थिक आणि सामाजिक शोषण करणारे असून, ते रद्द करून जुने, परंपरागत कामगार कायदे पुन्हा लागू करावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष आणि इंटकचे प्रदेशाध्यक्ष…

Read More

बार्टी अधिछात्रवृत्ती: मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन:आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) अंतर्गत पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात नव्याने स्थापन झालेल्या ‘आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशन’ च्या शिष्टमंडळाने समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मागण्या मान्य न झाल्यास १९ ऑगस्ट २०२६ पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे. या बैठकीत शिष्टमंडळाने बार्टी अधिछात्रवृत्तीच्या जागांची संख्या…

Read More

'विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कॉंग्रेसचे राजकारण':रांचीतील लाठीचार्जवरून संजय निरुपमांचा राहुल गांधींवर घणाघात, नेमके काय म्हणाले?

रांची येथे विद्यार्थ्यांनी परीक्षेतील गैरव्यवहार तसेच पेपर लीक प्रकरणावरून आंदोलन सुरू केले आहे. PSC-JSSC परीक्षांमधील कथित अनियमिततेचा निषेध करण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडून विधानसभेच्या गेटजवळ पोहोचले जात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी कॉंग्रेस व राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी…

Read More

कळमनुरीत क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा:खरडणी अनुदान गैरव्यवहार प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी व परिसरातील खरडणी अनुदानातील गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर करावी या मागणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी ता. 10 तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कळमनुरी तालुक्यातील येगाव, पिंपरी बुद्रूक, कृष्णापूर या शिवारामध्ये सन 2024-25 या आर्थिक वर्षात या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिसरात नुकसानीचे अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांच्या…

Read More