Headlines

‘अंबाडी’त केवळ 11 टक्के साठा; कन्नडला ग्रॅव्हिटीने पाणी येणे बंद:पंप खरेदी करणार, एक्सप्रेस फीडर कार्यान्वित‎

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी प्रकल्पातील जलसाठा ११ टक्क्यांवर पोहचला असून, शहराला १० ते १२ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यात जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ग्रॅव्हिटीने येणारे पाणी बंद झाले असून, मंगळवारी नगराध्यक्षा फरीन बेगम, मुख्याधिकारी रविंद्र लांडे, नगरसेवक अब्दुल जावेद यांनी धरणास भेट देत पंप हाऊससह वितरण प्रणालीची माहिती घेतली. पाणी वितरणात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे…

Read More

नाशिकच्या कश्यपी धरणामध्ये संगमनेर येथील दांपत्यासह 4 जणांचा बुडून मृत्यू:‘पप्पा-मम्मी’ म्हणत मुलगी पाण्याकडे बाेट दाखवत हाेती, तिला धावत जाऊन उचलले

नाशिक- हरसूल रस्त्यावरील कश्यपी धरणानजीक सुट्टीसाठी आलेले मखमलाबाद येथील सचिन कैलास ठोंबरे (३२), त्यांची गरोदर पत्नी रोहिणी ठोंबरे आणि त्यांच्यासोबत असलेली, शेजारी राहणारी दोन १६ व १४ वर्षीय मुले यांचा कश्यपी धरणात बुडून मृत्यू झाला. . संगीता घाडगे या महिलेने पाण्याजवळ धावत जाऊन ठोंबरे यांच्या दोन वर्षाच्या मुलीला वाचवले. त्यानंतर या महिलेने आरडाओरड करून घटनेची…

Read More

वाढीव हद्दीतून ‘7/12’ हद्दपार होऊन ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळणार:ग्रामीण ओळख पुसली जाणार, राज्य शासनाचा मोठा निर्णय, संभाजीनगरसह सर्वच महापालिकांना फायदा

राज्यातील शहरांचा विस्तार वेगाने होत असताना महापालिका आणि नगरपालिकांमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची ‘ग्रामीण’ ओळख आता कागदोपत्रीही पुसली जाणार आहे. या वाढीव क्षेत्रांमधील जमिनींचे ७/१२ उतारे आता कायमचे इतिहासजमा होणार असून, त्याऐवजी अधिकृत ‘प . मात्र, या नवीन हद्दींचे नगर भूमापन (सिटी सर्व्हे) रखडल्याने आजही तेथील जमिनींचा व्यवहार किंवा नोंदणी ७/१२ उताऱ्यांवरच होत होती. सिटी…

Read More

हितेंद्र ठाकूर यांची भेट न घेताच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना!:बविआ आणि शिवसेना शिंदे गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चेला तूर्तास पूर्णविराम

विधानपरिषद निवडणुकांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना पक्ष विलिनीकरणाचा प्रस्ताव देण्यात आला होता, ज्यानंतर कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करत विधानपरिषदेची आमदारकी मिळवली होती. त्याच धर्तीवर आता पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, पालघरमधील नेते आणि बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनाही शिंदेंकडून पक्ष विलिनीकरणाची ऑफर देण्यात आल्याची जोरदार…

Read More

‘सीतेची न सांगितलेली कथा’ पुस्तकाचे प्रकाशन 28 मे रोजी:रामायणातील कोड्यांची उत्तरे पुस्तकातून मिळणार

अमेरिकन ज्युईश लेखिका डेना मरियम यांच्या मूळ इंग्रजी पुस्तक ‘द अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता’ च्या मराठी अनुवादाचे प्रकाशन होणार आहे. ‘सीतेची न सांगितलेली कथा’ असे या मराठी पुस्तकाचे नाव असून, २८ मे २०२६ रोजी ते वाचकांच्या भेटीला येईल. मोतीलाल बनारसीदास पब्लिशर्स, भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन आणि माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More

चंद्रभागा नदीत 35 फूट खोल ट्रक कोसळला:घुईखेडजवळ भीषण अपघातात चालकाचा चमत्कारिक बचाव

चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेडजवळ सोमवारी नागपूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात घडला. चंद्रभागा नदीवरील पुलाचा कठडा तोडून एक ट्रक थेट ३५ फूट खोल नदीपात्रात कोसळला. या अपघातात ट्रकचा चेंदामेंदा झाला असला तरी, चालकाला साधे खरचटलेही नाही, हे विशेष. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक पुलावरून खाली पडताना सुमारे ३५ फूट खोल नदीपात्रात आदळला….

Read More

अमरावती विधानसभेत 24 टक्के मतदारांचे एसआयआर मॅपिंग अपूर्ण:निवडणूक विभागाने चिंता व्यक्त करत तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

अमरावती विधानसभा मतदारसंघात अद्यापही २४ टक्के मतदारांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मॅपिंग पूर्ण झालेले नाही. या स्थितीमुळे निवडणूक विभागाने चिंता व्यक्त केली असून, ज्या मतदारांचे मॅपिंग बाकी आहे, त्यांनी तातडीने आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम २०२६ अंतर्गत अमरावती विधानसभा मतदारसंघात पूर्वतयारी सुरू…

Read More

पिंपरी बुद्रूक शिवारात विज पडून 15 वर्षाचा मुलगा ठार:एक महिला गंभीर जखमी, उपचारासाठी नांदेडला हलविले

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक शिवारात विज पडून एक १५ वर्षाचा मुलगा ठार तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी ता. २६ घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या महिलेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी येथील आनंद नागोराव जाधव (१५) व कमलबाई…

Read More

नशामुक्तीचा संदेश घराघरात पोहोचावा:मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश; मुंबई शहर व उपनगरात मोहिमेला वेग

नेस्को येथे ड्रग्सच्या सेवनामुळे घडलेल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, कॅबिनेट मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई पालिका क्षेत्रात संपूर्ण वर्षभर नशा मुक्ती अभियान राबवण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने गृह विभागाने शासन निर्णय…

Read More

विधान परिषद निवडणूक: दोन दिवसांत 39 अर्जांची उचल:अमरावती मतदारसंघात 11 उमेदवारांसाठी 23 अर्ज नेले

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण ३९ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली आहे. मंगळवारी, दुसऱ्या दिवशी ११ उमेदवारांसाठी २३ अर्ज नेण्यात आले. सोमवारी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी १६ अर्जांची उचल झाली होती. त्यानंतर मंगळवारी आणखी २३ अर्ज नेण्यात आल्याने एकूण संख्या ३९ वर पोहोचली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोंदीनुसार, महायुती…

Read More