Headlines

हिरुड शहापुर येथील शेतकरी बघणे यांना शेतीनिष्ठ पुरस्कार:शेतकऱ्यांशी आपुलकीचे नाते जपणारे म्हणून ओळख‎

नजिकच्या हिरुड, शहापूर येथील युवा, प्रगतशील शेतकरी तसेच दत्तपूर्णा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष उमेश बघणे यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशस्वीतेबद्दल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावात जाऊन बघणे यांचा सत्कार केला. यावेळी प्रगतशील शेतकरी दत्तात्रय किटुकले, सरपंच विजयराव राऊत, गौरव वैद्य, विलासराव देशमुख…

Read More

ध्येय निश्चित असेल तर संकटांवर मात करत यश नक्कीच मिळते, आमदार डॉ. किरण लहामटे यांचे प्रतिपादन, गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सन्मान‎

जीवनात ध्येय निश्चित असेल तर संकटे, अडथळे आले तरी यशासाठी विचलित न होता मेहनत घेऊन सातत्यपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले. अकोलेतील श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटी संचलित अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. लहामटे बोलत होते….

Read More

कान्होरी जि. प. शाळेचा लवकरच‎‎ कायापालट:ग्रामस्थांनी दिली देणगी,‎ विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा देण्याचा उद्देश

फुलंब्री ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एस. एम. सेहगल फाउंडेशनच्या ‘ट्रान्सफॉर्म लाइव्ह्ज’ प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्होरी, ता. फुलंब्री येथे दुरुस्ती व नूतनीकरण कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासात आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यात शाळेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. याच भावनेतून या शाळेचा कायापालट करण्यासाठी…

Read More

शेतकऱ्यांना दिलासा:पैठण तालुक्यात पावसाच्या हजेरीमुळे खरीप पेरणीस वेग‎, तालुक्यात सरासरी 26.9 मि.मी. पाऊस

गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने आणि पावसाच्या दीर्घ प्रतीक्षेने कोरड्या पडलेल्या पैठण तालुक्याला अखेर दोन दिवसांच्या समाधानकारक आणि सर्वदूर झालेल्या भिज पावसाने मोठा दिलासा दिला आहे. या दमदार हजेरीमुळे खरीप पेरण्यांच्या कामांना वेग आला आहे. जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी वरुणराजाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग कमालीचा चिंतेत सापडला होता. दुबार पेरणीचे संकट…

Read More

पैठणमध्ये महेश नवमी उत्साहात साजरी‎:पर्यावरणपूरक ईव्ही बाइक रॅलीचे मुख्य आकर्षण, आतषबाजीत भगवान महेश यांची शोभायात्रा

येथे माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त धार्मिक विधी, विविध स्पर्धा, समाजभूषणांचा गौरव आणि भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. वाढते प्रदूषण लक्षात घेता यंदा प्रथमच काढण्यात आलेली पर्यावरणपूरक ईव्ही (इलेक्ट्रिक) बाईक रॅली हे यंदाच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. सकाळी बालाजी मंदिर आणि हरिहरेश्वर मंदिर येथे मंत्रघोषात भगवान महेश यांच्या मूर्तीचा…

Read More

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू:हजाराे शिक्षकांना नागपूर खंडपीठाचा दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो कर्मचाऱ्यांचा प्रदीर्घ लढा यशस्वी ठरला आहे. न्या. अनिल पानसरे आणि न्या. रजनीश व्यास यांच्या खंडपीठाने रामाशंकर मिश्रा व इतर शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या याचिकांवर हा दिलासादायक निकाल दिला. दत्तात्रय बोरसे प्रकरणाचा…

Read More

आषाढीच्या पूजेला येताय, जनाची नाही मनाची लाज वाटू द्या:रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. पंढरपूरला येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांनी एकदा नाही तर दोन वेळा विचार केला पाहिजे, असा टोला लगावताना रोहित पवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले. ते म्हणाले, “आषाढीच्या पूजेला येताय आणि या पवित्र भूमीत दिलेला…

Read More

महाराष्ट्राने घरकुल बांधकामात रचला नवा इतिहास:एका वर्षात 6 लाखांहून अधिक घरे पूर्ण, पुढील वर्षात 15 लाख घरं बांधली जातील- जयकुमार गोरे

राज्यातील घरकुल योजनांच्या अंमलबजावणीबाबत आज विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी महाराष्ट्राने घरकुल बांधकाम क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केल्याची माहिती दिली. जयकुमार गोरे म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मागील आठ वर्षांत महाराष्ट्रासाठी केंद्र शासनाकडून 10 लाख 26 हजार घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांमुळे…

Read More

Maharashtra Road Safety Top Priority

राज्यातील नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून रस्ते विकासाबरोबरच रस्ते सुरक्षा हा प्रत्येक प्रकल्पाचा अविभाज्य भाग आहे. राज्यातील अपघातप्रवण मार्गांवर आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोज . रायगड जिल्ह्यातील पोलादपूर–महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले…

Read More

मराठी शाळा वाचवा अभियान 30 जूनपर्यंत:शिक्षण बचाव समन्वय समितीतर्फे जिल्ह्यात राबवले जाणार

राज्य शासनाच्या कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या एकत्रीकरण आणि बंद करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, शिक्षण बचाव समन्वय समितीने अमरावती जिल्ह्यात ‘मराठी शाळा वाचवा अभियान’ सुरू केले आहे. हे अभियान २४ जूनपासून ३० जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने राबवले जाईल. समितीच्या मते, शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण आणि विशेषतः आदिवासी भागातील शिक्षण धोक्यात आले आहे. या धोरणाचा सर्वाधिक फटका ग्रामीण, आदिवासी…

Read More