Headlines

मागासवर्गीय मंत्र्यांनी झोप काढली का?:राज्य सरकारच्या निर्णयावर हरिभाऊ राठोड संतप्त; आरक्षणावर नव्या वादाची ठिणगी

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत स्पर्धा परीक्षांमधील राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, त्यावरून आता राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. शासनाकडून वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा परीक्षेस बसण्याच्या संधीमध्ये सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाही, असे नव्या धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयानंतर सामाजिक आणि…

Read More

CM Fadnavis Reverses Shinde Govts 11 Lake Project Decision; Environment Dept Order

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणखी एक निर्णय फिरवला आहे. सरकारने शिंदेंच्या काळातील 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द करून या कामांसाठी आतापर्यंत वितरित केलेला 91 . राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विभागाने 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे. या प्रकल्पांत एकनाथ शिंदे…

Read More

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला:वरळीतील गोंधळावरून विजय वडेट्टीवारांचा बोचरा वार, रोहित पवारांचीही टीका

वरळी येथे महायुतीच्या ‘आक्रोश मोर्चा’मुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना खरीखोटी सुनावली. या प्रकरणावरून आता विरोधकांकडून भाजपवर निशाणा साधण्यात येत आहे. “भाजपच्या फोकनाड घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा ‘इथून चालते व्हा’ हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला,” अशा बोचऱ्या शब्दांत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीकास्त्र…

Read More

11 शाळांचा निकाल 100 टक्के:दर्यापूर तालुक्याचा 92.83 टक्के निकाल; 2139 विद्यार्थी झाले उत्तीर्ण, यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाकडून स्वागत‎

माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल शुक्रवारी ८ मे रोजी दुपारी आँनलाईन जाहीर झाला आहे. या निकालात दर्यापूर तालुक्याचा निकाल ९२.८३ टक्के लागला आहे. परिक्षेत बसलेल्या २३२३ विद्यार्थ्यांपैकी २१३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. आदर्श हायस्कूल, दर्यापूरचा निकाल १०० टक्के लागला असून प्रबोधन विद्यालयाने ९५.४९ टक्के निकाल मिळवला आहे. दारापूर हायस्कूल, दारापूरचा निकाल ८९.३६…

Read More

अवधूत महाराजांचे झेंडे 300 किलोमीटरची यात्रा पूर्ण करून परतले:कौंडण्यपूर येथे झेंडा जीर्णोद्धार पथयात्रेचा भक्तिमय वातावरणात समारोप

तालुक्यातील रुक्मिणीचे माहेरघर आणि विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे श्री अवधूत महाराजांच्या झेंडे जीर्णोद्धाराच्या रथयात्रेचा नुकताच समारोप झाला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते. या पथयात्रेची सुरुवात १० ऑक्टोबर रोजी सकाळी श्रीसंत अवधूत महाराज चातूर्पती देवस्थान कौंडण्यपूर येथून झाली होती. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक अग्रणी नाव म्हणजे संत…

Read More

आसाममध्ये पुन्हा मुख्यमंत्री होतील हिमंता:आमदार दलाच्या बैठकीत नेते निवडले गेले, 12 मे रोजी पदाची शपथ घेतील

आसामचे पुढील मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा असतील. रविवारी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. जेपी नड्डा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. हिमंता 12 मे रोजी सकाळी 11 वाजता तिसऱ्यांदा आणि भाजप नेते म्हणून सलग दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. 4 मे रोजी आलेल्या निकालांमध्ये भाजपने राज्यातील 126 पैकी 82 जागांवर दणदणीत विजय मिळवला…

Read More

अहिल्यानगर जिल्हा आता कबड्डीची पंढरी- कीर्तीकर:अहिल्यानगरच्या खेळाडूंचे कौतुक; राज्यस्तरीय विजेत्यांचा सत्कार, आता "टीम इंडिया''चे वेध‎

गेल्या पाच वर्षांत अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघाने राज्यात अव्वल स्थान पटकावले असून, येथील खेळाडू आता राष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवत आहेत. नगर जिल्हा आता खऱ्या अर्थाने ‘कबड्डीची पंढरी’ बनला आहे, असे गौरवद्गार महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे प्रभारी अध्यक्ष व माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी काढले. अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील पुरुष, कुमार व कुमारी गटातील…

Read More

Asha Bhosle Inaugurated 2009 Satara Literary Meet; Connected with Fans

2009 मध्ये महाबळेश्वर येथे पार पडलेल्या 82 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी केले होते. त्यावेळी दीप प्रज्वलन करताना आशा भोसले शेजारी विधान परिषदेचे तत्कालीन सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे सातारा जिल्ह्याशी सर्वात खास नाते आहे. म्हणूनच…

Read More

खुलताबाद येथील दोन शीवरस्ते अतिक्रमणमुक्त:खिर्डी-नांद्राबाद व कागजीपुरा-मावसाळा मार्ग मोकळे‎

तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या दोन प्रमुख शिवरस्त्यांवरील अतिक्रमणावर महसूल प्रशासनाने अखेर हातोडा फिरवला आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेंतर्गत खिर्डी ते नांद्राबाद आणि कागजीपुरा ते मावसाळा या दोन मार्गांवरील अतिक्रमणे हटवून हे रस्ते नागरिक व शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात आले आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वाहतूकीचा प्रश्न मार्गी लागल्याने…

Read More

बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत मोठी कारवाई:अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 32 बालविवाह रोखले, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

राज्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने ‘स्पेशल फोर्स’च्या माध्यमातून मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळवले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. बाल विवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ नुसार १८ वर्षांखालील मुलगी व २१ वर्षांखालील मुलाचा विवाह लावणे हा दंडनीय गुन्हा असून, बाल विवाह…

Read More