ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन गिधाड:नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल, लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप
महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन टायगर’वरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन गिधाड आहे, असे म्हणत त्यांनी सत्तेसाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींवर निशाणा साधला. लोकशाही व्यवस्थेत जनता पक्षाला मत देते, मात्र सत्ताधारी इतर पक्षांतील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूने वळवून सत्तेचा माज दाखवत असल्याचा आरोप…