गारपीटग्रस्त कांदा, केळी उत्पादक मदतीच्या प्रतीक्षेत
अंजनगाव बारी मे महिन्यातील वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपीटमुळे अंजनगाव बारी परिसरातील केळी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण होऊन दोन महिने उलटले तरी अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. केळी उत्पादक शेतकरी निखिल श्रीकृष्ण भोपळे यांच्या दोन एकरांतील सुमारे १,८०० केळीची खोडे वादळात…