‘अंबाडी’त केवळ 11 टक्के साठा; कन्नडला ग्रॅव्हिटीने पाणी येणे बंद:पंप खरेदी करणार, एक्सप्रेस फीडर कार्यान्वित
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी प्रकल्पातील जलसाठा ११ टक्क्यांवर पोहचला असून, शहराला १० ते १२ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यात जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ग्रॅव्हिटीने येणारे पाणी बंद झाले असून, मंगळवारी नगराध्यक्षा फरीन बेगम, मुख्याधिकारी रविंद्र लांडे, नगरसेवक अब्दुल जावेद यांनी धरणास भेट देत पंप हाऊससह वितरण प्रणालीची माहिती घेतली. पाणी वितरणात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे…