Headlines

उद्धवसेना फुटीच्या उंबरठ्यावर सहा खासदार दिल्लीत दाखल:आज लोकसभा अध्यक्षांना भेटणार, उपमुख्यमंत्री शिंदेही दिल्लीत

महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 नंतर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चिन्हे आहेत. कारण उद्धवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापनेची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ते बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र देऊ शकतात. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाले. सूत्रांनी सांगितले की, बुधवारी सकाळी आधी शिंदेंची या खासदारांसोबत बैठक होईल….

Read More

खंडणी उकळल्याचेही उघड:नागपुरात वायुदल जवानाच्या पत्नीवर सामूहिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न, मध्य प्रदेशात नेऊन निकाह लावण्याचा प्रयत्न

हवाई दलातील जवानाच्या रिअल इस्टेट व्यावसायिक पत्नीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून तिला तब्बल एक वर्ष ब्लॅकमेल करत तिच्याकडून ३ लाख ९ हजार खंडणी उकळली. तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणून मध्य प्रदेशात नेऊन निकाह लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली….

Read More

शेतकऱ्याच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर तहसीलदार घटनास्थळी:खोपडा येथील पाणी प्रश्नावर तात्पुरता तोडगा, रामटेके यांचे आंदोलन स्थगित

मोर्शी तालुक्यातील खोपडा येथील खरेदी विक्री संघाचे संचालक नरेंद्र रामटेके यांनी सहकुटुंब बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महसूल प्रशासनात खळबळ उडाली. त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार सागर ढवळे यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली. या पाहणीनंतर पाणी प्रश्नावर तात्पुरता तोडगा निघाल्याने रामटेके यांनी आपले उपोषण तूर्त मागे घेतले आहे. रामटेके यांनी १६ जूनपासून उपोषणाचा इशारा दिला…

Read More

विप्लव बाजोरिया प्रकरणाची हायकोर्टात सुनावणी:विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला लक्ष

विधान परिषद निवडणुकीतील विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज, १७ जून रोजी सुनावणी होणार आहे. मतदानाला अवघा एक दिवस उरला असताना या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाजोरिया यांनी अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्जासोबत जोडलेले शपथपत्र अर्धवट असल्याच्या कारणावरून त्यांचा अर्ज…

Read More

पार्वतीनगर जलवाहिनी दुरुस्ती दुसऱ्या दिवशीही सुरू:२५ हजार नागरिकांना बुधवारी पाणी मिळण्याची शक्यता

अमरावती: पार्वतीनगर परिसरातील जलकुंभातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने सोमवारपासून सुरू झालेले दुरुस्तीचे काम मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) ने दिलेल्या माहितीनुसार, या जलकुंभाशी संबंधित सुमारे २५ हजार नागरिकांना बुधवार, १७ जून रोजी पाणी मिळण्याची शक्यता आहे. या बिघाडामुळे पार्वतीनगर, वल्लभनगर, छाया कॉलनी, आनंदनगर आणि गडगडेश्वर यासह परिसरातील अनेक भागांतील नागरिकांना…

Read More

उपवर्गीकरण विरोधात तिवस्यात बैठक, 17 जूनच्या मोर्चात सहभागाचा निर्धार:अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर होणार महामोर्चा

तिवसा येथे अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत शासनाच्या उपवर्गीकरण निर्णयाचा निषेध करण्यात आला. तसेच, १७ जून रोजी अमरावती येथे आयोजित महामोर्चात सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला. रहिवाशांनी उपवर्गीकरण हे आरक्षणाविरुद्धचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या तत्त्वांना धक्का पोहोचत असल्याचा…

Read More

भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडले:सुनील माने यांची टीका, म्हणाले- 'स्वत:च्या मेंदूवर गोमूत्र शिंपडावे'

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडल्याच्या घटनेवरून माने यांनी ‘भाजप कार्यकर्त्यांनी स्वतःच्या मेंदूवर गोमूत्र शिंपडावे,’ असे म्हटले आहे. पुणे येथे बोलताना सुनील माने यांनी सांगितले की, भाजप किसान…

Read More

परतवाड्यातील चिमुकल्यांनी दिला स्वच्छ भारत, वृक्षारोपणाचा संदेश:गुरुकुल कॉलनीत स्वयंस्फूर्तीने काढली जनजागृती फेरी

परतवाडा शहरातील गुरुकुल कॉलनीतील लहान मुलांनी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा एक प्रेरणादायी संदेश दिला. ‘स्वच्छ भारत, हरित भारत’ या संकल्पनेतून त्यांनी स्वतःच्या हाताने जनजागृतीपर फलक तयार केले आणि परिसरात स्वच्छता व वृक्षारोपणाबाबत जागृती फेरी काढली. या फेरीदरम्यान, मुलांनी ‘स्वच्छता राखा’, ‘झाडे लावा’, ‘पर्यावरण वाचवा’ अशा विविध घोषणा देत नागरिकांना जागरूक केले. विशेष म्हणजे, हा उपक्रम…

Read More

नामांकित बिल्डरकडून 150 ग्राहकांना 50 कोटींचा गंडा:फ्लॅट न देता फसवणूक केल्याप्रकरणी समीर जैनवर गुन्हा दाखल

पुणे जिल्ह्यातील केसनंद येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या नावाखाली सुमारे १५० ग्राहकांची ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर समीर रवींद्र जैन यांच्याविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनेक वर्षे घरांचा ताबा न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. समीर जैन हे ‘रविनंदा लँडमार्क’ कंपनीचे संचालक असून, ते मार्केटयार्ड येथील अरिहंत हाऊसिंग सोसायटीचे रहिवासी आहेत. ‘रविनंदा टॉवर्स…

Read More

प्रार्थनेतून कर्करोग बरा करण्याचा दावा:अंनिसच्या महिला कार्यकर्त्यांकडून पर्दाफाश, धर्मगुरुसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात प्रार्थनेद्वारे कर्करोग आणि ट्यूमरसारखे असाध्य आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या एका धर्मगुरुसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा येथील एका प्रार्थनास्थळात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका ३२ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, चिंचवड येथील पास्टर केनेथ पॉल सिल्वे यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे….

Read More