Headlines

मुख्यमंत्री फडणवीस यांचे पालखेड विजय स्मारकास सर्वतोपरी सहकार्य:बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणास उपस्थित राहणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालखेड येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ऐतिहासिक विजय स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. स्मारकाच्या कामासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, स्मारक पूर्ण झाल्यानंतर उभारण्यात येणाऱ्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची तयारीही त्यांनी दर्शविली…

Read More

गरम रसात पडून 60 टक्के भाजलेला चिमुकला:हृदयाचे ठोके थांबूनही पुण्यातील डॉक्टरांनी दिले नवे आयुष्य

पुण्यात एका तीन वर्षांच्या बालकाला डॉक्टरांनी नवजीवन दिले आहे. घरात खेळताना गरम चिंचेच्या रसात पडून तो ६० टक्के भाजला होता. प्राथमिक उपचारादरम्यान त्याचे हृदयाचे ठोकेही थांबले होते. पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ४० दिवसांहून अधिक काळ उपचार करून त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. आता त्याला रुग्णालयातून सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला आहे. थेरगाव येथील रहिवासी असलेल्या हरीश…

Read More

तुमचे 'राजे' कधी मातोश्रीबाहेर पडले का?:मुंबईतले 65 नगरसेवकही तुमच्याकडे राहतील का बघा, नरेश म्हस्केंचा संजय राऊतांवर पलटवार

15 कोटींची आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष विलीनीकरणाची भाषा करणाऱ्या संजय राऊतांनी स्वतः किती कोटी रुपये घेतले, हे आधी स्पष्ट करावे, असे थेट आव्हान देत शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी राऊतांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला आहे. लोक पक्ष सोडून का जात आहेत याचा कधी विचार केला आहे का, असा सवाल करत तुमचे ‘राजे’ कधी…

Read More

हिंगोलीत वखार महामंडळाचा निष्काळजीपणा:पहिल्याच पावसात 40 हजार क्विंटल हरभरा भिजला!

हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सदोष गोदामा भाडेतत्वावर घेतल्याने पहिल्याच पावसाच गोदामातील ४० हजार क्विंटल हरभरा भिजल्याने नुकसान झाले. आता हरभरा पिकाचा साठा कलगाव (ता.हिंगोली) गोदामात हलविण्याचे काम सुरु असून त्यासाठी वाहतूक व हमालीचा लाखो रुपयांच्या भुर्दंड शासनाच्या माथी बसणार आहे. वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणाचा हा परिमाण असल्याचे बोलले जात आहे. हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये…

Read More

काँग्रेस भाजपची ‘ए टू झेड’ टीम:प्रकाश आंबेडकरांची टीका, म्हणाले- काँग्रेसला भाजपला हरवण्यात नव्हे, तर सौदेबाजीत रस

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि कॉंग्रेसवर गंभीर आरोप करत टीका केली आहे. भाजप आणि कॉंग्रेस एकच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याविषयी बोलताना त्यांनी नांदेड मतदारसंघातील उदाहरण देखील दिले आहे. तसेच कॉंग्रेस भाजपची ए टु झेड टीम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर ट्विट करत म्हणाले, भाजप = काँग्रेस याचे हे एक…

Read More

‘डरो मत… जे होणार ते होणारच’:6 खासदारांच्या बंडानंतर भास्कर जाधवांचा उद्धव ठाकरेंना सल्ला, भाजपवरही घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धीर देतानाच भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “डरो मत, बिलकुल डरो मत… जो होनेवाला वो होने ही वाला है,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना खंबीर राहण्याचा सल्ला दिला. उद्धव ठाकरेंच्या…

Read More

पक्षांतर करणाऱ्या खासदारांविरोधात 'इंडिया' आघाडी निदर्शनं करणार:काँग्रेसचा इशारा; जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी कडक इशारा दिला आहे की, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर आणि मोदी सरकारच्या विरोधात मतदान करून निवडून आलेल्या खासदारांनी भाजप-महायुतीत प्रवेश केल्यास तो जनतेचा विश्वासघात ठरेल. अशा परिस्थितीत, काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीचे कार्यकर्ते संबंधित खासदारांच्या घरांसमोर तीव्र निदर्शने करतील. तिवारी म्हणाले की, मोदी सरकारच्या असंवैधानिक आणि लोकशाहीविरोधी कृत्यांमुळे देशाची…

Read More

कल्याणी-पॅरामाउंटने 'सिंहा 4×4' चिलखती वाहन केले सादर:युरोसॅटरी 2026 प्रदर्शनात नव्या पिढीतील बहुउद्देशीय वाहनाचे अनावरण

भारत फोर्ज लिमिटेडची संरक्षण क्षेत्रातील उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) आणि पॅरामाउंट यांनी पॅरिस येथे आयोजित युरोसॅटरी २०२६ या जागतिक संरक्षण प्रदर्शनात ‘सिंहा ४x४’ या नव्या पिढीतील हलक्या चिलखती बहुउद्देशीय वाहनाचे अनावरण केले. हे वाहन संरक्षण दलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. भारत, आफ्रिका, दक्षिण आशिया आणि इतर जागतिक बाजारपेठेतील सशस्त्र दलांच्या…

Read More

नव्यानेच सुरू झालेल्या मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात:तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या, जीवितहानी टळली; वाहतूक विस्कळीत

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नव्यानेच सुरू झालेल्या मिसिंग लिंकवर असलेल्या पुलावर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, येथील महामार्गावर काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून तिन्ही गाड्या पुण्याच्या दिशेने निघाल्या होत्या. मिसिंग लिंकवरील केबल स्ट्रे पुलाजवळ तिसऱ्या मार्गिकेवर…

Read More

लोकशाहीच्या पतनाला कोर्टच जबाबदार!:ठाकरे गटातील फुटीनंतर ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उल्हास बापट यांची थेट सर्वोच्च न्यायालयावर टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींवर आता ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उल्हास बापट यांनी भाष्य करत थेट सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्षांतरबंदी कायद्याबाबत स्पष्ट आणि अंतिम भूमिका घेण्यात न्यायालयाने विलंब केल्यामुळेच देशातील राजकीय पक्षांमध्ये वारंवार फूट पडत असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील सहा…

Read More