Headlines

विकास लवांडे नकली लोकांचे बुरखे फाडण्यात यशस्वी:त्यांच्यावर झालेली शाईफेक हा त्यांचा विजय, सुषमा अंधारे यांनी केले कौतुक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेली शाईफेक हा त्यांचा विजय असल्याचा दावा केला आहे. आज विकास लवांडे यांच्यासोबत जे काही आळंदीत घडले, ते एका अर्थाने त्यांचा विजयच आहे. कारण वारकरी संप्रदायाच्या नावाखाली झालेली घुसखोरी आणि ज्यांना वारकरी संप्रदायाचा नेमका विचारच कळला नाही अशा…

Read More

पुण्यात डेटिंग ॲपद्वारे लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश:वारजे माळवाडी पोलिसांनी ३० मिनिटांत आरोपींना केली अटक

पुणे शहरात ‘गे डेटिंग अँड चॅट’ या मोबाईल ॲपचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढून त्यांची लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी या प्रकरणी अवघ्या अर्ध्या तासात दोन आरोपींना जेरबंद केले आहे. यात एका सज्ञान आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या एका अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदार तरुणाला…

Read More

कॉर्पोरेट जिहाद:41 दिवसांपासून फरार निदा खानला नाशिकच्या एका राजकीय पदाधिकाऱ्यानेही दिला होता आश्रय

टीसीएस कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद आणि महिला कर्मचाऱ्यांच्या शोषण प्रकरणात 25 मार्चपासून 7 मेपर्यंत (तब्बल 41 दिवस) फरार निदा खानच्या अटकेमुळे अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येणार आहेत. यात तिचा मलेशियातील संपर्क, तेथील मानवी तस्करीचा समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर निदाला जुन्या नाशिकमधील एका राजकीय पदाधिकाऱ्याने आश्रय दिला होता. हा पदाधिकारी एका राष्ट्रीय पक्षाचा असल्याचे प्राथमिक तपासात…

Read More

NCP शरद पवार गटाच्या विकास लवांडेंवर शाईफेक:संग्राम भंडारे, गोरक्षकांचे कृत्य; वारकरी संप्रदायातील घुसखोरांचा वाद चिघळला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आज हभप संग्राम भंडारे व काही गोरक्षकांनी आज सकाळी 10 च्या सुमारास शाईफेक करण्यात आली. विकास लवांडे गत काही दिवसांपासून वारकरी संप्रदायातील घुसखोरांचा मुद्दा लावून धरला होता. त्यांनी या प्रकरणी घुसखोर ‘हभप’ची एक यादीही जाहीर केली होती. यामुळे चिडलेल्या संग्राम भंडारे व त्यांच्या समर्थकांनी आज त्यांच्यावर…

Read More

मुंबईतील कुटुंब मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा:फॉरेन्सिक अहवालानंतर तज्ज्ञ डॉक्टरांची नवी चौकशी; पायधुनी मृत्यूकांडात वळण

मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या डोकाडिया कुटुंबाच्या सामूहिक मृत्यू प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, फॉरेन्सिक तपासात या चौघांच्या शरीरात ‘झिंक फॉस्फाईड’ हे विषारी रसायन आढळून आल्यानंतर संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या दोन मुली आयशा व झैनब यांचा संशयास्पद…

Read More

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात महिला आयोगाच्या 25 शिफारशी:मुख्यमंत्री फडणवीसांकडे सविस्तर अहवाल सादर; धर्मांतर प्रकरणात नवे खुलासे

नाशिकमधील गाजलेल्या टीसीएस प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला असून, या अहवालानंतर तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा, कथित धर्मांतराचे आरोप, तसेच पीडित महिलांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आयोगाने अनेक गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. मुख्यमंत्री फडणवीस…

Read More

दोन एकरातील 1800 केळीच्या झाडांचे नुकसान:पंचनामा, तातडीच्या मदतीची शेतकऱ्यांची मागणी‎

अंजनगाव बारी परिसरात अचानक आलेल्या वादळी पावसासह गारपीटीने केळी पिकाचे अक्षरशः वाटोळे केले आहे. सर्व्हे क्र.३९९/१ मधील शेतकरी निखील श्रीकृष्ण भोपळे यांच्या शेतात तब्बल २ एकर क्षेत्रावर उभे असलेले केळी पीक नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडले. शेतकरी भोपळे यांच्या शेतातील २६५० केळीच्या झाडांपैकी सुमारे १६०० ते १८०० खोडांचे वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे नुकसान झाले असून, प्रति…

Read More

फडणवीस सरकारचा भूमिपुत्रांना मोठा दिलासा:जिल्हा बँक भरतीत 70 टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव; ग्रामीण तरुणांसाठी संधी

राज्यातील भूमिपुत्रांसाठी फडणवीस सरकारने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रियेत आता संबंधित जिल्ह्यातील स्थानिक युवकांना मोठे प्राधान्य दिले जाणार आहे. सहकार विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील भरतीमध्ये 70 टक्के पदे त्या जिल्ह्यातील मूळ रहिवाशांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित 30 टक्के जागांसाठी इतर जिल्ह्यांतील उमेदवारांना…

Read More

11 शाळांचा निकाल 100 टक्के:दर्यापूर तालुक्याचा 92.83 टक्के निकाल; 2139 विद्यार्थी झाले उत्तीर्ण, यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाकडून स्वागत‎

माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल शुक्रवारी ८ मे रोजी दुपारी आँनलाईन जाहीर झाला आहे. या निकालात दर्यापूर तालुक्याचा निकाल ९२.८३ टक्के लागला आहे. परिक्षेत बसलेल्या २३२३ विद्यार्थ्यांपैकी २१३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. आदर्श हायस्कूल, दर्यापूरचा निकाल १०० टक्के लागला असून प्रबोधन विद्यालयाने ९५.४९ टक्के निकाल मिळवला आहे. दारापूर हायस्कूल, दारापूरचा निकाल ८९.३६…

Read More

प्रगती:हातरुण ग्रामपंचायतीमध्ये नोंदींसह विकासकामांची पाहणी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत माेहिम

बाळापूर तालुक्यातील हातरुण ग्राम पंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांची समीक्षा करण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या निरीक्षण समितीने भेट दिली. या भेटीदरम्यान समितीने ग्रामपंचायत कार्यालयातील ऑफलाइन व ऑनलाइन नोंदींची सखोल तपासणी केली. गावामध्ये प्रत्यक्ष राबविण्यात आलेल्या विकासकामांची पाहणी केली. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पंचायत समितीकडून आलेल्या या निरीक्षण समितीत अध्यक्ष एच. बी. गौतम( गट…

Read More