Headlines

Nandurbar Road Condition Controversy; Minister Hassan Mushrif Angry Visit

नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गुजरातमधून महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर नंदुरबारमधील रस्त्यांची अवस्था पाहून आपल्याला लाज वाटली . गुजरात सोडल्यानंतर रस्ता फारच खराब रस्त्यांच्या परिस्थितीबाबत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, “आज बघितलं ते पाहून मी फार नाराज आहे. मला त्याची लाज वाटलेली…

Read More

महाराष्ट्राच्या पावसात पुन्हा बदल:कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार सरी, अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी

महाराष्ट्रात मान्सूनची स्थिती पुन्हा बदलताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील पावसावर होत असून, विविध भागांत पावसाचे प्रमाण वेगवेगळे राहण्याची शक्यता आहे. आज, 16 ऑगस्ट रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे….

Read More

जयकुमार गोरे निश्चितपणे कॉप्या करून पास झालेले मंत्री:पत्रकार परिषद घेताना थोडी कमी पीत चला; सुषमा अंधारेंचा जयकुमार गोरेंवर जोरदार पलटवार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यातील शाब्दिक युद्ध आता शिगेला पोहोचले आहे. जयकुमार गोरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावरून अत्यंत आक्रमक आणि जळजळीत भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. “जयकुमार गोरे हे निश्चितपणे कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत,” असा टोला लगावत अंधारे यांनी गोरेंच्या…

Read More

तुकाराम मुंढेंसारखे चांगले अधिकारी द्या, सगळे सुधारेल:चाकण एमआयडीसीवरून आदित्य ठाकरेंची मागणी, सरकारवरही साधला निशाणा

महाराष्ट्रातील हजारो कंपन्या बंद पडत असल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापले असताना, आता पुण्याच्या चाकण एमआयडीसीतील सुमारे 20 लघुउद्योजकांनी आपल्या कंपन्यांना टाळे ठोकण्याची प्रक्रिया सुरू केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एमआयडीसी परिसरातील अभूतपूर्व वाहतूक कोंडी, रस्त्यांची झालेली कमालीची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे वारंवार होणारे जीवघेणे अपघात या रोजच्या त्रासाला कंटाळून या उद्योजकांनी हा टोकाचा निर्णय…

Read More

तिरंगा हातात घेत संभाजीनगरच्या रस्त्यांवर तरुणाईची बाईक रॅली:दिव्य मराठी आणि धुरंधर मोटर्स क्लबचा उपक्रम, सुरक्षित राईडचा दिला संदेश

‘स्वातंत्र्यदिन’ म्हणजे केवळ ध्वजारोहण आणि देशभक्तीपर कार्यक्रम नव्हे, तर देशाप्रती असलेली आपली भावना व्यक्त करण्याचा दिवस. याच भावनेतून दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध उपक्रम राबवणाऱ्या ‘दिव्य मराठी’ने यंदाही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह अनोख्या पद्धतीने साजरा केला. ‘दिव्य मराठी’ आणि ‘धुरंधर मोटर्स क्लब’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सकाळी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने बाईक रायडर्स…

Read More

"तुम्ही नोकर आहात, नोकरांसारखे वागा":आमदार संतोष बांगर जिल्हा परिषदेच्या बैठकीत भडकले, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला सुनावले

आपल्या वक्तव्यांमुळे आणि कृतींमुळे कायम चर्चेत राहणारे हिंगोलीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची नुकतीच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चांगलीच खडाजंगी झाली. आरोग्य विभागातील बदल्यांच्या मुद्द्यावरून संतापलेल्या आमदार बांगर यांनी अधिकाऱ्यावर थेट शब्दांत हल्लाबोल करत, “तुम्ही नोकर आहात, त्यामुळे नोकरांसारखेच वागा,” अशा शब्दांत त्यांना भर बैठकीत सुनावले. या आक्रमक…

Read More

कौैठा:बालाजी देडगाव येथे हरिनाम सप्ताहाची सांगता

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तांबे वस्ती येथे संत नामदेव महाराज व संत सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता गुरुवारी स्वामी प्रकाशानंद महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात झाली. सप्ताहाच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, नामांकित कीर्तनकारांची कीर्तने व हरिनाम संकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परिसरातील भाविकांनी…

Read More

शक्तीपीठ महामार्गावरून शेतकरी संतप्त:हिंगोलीत बैठकीतच जोरदार घोषणाबाजी, पालकमंत्री बैठकीतून तडकाफडकी बाहेर

हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी ता. १५ आरोग्य विभागाच्या बैठकीत येऊन शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी गदारोळ वाढल्याने पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी बैठकीतून पोलिस बंदोबस्तात काढता पाय घेण्याची वेळ आली. त्यानंतर झिरवाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात जाऊन बसले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री झिरवाळ यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाची बैठक झाली. यावेळी खासदार रामराव वडकुते, खासकार नागेश पाटील…

Read More

अहिल्यानगर:जिल्ह्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या उल्लेखनीय, गुणवत्तापूर्ण आणि दीर्घकालीन निष्कलंक सेवेचा गौरव करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक, तर २७ पोलिस अधिकारी व अंमलदारांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपतींकडून शौर्यपूर्ण कामगिरी, उल्लेखनीय सेवा…

Read More

मी 100 गोळ्या खायला तयार, पण वडिलांच्या खुन्यांचा पर्दाफाश व्हावा:बिश्नोई गँगकडून आलेल्या धमकीनंतर झीशान सिद्दीकींचा संताप

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांच्या वांद्रे येथील कार्यालयाबाहेर निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेला आता काही महिने उलटून गेले असले तरी सिद्दीकी कुटुंबावरील संकटे थांबलेली नाहीत. बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे आमदार झीशान सिद्दीकी यांना पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची…

Read More