Headlines

ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन गिधाड:नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल, लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप

महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन टायगर’वरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन गिधाड आहे, असे म्हणत त्यांनी सत्तेसाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींवर निशाणा साधला. लोकशाही व्यवस्थेत जनता पक्षाला मत देते, मात्र सत्ताधारी इतर पक्षांतील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूने वळवून सत्तेचा माज दाखवत असल्याचा आरोप…

Read More

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला प्राथमिक विरोध:जातीय जनगणनेनंतरच निर्णय घेण्याची उपमहापौर परशुराम वाडेकर यांची मागणी

पुण्याचे उपमहापौर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे नेते परशुराम वाडेकर यांनी अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याला प्राथमिक विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते, यामुळे समाजात अंतर्गत फूट निर्माण होऊ शकते. मात्र, जर उपवर्गीकरण करणे अपरिहार्य ठरले, तर ते राष्ट्रीय जातीय जनगणना पूर्ण झाल्यानंतरच लोकसंख्येच्या अचूक प्रमाणावर आधारित असावे, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. केंद्रीय…

Read More

पिकांसाठी घातक हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रात्यक्षिक तयारी:खरीप हंगामाची कृषी विभागाकडून पूर्वतयारी‎

खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून हुमणी अळी नियंत्रण मोहिमेला गती देण्यात आली आहे. पूर्णानगर येथील शेतकरी उमेश महिंगे यांच्या शेतात तालुका कृषी अधिकारी उत्कर्षा भोसले यांच्या उपस्थितीत हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी पाणी फाउंडेशनच्या मेंटर रूपाली ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हुमणी अळीच्या…

Read More

उद्धवसेनेत पुन्हा फूट?:6 खासदारांच्या ‘दिल्ली मिशन’मुळे महाराष्ट्रात खळबळ; शिंदेही राजधानीत, आज निर्णायक हालचालींची शक्यता

महाराष्ट्राच्या राजकारणात २०२२ मधील शिवसेना फुटीनंतर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील तब्बल सहा खासदारांनी दिल्लीत तळ ठोकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हे खासदार स्वतंत्र संसदीय गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत असून, त्यासाठी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता…

Read More

25 राज्यांतील शेतकरी संघटनांचा ‘सिफा’ला एकमुखी पाठिंबा:सर्वोच्च न्यायालयातील कृषी नीतीच्या कायदेशीर लढ्याला देशव्यापी बळ देण्याचा केला संकल्प‎

कन्सोर्टियम ऑफ इंडियन फार्मर्स असोसिएशन्स अर्थात ‘सिफा’च्या राष्ट्रीय कार्यकारिणी समिती व पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक कापूसनगरी अकोला येथे पार पडली. या राष्ट्रीय अधिवेशनात देशातील विविध राज्यांतून आलेले प्रमुख शेतकरी नेते, कृषी तज्ज्ञ . या अधिवेशनात जेव्हा देशभरातून आलेल्या सर्व शेतकरी संघटनांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी आपण शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेला एकमुखी…

Read More

तिवसा शहरात चर्चांना उधाण; पानटपऱ्या झाल्या अचानक बंद:तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीमुळे भिती‎

शहरातील प्रमुख व्यापारी व रहदारीचा केंद्रबिंदू असलेल्या पेट्रोलपंप चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनेक पानटपऱ्या अचानक बंद दिसून येत असल्याने सध्या शहरात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, नेहमी दिवसभर गजबजलेल्या या चौकातील काही पानटपऱ्या आज सकाळपासूनच पूर्णपणे बंद आढळल्याने, संबंधित व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व इतर…

Read More

वयाचे बंधन नसून जिद्दीच्या जोरावर राबणारे हात घडवणार स्वतःचे भविष्य:शिक्षण पूर्ण करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे भाई सथ्था नाईटस्कूलमध्ये स्वागत

शिक्षणासाठी वयाची अट नसते आणि शिकण्याची जिद्द असेल तर कोणतीही परिस्थिती आडवी येत नाही, याचा प्रत्यय शहरातील ‘भाई सथ्था नाईट हायस्कूल’मध्ये येत आहे. विविध कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागलेल्या कष्टकऱ्यांसाठी ही शाळा आशेचा किरण ठरली असून, येथे वयाच . दिवसभर पोटापाण्यासाठी आणि कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी कठोर परिश्रम करायचे आणि रात्रीच्या वेळी हातात पुस्तक घेऊन वर्गात…

Read More

डिझेल विक्रीवरील निर्बंधांमुळे खरीप हंगाम संकटात:शेतकऱ्यांमध्ये संताप, शेतीसाठी डिझेल आणायचे कसे, नामपूरमधील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल‎

कॅन, ड्रम किंवा बाटलीत डिझेल-पेट्रोल विक्रीवर बंदी आणि एका वेळी मर्यादित इंधन वितरणाच्या नव्या नियमामुळे नामपूरसह परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. खरीप हंगामातील मशागत आणि पेरणीची कामे सुरू असताना कृषी पंप, जनरेटर आणि ट्रॅक्टरसाठी इंधन उपलब्ध करून देणे कठीण झाले असून, शेतीकामे खोळंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारत सरकारच्या आदेशानुसार आणि ११ जून २०२६…

Read More

पैठणला गोदावरीवर साकारणार 45 फुटी पूल‎:दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, पुलाची लांबी 900, तर रुंदी 40 फूट राहणार

पैठण गोदावरी नदीवरील पुलाची मागणी अखेर प्रत्यक्षात साकार होत आहे. श्री नाथ मंदिराजवळील पालखी ओटा ते जुने कावसान परिसराला जोडणारा हा पूल केंद्रीय मार्ग निधीतून उभारला जात असून त्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. . खासदार संदिपान भुमरे यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले आहे. या पुलाची एकूण लांबी सुमारे ९०० फूट, रुंदी…

Read More

दिलासा:कौटुंबिक जमीन मोजणी केवळ 200 रुपयांमध्ये, सरकारचा सर्वसामान्यांना दिलासादायक निर्णय

राज्य सरकारने जमीन मोजणीच्या प्रक्रियेत आणि शुल्कात मोठे बदल केले असून कुटुंबांतर्गत जमिनीच्या वाटणीची मोजणी आता केवळ २०० रुपयांत होणार आहे. सरकारी कार्यालयातील दिरंगाई आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोजणीची कडक कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या नवीन नियमानुसार, ग्रामीण भागात २ हेक्टरपर्यंतच्या…

Read More