लैंगिक अत्याचाऱ्याला पॅरोल नाही, कायद्यात बदल करणार- फडणवीस:नसरापूर येथील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारचा प्रयत्न
नसरापूर येथे बालिकेवरील अत्याचार प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कठोर पवित्रा घेतला आहे. लैंगिक अत्याचारातील आरोपींना पॅरोलवर सोडू नये, यासाठी कायद्यात बदलासाठी प्रस्ताव आणण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी विधी व न्याय विभागाला दिले आहेत. दरम्यान, नसरापूर प्रकरणातील लैंगिक अत्याचारानंतर हत्या झालेल्या ४ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचे कारण ‘श्वास गुदमरल्याने’झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे, असे पोलिसांनी…