जि.प. तयार करणार आरोग्य संपन्न गाव:सीईओंचे वर्षभराच्या आराखड्याचे निर्देश, कार्यशाळेस जिल्हाभरातून मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्य शासनाचे ‘माझं गाव-आरोग्य संपन्न गाव’अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी योग्य आखणी आणि सूक्ष्म नियोजन करून ग्रामस्तरीय समित्या सक्रिय करा. पुढे याच समित्या अधिक सक्षम करण्यासाठी तालुका स्तरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करुन वर्षभराचा आराखडा तयार करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी येथे केले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत स्थानिक ग्रामसेवक…