Headlines

केईएम रुग्णालयाच्या नामांतरावर प्रशासनाकडून हिरवा कंदील:ठाकरे गटाच्या विरोधानंतरही प्रक्रिया पूर्ण, मंत्री लोढांच्या मागणीला यश

मुंबई महानगरपालिकेच्या ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ (केईएम) या ब्रिटीशकालीन रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला आता पालिका प्रशासनाने अधिकृतपणे हिरवा कंदील दाखवला आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडलेला हा प्रस्ताव आरोग्य समितीच्या मंजुरीनंतर पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आला होता. आयुक्तांनी याला संमती दर्शवल्यामुळे आता हे रुग्णालय ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ या नावाने ओळखले जाईल. रुग्णालयाचे नाव…

Read More

उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना सज्ज:ठाकरेंच्या मार्गात अडथळा निर्माण करण्यासाठी दहावा उमेदवार उतरण्याची रणनिती

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. एकूण नऊ जागांसाठी निवडणूक होत असताना उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह वाढत असतानाच, शिंदे गटाकडून मोठा राजकीय डाव टाकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम…

Read More

आयुक्तांचे सुखना नदीतील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश:५ जून रोजी नदीकाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचेही निर्देश

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी मंगळवारी सुखना नदी पुनर्जीवन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नदी पात्रातील अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे आणि ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी नदी पात्रातील सर्व अतिक्रमणे तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश दिले. नदीपात्रात येणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी…

Read More

क्रेडिट कार्डच्या थकीत बिलावरून एजंटची व्यक्तीला मारहाण:पुण्यात भररस्त्यात घडली घटना; रिकव्हरी एजंट की गुंड? कारवाईची मागणी

क्रेडिट कार्डची थकीत रक्कम भरण्यावरून एका खासगी बँकेच्या एजंटकडून एका व्यक्तीला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेवर सर्वसामान्य लोकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, रिकव्हरी एजंटवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेमुळे बँकेचे रिकव्हरी एजंट आहेत की गुंड? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. देशात गत काही वर्षांत…

Read More

एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस सरकारचा ब्रेक:14 तलाव संवर्धन प्रकल्प रद्द; निधीची वसुली करण्याचेही आदेश

राज्यातील तलाव संवर्धन प्रकल्पांबाबत सरकारने मोठा निर्णय घेत 14 प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे. पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने हा आदेश जारी केला असून या विभागाची जबाबदारी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे, हे प्रकल्प मागील सरकारच्या कार्यकाळात मंजूर झाले होते. यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंजूर केलेल्या 11 प्रकल्पांचा समावेश आहे, तर…

Read More

पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांचा मध्यरात्री छापा:15 बांगलादेशींसह अल्पवयीन मुलीची सुटका, 18 जणांवर कारवाई

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवार पेठेतील ‘डिस्को’ आणि ‘माचीस’ या इमारतींवर मध्यरात्री छापा टाकत एका मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसह 15 बांगलादेशी नागरिकांची सुटका करण्यात आली. एकूण 18 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यात 11 महिला, 3 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. ही मोहीम सोमवारी रात्री…

Read More

आनंदाचे अश्रू आणि जुन्या आठवणी; घोटवीत 24 वर्षांनंतर भरली शाळा:पाचपुते विद्यालयात स्नेहमेळावा उत्साहात, माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला मदत‎

श्रीगोंदे4 तासांपूर्वी कॉपी लिंक तालुक्यातील घोटवी येथील तुळसाई पाचपुते माध्यमिक विद्यालयाच्या सन १९९९-२००० या प्रथम बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २४ वर्षांनंतर एकत्र येत ‘स्नेहमेळावा व कृतज्ञता सोहळा’ अत्यंत भावनिक वातावरणात साजरा केला. आयुष्याच्या धावपळीत विखुरलेले हे मित्र प Source link

Read More

श्रीरामपुरात जलयात्रेतून घुमला जलसंवर्धनाचा संदेश:जलयात्रेचे श्रीरामपूरवासियांनी केले उत्साहात स्वागत, शहरात उत्साह अन् जल्लोषाचे वातावरण‎

Marathi News Local Maharashtra Ahmednagar The Message Of Water Conservation Spread Through The Jal Yatra In Shrirampur, The People Of Shrirampur Welcomed The Jal Yatra With Enthusiasm, There Was An Atmosphere Of Enthusiasm And Celebration In The City श्रीरामपूर4 तासांपूर्वी कॉपी लिंक श्रीरामपूर शहरात आज जलसंवर्धनाचा प्रभावी संदेश देणाऱ्या ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेचे…

Read More

कलमा न वाचल्याने चाकूहल्ला:मुंबईत पहलगामसारख्या हल्ल्याचा उलगडा; घरातून संशयास्पद साहित्य जप्त, ATSकडून तपासाला वेग

मुंबईजवळील मीरा रोड परिसरात घडलेल्या चाकूहल्ला प्रकरणाने आता अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. सुरुवातीला साधा गुन्हा वाटणाऱ्या या घटनेचा तपास आता दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला आहे. आरोपीच्या घरातून काही संशयास्पद आणि कट्टर विचारसरणीशी संबंधित साहित्य सापडल्याने तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ गुन्हेगारी नव्हे, तर व्यापक सुरक्षेच्या दृष्टीने पाहिले जात…

Read More

Jay Pawar Leads; Mitkari Tweet Sparks Stir

महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 30 एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ आली असताना, एका जागेसाठी 70 ते 75 जण इच्छुक असल्य . या चर्चेला आणखी बळ मिळाले ते आमदार अमोल मिटकरी यांच्या ट्विटमुळे. त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट…

Read More