Headlines

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा अर्थहीन- शरद पवार:बारामतीत वक्तव्य, राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी बारामतीत स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेचा आता कोणताही संबंध उरलेला नाही, असे सांगत त्यांनी या शक्यता थेट उडवून लावल्या. जानेवारी महिन्यात विमान अपघातात निधन झालेले तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही…

Read More

घरगुती वाद सोडवण्याच्या रागातून‎मुलाने केली वृद्ध वडिलांची हत्या‎:चिंचवण येथील घटना, मुलाने दुचाकी नेल्याने आरोपी करीत होता पत्नीला मारहाण‎

मुलाने दुचाकी नेल्यामुळे त्याच्या संतप्त‎वडिलाने स्वतःच्या पत्नीला शिवीगाळ‎करीत मारहाण करण्यास सुरुवात केली.‎या वेळी वाद सोडवण्यासाठी वृद्धाने‎मध्यस्थी केली. याचा राग आल्याने‎डोक्यात व चेहऱ्यावर विटांनी मारहाण‎करून पोटच्या मुलानेच वृद्ध पित्याची हत्या‎केल्याची घटना वडवणी तालुक्यातील‎चिंचवण येथे २७ जुलै रोजी घडली.‎श्रीकिसन भागोजी कोठुळे (७०, रा.‎चिंचवण) असे मृत वृद्धाचे नाव असून,‎फुलचंद श्रीकिसन कोठुळे असे गुन्हा‎दाखल झालेल्या आरोपी मुलाचे नाव‎आहे.‎ पोलिसांनी…

Read More

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न:दगडफेक अन् वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी- गिरीश महाजन

तरुणांनी छेडलेल्या आंदोलनाचा राजकीय फायदा कसा उठवता येईल, या हेतूने काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि गुंड आंदोलनात घुसून हुल्लडबाजी करत असल्याचे देशाने पाहिले आहे. या प्रकरणी झालेल्या अटकेत ज्यांचा शाळा-कॉलेजांशी दूरवरचाही संबंध नाही, अशा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या अशा असामाजिक घटकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका मंत्री गिरीश महाजन…

Read More

यात्रेच्या तोंडावर बुवासिद्ध देवस्थानावर वाद:फलकावरून राहुरीमध्ये संताप, वक्फ न्यायाधिकरणाच्या आदेशाचा उल्लेख असलेल्या फलकाला विरोध‎

राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री बुवासिद्ध देव यांच्या यात्रा उत्सवाला बुधवारपासून (२९ जुलै) प्रारंभ होत असताना मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या एका फलकामुळे शहरात वादाचे वातावरण निर्माण झाले आहे. फलकावर वक्फ न्यायाधिकरणाच्या आदेशाचा उल्लेख करत मंदिर परिसरात ध्वज लावणे, आरती करणे, घोषणाबाजी करणे, धार्मिक विधी करण्यास मनाई असल्याचा मजकूर नमूद केला आहे. या फलकाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवत…

Read More

लोकसहभागातून 2 किमीचा शिवपानंद रस्ता झाला खुला:प्रशासन, महसूल आणि शेतकऱ्यांच्या समन्वयातून हटवले वेड्या बाभळीचे अतिक्रमण‎

नेवासे तालुक्यातील चांदा-बऱ्हाणपूर रस्त्यालगत बापूसाहेब थिटे यांच्या वस्तीपर्यंत जाणारा शिवपानंद रस्ता प्रशासनाच्या पुढाकाराने आणि शेतकऱ्यांच्या लोकसहभागातून अखेर खुला करण्यात आला. अंदाजे दोन ते अडीच किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरील वेड्या बाभळींसह . अतिक्रमणामुळे या रस्त्यावरून दुचाकीने किंवा पायी जाणेही कठीण झाले होते. विशेषतः पावसाळ्यात शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी स्वाक्षरी मोहीम…

Read More

झाडांची आराधना करून त्यांचे संगोपन करणारा सुसंस्कृत समाज घडावा- शिंदे:पर्यावरण, साहित्य आणि संवेदनशीलतेचा अनोखा संगम

माणूस निर्जीव मूर्तीची श्रद्धेने पूजा करतो; मात्र प्राणवायू, सावली, फळे आणि औषधे देणाऱ्या सजीव झाडांकडे दुर्लक्ष करतो. झाडांमध्येही जीव आणि संवेदना आहेत. त्यामुळे केवळ वृक्षारोपण करणारा नव्हे, तर झाडांची आराधना करून त्यांचे संगोपन करणारा सुसंस्कृत समाज घडला पाहिजे, असे प्रतिपादन अभिनेते तथा सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी केले. माऊली सेवा प्रतिष्ठानच्या देहरे येथील मनगाव…

Read More

स्वामींचे दर्शन:अक्कलकोटनगरीत गुरुपौर्णिमा उत्सवासाठी आज दीड लाखावर भाविक, पहाटे दोनपासून भक्तांसाठी मंदिर खुले

गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी अक्कलकोट नगरी भक्तिरसात न्हाऊन निघण्यासाठी सज्ज झाली आहे. येथील प्रसिद्ध श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, समाधी मठ आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सवासाठी दीड लाखांवर भाविकांची मांदियाळी जमणार आहे. गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येलाच शहरांमधील सर्व भक्तनिवास व यात्रीनिवास फुल्ल झाले असून, प्रशासनाने आणि देवस्थान समितीने गर्दीचे नियोजन करण्यासाठी चोख व्यवस्था…

Read More

शहिदांच्या बलिदानाचे ऋण फुलांनी नव्हे, जबाबदार नागरिकत्वाने फेडावे:यशकल्याणी सेवाभवनात कारगिल योद्ध्यांसह शिक्षक, अभियंते यांचा गौरव‎

कारगिलच्या रणभूमीवर भारतीय जवानांनी केवळ शत्रूच्या चौक्या जिंकल्या नाहीत, तर त्यांनी भारताच्या स्वाभिमानाची उंची जगाला दाखवून दिली. शहिदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणे ही श्रद्धा आहे. मात्र त्यांनी जपलेल्या राष्ट्रासाठी प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि . आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ, करमाळा आणि यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे यांच्या विद्यमाने करमाळ्याच्या यशकल्याणी सेवाभवनात २७ वा कारगिल विजय दिवस साजरा…

Read More

हरियाणाचे गायक म्हणाले- इथेनॉलच्या VIDEO वर धमक्या मिळाल्या:बिल दाखवून म्हटले- डिफेंडर खरंच खराब झाली, कोणताही अजेंडा चालवत नाहीये

हरियाणाचे रहिवासी गायक रेशम सिंग अनमोल यांनी दावा केला आहे की, खराब पेट्रोलमुळे डिफेंडर खराब झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून त्यांना सतत धमक्या मिळत आहेत. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ जारी करून स्पष्टीकरण दिले आहे. रेशम म्हणाले, “माझी गाडी खरंच खराब झाली होती. मी कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ती दुरुस्त करून घेतली आणि…

Read More

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा:पहिल्या टप्प्यात 13,600 कोटींची कर्जमाफी, दुसरी यादी ऑगस्टमध्ये; नाव नसल्यास तक्रारीचे आवाहन

राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिली लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल १३ हजार ६०० कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असून दुसरी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. अशी माहिती राज्याचे सहकार…

Read More