Headlines

मुंबईला ड्रग्जचा विळखा:अंधेरीत घरावर छापेमारीतून 30 कोटींचे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त, नेस्को’ कॉन्सर्टमधील २ विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे ड्रग्जविरोधी अभियानावर सवाल

नशामुक्त महाराष्ट्राच्या दाव्यांना मुंबईतील ताज्या घटनांनी जोरदार चपराक लगावली आहे. एका बाजूला गोरेगावमध्ये आयोजित एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या दोन २४ वर्षीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे; तर दुसरीकडे पोलिसांनी अंधेरीत मोठी कारवाई करत चक्क १३ हजार रुपये भाड्याच्या खोलीतून तब्बल ३० कोटी रुपयांचे ‘एमडी’ ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. एकापाठोपाठ उघडकीस…

Read More

संजिता महापात्र यांना निरोप, सत्यम गांधींचे स्वागत:अरावती जि.प. मध्ये जुन्या-नव्या सीईओंच्या आदरातिथ्याचा सोहळा संपन्न

अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजिता महापात्र यांना नुकताच निरोप देण्यात आला, तर नवनियुक्त सीईओ सत्यम गांधी यांचे स्वागत करण्यात आले. महापात्र यांची सांगली-मीरज-कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात हा निरोप आणि स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना संजिता महापात्र भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, “आतापर्यंतच्या प्रशासकीय…

Read More

Maharashtra Heatwave SOPs Issued; 15 High-Risk Districts Under Focus

राज्यात वाढत्या तापमानाचा पारा ४७ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असताना, नागरिकांच्या आणि विशेषतः ऊन-वारा अंगावर सोसणाऱ्या घटकांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सतर्कतेन . आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी या एसओपींची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये…

Read More

भारत-अमेरिका कराराविरोधात शेतकरी, मजूर, कामगारांचे आंदोलन:किसान सभेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

महाराष्ट्र राज्य किसान सभा, महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन आणि कामगार संघटनांचा महासंघ असलेल्या आयटकच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. भारताने अमेरिकेसोबत केलेला ‘ट्रेड डील’ कृषी व व्यापारविषयक करार शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी घातक असल्याने तो रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात…

Read More

अमरावतीत 876 लखपती थकबाकीदारांची नावे जाहीर:मनपाने पहिल्यांदाच प्रसिद्ध केली यादी, रक्कम भरण्याचे आवाहन

अमरावती महानगरपालिकेने एक लाख रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर थकबाकी असलेल्या ८७६ मालमत्तांची यादी जाहीर केली आहे. पालिकेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले असून, थकबाकीदारांना तातडीने रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही यादी झोन क्र. १ ते ५ मधील संपूर्ण शहरातील मालमत्तांची आहे. महानगरपालिका आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी पालिकेच्या महसुलात वाढ करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे….

Read More

देवाभाऊ काय चाललंय तुमचं?:1 किमी रस्त्याला 254 कोटी कशासाठी लागतात? शक्तीपीठवरून राजू शेट्टींचा फडणवीसांना सवाल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या वाढीव अंतरावरून आणि त्यापोटी फुगलेल्या हजारो कोटींच्या खर्चावरून सरकारला धारेवर धरले आहे. “देवाभाऊ, फोंड्या माळावर १ किलोमीटर रस्ता करण्यासाठी २५४ कोटी रुपये कशासाठी लागतात? हा रस्ता काय ट्रम्प तात्यांचे डॉलर वापरून बनवणार आहात का?”असा सवाल राजू शेट्टी यांनी केला असून, या प्रकल्पातून ७० हजार कोटींचा ‘ढपला’…

Read More

डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद:मोतीबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात 100 जणांनी केले रक्तदान

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोतीबाग कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेतर्फे आयोजित या शिबिरात १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे या शिबिराचे चौथे वर्ष होते. शिबिराचे उद्घाटन शाश्वत अकॅडमीचे संचालक महेश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी बोलताना पाटील…

Read More

शहागंज, बायजीपुरा, टीव्ही सेंटरमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित:उन्हाळ्यात नागरिक त्रस्त; तांत्रिक बिघाडामुळे रात्री उशिरापर्यंत वीज गायब

छत्रपती संभाजीनगर शहरात उन्हाचा पारा वाढत असताना, शहागंज, राजाबाजार, बायजीपुरा, जाधवमंडी आणि टीव्ही सेंटर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सोमवारी शहागंज परिसरात तांत्रिक बिघाडामुळे तीन तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला होता, जो मध्यरात्री १२ वाजता पूर्ववत करण्यात आला. सोमवारी सायंकाळी ४ वाजता मौलाना आझाद चौकातील…

Read More

अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट:8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकरांचे धक्कादायक दावे; बनावट खाती की मोठा घोटाळा?

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी गती वाढवली असून, या प्रकरणात संशयित म्हणून समोर आलेल्या प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी आठ तास चौकशी केली. या दीर्घ चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना प्रतिभा चाकणकर यांनी अनेक महत्त्वाचे दावे केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांनी कधीही समता पतसंस्थेत खाते उघडले नाही किंवा त्या संस्थेत गेल्याच नाहीत. तसेच त्यांच्या…

Read More

उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे:बाबासाहेबांचे मिशन पुढे नेण्याची गरज; सातारा परिसरात भीम जयंतीच्या निमित्ताने वैचारिक उलाढाल

सातारा परिसरातील नाथ टॉवर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती वैचारिक देवाण-घेवाणीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांचे मिशन पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याची उत्कट भावना व्यक्त करण्यात आली. सोसायटीच्या अध्यक्षा स्वाती धनशेट्टी (शिंदे) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक सुशीला घोडके, नाथ मल्टिस्टेट बँकेचे संचालक…

Read More