एन्काउंटर स्पेशालिस्ट नेमून निवडणुका जिंकणे हा कसला पराक्रम?:संजय राऊतांचा मोदी-शाहांना सवाल, बच्चू कडूंच्या विलीनीकरणावरही शंका व्यक्त
देशातील निवडणूक प्रक्रिया आणि यंत्रणांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय नेते असतील, तर त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी अडीच लाख पॅरामिलिटरी फोर्स आणि एन्काउंटर स्पेशालिस्टची गरज का भासते?” असा सवाल करत राऊत यांनी भाजपच्या निवडणूक जिंकण्याच्या पद्धतीला ‘दहशतवाद’ असे…