Headlines

वर्ध्यात रविवारी तापमान 46.6 पार:दुपारच्या वेळी रस्ते ओस, जनजीवन विस्कळीत; उद्योगांमधील प्रदूषण तापमानावाढीला कारणीभूत

वर्धा जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड तडाखा बसत असून तापमानाने ४६.६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीसच मे महिन्याची चाहूल लागल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील दोन तीन कंपन्यांमुळे व त्यांच्या वाढत्या प्रदूषणाने तापमानात वाढ होत असून, कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सिमेंट रस्ते…

Read More

धीरेंद्र शास्त्री स्वत:च्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती:छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत संभाजी छत्रपती यांची टीका

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी छत्रपती यांनी कडक शब्दांत समाचार घेतला असून, छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत, “स्वतःच्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती” असे संबोधले आहे. तसेच “अशा भोंदू…

Read More

महाराष्ट्रावर सूर्य कोपला!:परभणीत उष्माघाताने एका व्यक्तीचा मृत्यू, अकोल्यात पारा 46 वर जाण्याचा इशारा; अनेक शहरांत रस्ते सामसूम

महाराष्ट्रावर सध्या सूर्य कोपल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक शहरे उष्णतेच्या तडाख्याने अक्षरशः होरपळून निघत आहेत. विदर्भ व मराठवाड्यासह अनेक शहरांत तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे दुपारपूर्वीच रस्ते सामसूम झाल्याचे दिसून येत आहे. परभणीत उष्माघाताने एका व्यक्तीचा बळी गेला आहे. तर अकोल्यात पारा तब्बल 46 अंशांवर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वाढत्या तापमानामुळे काही ठिकाणी…

Read More

सत्तांतर झाल्यापासून महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांची हिंमत वाढली:धीरेंद्र शास्त्रींच्या विधानावर शशिकांत शिंदेंची टीका, म्हणाले- ही कसली शिवभक्ती?

नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या काही विधानांमुळे नवा वाद निर्माण झाला असून राजकीय व सामाजिक वर्तुळातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शास्त्री यांनी हिंदू समुदायाला आवाहन करताना “चार मुले जन्माला घाला आणि त्यातील एक अपत्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या,” असे विधान केले. या विधानावरून विरोधकांनी टीका केली आहे. यावर राष्ट्रवादी…

Read More

नमाज पठण स्पर्धा हेच तुमचे हिंदुत्व का?:उबाठाचे हिंदुत्व बेगडी, सत्तेसाठी काँग्रेससमोर झुकले, मोदी थकले नाहीत, अडीच वर्षे सुट्या घेणारे थकले- नवनाथ बन

साधू संत, बागेश्वर बाबा यांचे हिंदूत्व नाही असे मुक्ताफळे संजय राऊत उधळत आहेत. राऊतांच्या हिंदूत्वाची व्याख्या काय आहे? याकूब मेमन कबर सुशोभीकरण, नमाज पठण स्पर्धा, जबान बाळासाहेब ठाकरे उल्लेख करणे हे तुमचे हिंदुत्व आहे का? तुम्ही साधू संताचा अपमान करत आहात, जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे….

Read More

धीरेंद्र शास्त्रींच्या विधानानंतर 'सह्याद्री' आक्रमक:'आम्हाला शिवराय शिकवू नका', अंबादास दानवे आणि अमोल कोल्हेंचा घणाघात

नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या काही विधानांमुळे नवा वाद निर्माण झाला असून राजकीय व सामाजिक वर्तुळातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शास्त्री यांनी हिंदू समुदायाला आवाहन करताना “चार मुले जन्माला घाला आणि त्यातील एक अपत्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या,” असे विधान केले. या विधानावरून विरोधकांनी टीका केली आहे. शिवसेना ठाकरे…

Read More

गोऱ्हेंना विधान परिषदेची उमेदवारी नकोच!:24 वर्ष आमदार असूनही पक्ष वाढीसाठी शून्य काम, शिंदेंनी बिचकुलेंना संधी द्यावी- तृप्ती देसाई

एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये. त्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी काहीही काम केलेले नाही, महिलांसाठी काही काम केले नाही. त्या ज्या भागात राहतात त्या भागात त्यांना साधा एक नगरसेवक निवडून आणता आलेला नाही, पक्ष संघटना न वाढवणाऱ्या व्यक्तीलाच संधी द्यायची असेल तर अभिजीत बिचकुले यांना संधी द्यावी, असे तृप्ती देसाई…

Read More

उबाठाच्या बैठकीला नेत्यांची दांडी, लवकरच मोठी फूट पडणार:महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोललीच पाहिजे- संजय शिरसाट

उबाठाने बोलवलेल्या बैठकीला अनेक जण गैरहजर राहतात कारण त्यांचे मन तिथे रमत नाही. यामागे निश्चित काहीतरी घडामोडी असतील नाही तर उबाठामध्ये जे जात आहे त्यांना जाऊ द्या असे म्हटले नसते, म्हणून असा अंदाज लावायला काही हरकत नाही की उबाठामध्ये लवकरच फुट पडेल असे दिसतंय, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. परंतु पक्षातंर्गत संघर्षाला कोण…

Read More

हिंगोली पोलिसांचा मोठा निर्णय:सर्वाधिक अपघात होणाऱ्या 'प्राइम टाइम'मध्ये जिल्ह्याच्या सर्व मार्गांवर होणार नाकाबंदी!

हिंगोली जिल्ह्यात मागील चार वर्षात अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून चार वर्षात 679 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. बहुतांश अपघात हेल्मेट नसल्याने झाले आहेत. या शिवाय सायंकाळच्या वेळेतच बहुतांश अपघात झाल्याने आता सायंकाळी सहा ते रात्री नऊ यावेळेत नाकाबंदी केली जाणार आहे. अपघाताच्या ठिकाणी वाहने हळू चालवली जावीत यासाठी बॅरीकेट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला…

Read More

सांस्कृतिक केंद्रात 107 ते 132 कार्यक्रम; 75% पदे रिक्त:3 वर्षांत 30 कोटी खर्च, तरी व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ नाही

नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचा कारभार मोठ्या विसंगतीतून सुरू असल्याचे माहिती अधिकारातून (RTI) उघड झाले आहे. एका बाजूला कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून शेकडो कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला केंद्रातील एकूण 33 पैकी तब्बल 25 पदे रिक्त आहेत. केंद्रात दरवर्षी मोठ्या संख्येने कार्यक्रम आयोजित केले जातात. 2023-24 मध्ये 107, 2024-25…

Read More