संत मुक्ताई पालखी तीन दिवसांत भूवैकुंठ पंढरपुरात होणार दाखल:आष्टी-जवळा मुक्कामानंतर आज शेंद्रीकडे वाटचाल
आदिशक्ती संत मुक्ताईचा ३१८ वा आषाढी वारी पालखी सोहळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अवघ्या तीन दिवसांत संत मुक्ताईंची पालखी विठुरायाच्या पवित्र पंढरीत दाखल होईल. २४ जून रोजी कोथळी येथील संत मुक्ताई मूळ मंदिरातून चांदीच्या रथात संत मुक्ताईंच्या चांदीच्या पादुका घेऊन प्रस्थान केलेला हा सोहळा भक्ती, सेवा आणि समतेचा संदेश देत सहा जिल्ह्यांतून मार्गक्रमण करत…