सरकारने कर्जमाफी करताना जाचक निकष लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली:खुडसरगावचे शेतकरी आक्रमक, फसव्या कर्जमाफीचा निषेध
सत्ता मिळवण्यासाठी २०२४ च्या निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांना ‘सरसकट कर्जमाफी’चे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता आल्यानंतर शासनाने कर्जमाफी करताना अनेक जाचक निकष लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारचे हे धोरण म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा करणारा प्रकार असून, सरकारने दिलेले आश्वासन तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे. आज खुडसरगाव येथे…