Headlines

रितेशच्या ‘राजा शिवाजी’ने 50 कोटींचा टप्पा पार केला:टॉप-5 मराठी चित्रपटांत समाविष्ट; राज्यात करमुक्त करण्याची मागणी

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी (मंगळवारी) चित्रपटाच्या कमाईत थोडी घट दिसून आली. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, मंगळवारी चित्रपटाने मराठी व्हर्जनमध्ये सुमारे ३.३५ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन…

Read More

हिंगोलीत गुटख्याची वाहतूक करणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात:एक लाखाचा मुद्देमाल जप्त; शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

हिंगोली शहरात दुचाकी वाहनावर बेकायदेशीररित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांच्या पथकाने रविवारी तारीख 28 सायंकाळी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एका दुचाकीसह गुटखा असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती हिंगोली शहरात काहीजण दुचाकी वाहनावर गुटखा वाहतूक करून पानटपरी चालकांना देत असल्याची माहिती हिंगोली…

Read More

Sunetra Pawar Unveils Ajit Pawar Statue & Inaugurates Exhibition

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी बारामती येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचेही उद्घाट . नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांच्यासह कुटुंबीय, जय पवार आणि अनेक समर्थक उपस्थित होते. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुनेत्रा पवार…

Read More

पैठण उद्यानातील संगीत कारंजे बंद होण्याची शक्यता:स्वच्छताही रखडली, स्थानिक अधिकारी हतबल, वरिष्ठांचे दुर्लक्ष, अपुऱ्या मनुष्यबळाचा परिणाम‎

पैठण येथील ३१० एकर क्षेत्रातील संत ज्ञानेश्वर उद्यान ‘दिव्य मराठी’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पुन्हा सुरू झाले आहे. तरी सध्या उद्यानातील व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दररोज हजारो पर्यटक उद्यानाला भेट देत असताना, मूलभूत सुविधांचा अभाव आणि . पाटबंधारे विभागाच्या ताब्यात असलेल्या या उद्यानाकडे संभाजीनगर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उद्यान विकास समितीने केला आहे….

Read More

खरात प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा:तिवस्यात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका

नाशिक येथील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तिवसा येथे विविध राजकीय पक्षांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईसह देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे. निवेदन देण्यापूर्वी झालेल्या बैठकीत एक ठराव मांडण्यात आला. या ठरावानुसार, स्वतःला सिद्धपुरुष म्हणून सादर करणाऱ्या खरातने राजकीय पाठबळाच्या…

Read More

रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेची खाजगी वाहनातच प्रसूती:औंढा नागनाथमधील प्रकरणात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

औंढा नागनाथ तालुक्यातील काशीतांडा येथील गरोदर महिलेस रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे. याप्रकरणी संबंधितांकडून खुलासे मागविले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. औंढा नागनाथ तालुक्याती काशीतांडा येथील गरोदर महिला इंदूर राठोड यांना प्रसूती कळा येत असल्याने त्यांना तातडीन उपचारासाठी रुग्णालयात जाणे…

Read More

हिंगोली जिल्हा परिषदेत प्रशासकीय फेरबदल:गेल्या 10 वर्षांपासून रखडलेल्या विभाग बदल्या अखेर पूर्ण

हिंगोली जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमधून मागील पाच वर्षापासून एकाच विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विभाग बदल्या करण्यात आल्या असून त्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी बुधवारी ता.1 काढले आहेत. या विभाग बदल्यांमुळे जिल्हा परिषद बदल्यांनी ढवळून निघाली आहे. हिंगोली जिल्हा परिषदेचा पदभार हाती घेतल्यापासून जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सातत्याने…

Read More

शिक्षक भरती आणि समायोजनाबाबत सरकारची मोठी माहिती:मंत्री जयकुमार गोरे म्हणाले- पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय हे शक्य नाही!

राज्यातील शिक्षक भरती, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आणि पदोन्नती प्रक्रियेबाबत विधानसभेत महत्त्वाची माहिती देण्यात आली. भाजप आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री जयकुमार गोरे यांनी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लवकर करण्याच्या सूचना संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) दिल्या जातील, मात्र त्यापूर्वी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. मंत्री जयकुमार…

Read More

बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकालाच विलंब का?:युद्धाचे कारण पुढे करून इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाला मुदतवाढ -विजय वडेट्टीवार

आखातातील युद्धामुळे मुंबईतील इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम आणखी वर्षभर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत सरकार महामानवांच्या विचारांप्रती अनास्था का बाळगत आहे? असा सवाल केला आहे. आखात इराण विरुद्ध अमेरिका – इस्त्रायल युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे तांबे व स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला…

Read More

दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठी अण्णा हजारे मैदानात:अहिल्यानगरात आज मौन धरणे आंदोलन; पंतप्रधान मोदींना पाठवले पत्र

नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भक्कम पाठिंबा दिला आहे. देशात लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांना दडपशाहीने चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत, अण्णा हजारे आज अहिल्यानगरमध्ये एक दिवसीय ‘मौन धरणे’ आंदोलन करणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र…

Read More