महान ते पातूर मार्गावरील पूल खचला; वाढला अपघाताचा धोका:चारही बाजूंना धोकादायक वळण अन् पाणी साचल्याने वाढला धोका
महान ते पातूर या २८ किलोमीटर अंतराच्या मुख्य मार्गावरील लोहगड, धाबा, जनुना, राजनखेड, शेलगावसह अनेक खेड्यांतील नागरिक व विद्यार्थ्यांची दररोज मोठी वर्दळ असते. मात्र, महान येथील हनुमान मंदिरासमोरील पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, पूल खचल्याने या ठिकाणी भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे अर्धवट डांबरीकरण करण्यात आले, परंतू पुलाची साधी डागडुजीही…