कर्जमुक्तीसाठी सरकारविरोधात संतापाचा उद्रेक!:आंदोलक शेतकऱ्याने दुचाकी पेटवली; नेत्यांच्या गाड्या जाळण्याचा इशारा
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र, या कर्जमाफीत लादण्यात आलेल्या जाचक अटी आणि शर्तींमुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडल्याच आरोप केला जात आहे. कोणत्याही अटीविना ‘सरसकट कर्जमाफी’ मिळावी, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनांचे लोण पसरत असून, वाशिम जिल्ह्यातील अडोळी येथे एका संतप्त शेतकऱ्याने शासनाचा निषेध करत भररस्त्यात स्वतःची दुचाकी…