विरोधी खासदारांना विकास निधी नाकारल्यास काँग्रेसचा सविनय कायदेभंग आंदोलनाचा इशारा:निधी मिळत नव्हता हे सांगणे म्हणजे सरकारचीच पोलखोल- गोपाळ तिवारी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सत्ताधारी भाजप-महायुतीवर गंभीर आरोप केला आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये विकास निधी अडवून सूडबुद्धीचे राजकारण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले. ही वागणूक अशीच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील जनता ‘सविनय कायदेभंग’ आणि ‘असहकार आंदोलन’ पुकारण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा तिवारी यांनी दिला आहे. तिवारी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना…