Headlines

हिंगोलीत वादळामुळे गोदाम कोसळले:कोट्यवधींचा हरभरा धोक्यात; अधिकाऱ्यांच्या 'अफवा' जपामुळे संशय बळावला

हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीच्या गोदामात वखार महामंडळाने भाडेतत्वावर घेतलेले गोदाम वादळी वाऱ्याने कोसळल्यानंतर शासनाचे कोट्यावधीचे नुकसान आहे. मात्र या नुकसानीची माहिती देतांना अफवांवर विश्‍वास ठेऊ नका असे ओरडून सांगणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदाम भाड्याचे गौडबंगाल संशोधनाचा विषय बनले आहे. त्यामुळे आता नेमक्या अफवा काय आहेत याची चर्चा सुरु झाली आहे. हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाने गोदाम भाडेतत्वावर…

Read More

आरटीओ कर्मचारी आजपासून संपावर:पदोन्नतीसह सेवाप्रवेशासंदर्भातील मागण्यांकडे सरकारच्या दुर्लक्षाचा आरोप

आरटीओ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या परिवहन विभागाचे कर्मचारी आजपासून (16 जूनपासून) बेमुदत संपावर जाणार आहेत. या प्रकारामुळे वाहन परवान्यासह नागरिकांची कामे रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राज्यभरातील मोटार वाहन विभागातील कर्मचारी गेल्या वर्षभराहून अधिक कालावधीत प्रलंबित मागण्यांबाबत न्याय मिळेल या प्रतीक्षेत होते. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनात्मक कृती करून मागण्यांकडे लक्ष वेधले होते. सेवाप्रवेश नियमाच्या अनुपलब्धतेचे कारण…

Read More

संत साहित्य समाजाला दिशा देणारे अमूल्य वैभव- योगीराज महाराज:नांदखेड येथे एकनाथी भागवत पारायण सोहळ्याची भक्तिमय सांगता‎

चोहोट्टा बाजारजवळील नांदखेड येथे पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, श्री एकनाथी भागवत सामूहिक पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाची रविवारी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. संत साहित्य हे समाजाला दिशा देणारे अमूल्य वैभव असल्याचे संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे वंशज श्री योगिराज महाराज गोसावी म्हणाले. त्यांच्या काल्याच्या कीर्तनाने भाविकांना अध्यात्माची मेजवानी मिळाली. महोत्सावत हजारो वारकरी, शेतकरी व भाविकांच्या…

Read More

रात्रीच्या वादळात 7 ठिकाणी झाडे कोसळली:अवकाळी पावसामुळे शहरामधील विद्युत पुरवठा खंडित; वाहतुकही खोळंबली‎

शहरात रविवार १४ रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे ७ ठिकाणी मोठे वृक्ष कोसळून विद्युत पुरवठा खंडित झाला. त्याचप्रमाणे बराचवेळ वाहतूकही खोळंबली होती. बेलपुरा, मोतीनगर, भगतसिंग चौक, पुंडलिक बाबा नगर, अंबिका नगर आणि पूनम इलेक्ट्रॉनिक्सजवळ वृक्ष कोसळले. पावसामुळे राजापेठ भुयारी मार्गासह शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. अनेक प्रमुख मार्गांवर मोठमोठी झाडे उन्मळून…

Read More

मुंबईकडे निघालेला "लाँग मार्च' शहरात:भीमसैनिकांकडून ‎जल्लोषात स्वागत‎

अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बीड ते मंत्रालय (मुंबई) दरम्यान निघालेला ‘लाँग मार्च’ अहिल्यानगर शहरात दाखल झाला. यावेळी शहरातील समस्त भीमसैनिकांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत लॉंग मार्चचे प्रमुख संयोजक सिद्धार्थ शिंगारे यांचा सत्कार केला व आंदोलनाला पाठिंबा दिला. नगरसेवक सुरेश बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली शहरात मार्चमध्ये सहभागी झालेल्या हजारो भीमसैनिकांसाठी आवश्यक त्या…

Read More

जुन्या भांडणाच्या वादातून कन्नड पोलिस ठाण्यासमोर युवकाचा खून:3 जण गंभीर, रविवारी मध्यरात्री दोन गटात तुंबळ हाणामारी, सात जणांवर गुन्हा दाखल‎

Marathi News Local Maharashtra Aurangabad A Youth Was Murdered In Front Of Kannada Police Station Over An Old Dispute, Three People Are In Critical Condition, A Brawl Broke Out Between Two Groups On Sunday Midnight, A Case Was Registered Against Seven People कन्नड38 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कन्नड शहर पोलिस ठाण्यासमोरच रविवारी (१४ जून) मध्यरात्री एक…

Read More

श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी 1 लाख भाविक:सोमवती अमावास्या, अधिक मास एकत्र आल्याने भाविकांची गर्दी; पहाटे 4 पासून घेतले दर्शन‎

सोमवती अमावास्येच्या पावन पर्वानिमित्त खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती मंदिरात भाविकांचा अक्षरशः जनसागर उसळला. रविवार व सोमवार अशा दोन दिवसांत देशाच्या विविध भागांतून आलेल्या सुमारे १ लाख भाविकांनी निद्रिस्त अवस्थेतील मारुतीरायाचे दर्शन घेतले. यंदा सोमवती अमावास्या अधिकमास (पुरुषोत्तम मास) या अत्यंत शुभ योगासह आल्याने या दर्शनाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले होते. यंदाच्या सोमवती अमावास्येचा कालावधी…

Read More

ओबीसी आरक्षणाची 50 टक्के मर्यादेत कोंडी:ओबीसी मुक्ती मोर्चाची भुजबळ-बावनकुळेंच्या राजीनाम्याची मागणी

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने ओबीसी आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेतील कोंडी आणि कोट्यात झालेल्या कपातीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी मोर्चाने केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या न्यायालयीन मर्यादेमुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप मोर्चाने केला आहे. निवडणूक आयोगाच्या…

Read More

पुणे येथे 'इग्नाईट-2026' आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन:केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि आयईईई पुणे सेक्शनद्वारे संयुक्त आयोजन

पुणे येथे केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स संचालित केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आयईईई) पुणे सेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इग्नाईट-२०२६’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद १७ ते १९ जून २०२६ या कालावधीत होणार असून, यात आंतरराष्ट्रीय संशोधक आणि उद्योगतज्ज्ञ सहभागी होणार आहेत….

Read More

मावळमध्ये 'शाळा प्रवेशोत्सव 2026-27' उत्साहात साजरा:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६-२७’ उत्साहात साजरा करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी ‘पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्हे’ येथे भेट देऊन नवीन शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या प्रसंगी त्यांनी नवोदित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, भावी पिढीला सक्षमपणे घडवण्यासाठी आधुनिक…

Read More