Headlines

धुळगावची दिव्या बनली पोलिस:आठ महिन्यांपूर्वीच मातृछत्र हरपलेले असतानाही यशाला गवसणी‎

एकीकडे आठ महिन्यांपूर्वीच मातृछत्र हरपलेले असताना आणि दुसरीकडे नातेवाईकांकडून विवाहासाठी होणारा दबाव झुगारून, धुळगाव (ता. येवला) येथील दिव्या बारहाते हीने पोलीस दलात झेप घेत आपले आणि वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही दिव्याने जिद्दीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात नाशिक पोलिस दलात स्थान मिळवले आहे. दिव्याचे प्राथमिक शिक्षण धुळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत,…

Read More

विद्युत जामवालने अमेरिकेत गायत्री मंत्र ऐकवला:हॉलिवूड चित्रपट स्ट्रीट फायटरच्या ट्रेलर लाँचवेळी वैदिक मंत्रांचे पठण; चित्रपटात योगगुरू बनले

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालने अमेरिकेत आयोजित सिनेमाकॉन 2026 कार्यक्रमात वैदिक मंत्रांचे पठण केले. वास्तविक, विद्युत हॉलीवूड चित्रपट ‘स्ट्रीट फायटर’मध्ये योग गुरु ‘धल्सिम’ची भूमिका साकारत आहे. सिनेमाकॉन कार्यक्रमात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यावेळी स्क्रीनिंगपूर्वी विद्युतने मंचावर वैदिक मंत्रांचे पठण केले, ज्यामुळे जगातील सर्वात गजबजलेल्या कार्यक्रमांपैकी एकात शांततेचे वातावरण निर्माण झाले. लास वेगासमध्ये घुमले सूर्य…

Read More

विधानसभा पोटनिवडणूक:बारामतीत सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार रिंगणात तर राहुरीत अक्षय कर्डिलेंसह 7 उमेदवार रिंगणात

विधानसभा पोटनिवडणूक:बारामतीत सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार रिंगणात तर राहुरीत अक्षय कर्डिलेंसह 7 उमेदवार रिंगणात Source link

Read More

बच्चू कडूंवर उद्धव ठाकरेंचा पहिलाच घणाघात:मंत्री करणं ही माझीच चूक ठरली; प्रहारच्या कार्यकर्त्यांसमोर ठाकरे भडकले, थेट निशाणा

मुंबईत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर पहिल्यांदाच उघडपणे निशाणा साधला. घरी बोलावून त्याला मंत्री केलं, ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत, त्यांना जाऊ द्या, अशा शब्दांत ठाकरे यांनी बच्चू कडूंवर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रहार संघटनेतील सोलापूर, परभणी आणि धाराशिवमधील अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हा राजकीय हल्ला…

Read More

अहिल्यानगर-संभाजीनगर रस्त्याची प्रचंड दुरावस्था:पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करा, निधीअभावी जनतेला चांगल्या रस्त्यांपासून वंचित ठेवता येणार नाही‎

छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग ७५३-एफ वरील खड्डे आणि दुरवस्थेमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. ‘निधीअभावी जनतेला चांगल्या रस्त्यांपासून वंचित ठेवता येणार नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत न्यायालयाने सरकारची कानउघडणी केली असून पावसाळ्यापूर्वी रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याचे निर्देश दिले. न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. नीरज धोटे…

Read More

अहिल्यानगरात भाजपच्या ताकदीसमोर राष्ट्रवादी बॅकफूटवर‎,:राष्ट्रवादीला रायगडची जागा जाण्याची शक्यता असल्याने नगरची जागा जाऊ शकते भाजपकडे‎

राज्यातील स्थानिक स्वराज्य ‎संस्थांच्या 17 विधान परिषद‎ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली ‎आहे. राजकीय हालचालींना वेग‎ आला. 18 जून रोजी होणारे मतदान‎ आणि 22 जूनच्या मतमोजणीपूर्वी ‎”महायुती”मध्ये जागा वाटपाचा नवा ‎फॉर्म्युला निश्चित झाल्याचे‎ सूत्रांकडून समजते. महायुतीत ‎भाजप 12, शिवसेना 4 आणि ‎राष्ट्रवादीच्या वाट्याला ‎रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग ‎मतदारसंघाची एकमेव जागा ‎जाण्याची दाट शक्यता आहे, असे‎ झाले तर अहिल्यानगरची…

Read More

शाश्वत शेती संदर्भामध्ये भाऊसाहेबांना अपेक्षित कार्य पूर्तीस कृषी विद्यापीठ बाध्य:कुलगुरू डॉ. गडाख यांचे प्रतिपादन, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृतिदिन साेहळा‎

देशांतर्गत आधुनिक व मुख्यत: व्यावसायिक शेतीच्या पायाभरणीचे शिल्पकार दिवंगत डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख भाऊसाहेबांचे संकल्पनेतील आत्मानिर्भर ग्रामव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने “मॉडेल व्हिलेज” संकल्पना स . डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ६१ व्या स्मृतिदिनानिमित्त येथील कृषी महाविद्यालयाच्या समिती सभागृहात कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. ग्रामीण भागाच्या शैक्षणिक व कृषी विषयक विकासासाठी कृषी…

Read More

गुरुग्राममध्ये संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज:एकाचे डोके फुटले-20 जखमी, पोलिसांची बाईक जाळली-गाडी तोडली; महिलांनी लाठ्या हिसकावून घेतल्या

हरियाणातील गुरुग्राम येथील मानेसरमध्ये कलम 163 लागू असूनही गुरुवारी हजारो संपकरी कर्मचारी एकत्र जमले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे पळापळीची स्थिती निर्माण झाली. यावेळी 20 हून अधिक कर्मचाऱ्यांना दुखापती झाल्या आहेत. एकाच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. खूप रक्तस्त्राव झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक महिला बेशुद्ध पडली. यामुळे संतप्त झालेल्या संपकऱ्यांनी पोलिसांची…

Read More

राज्य सरकार बोलावणार विशेष अधिवेशन:महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय अधिवेशन; मंत्रालयात हालचाली सुरू झाल्याचा दावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी पुढील महिन्यात राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. सध्या या अधिवेशनाची तारीख निश्चित झाली नाही. पण त्यासंबंधीच्या हालचालांनी मंत्रालयात चांगलाच वेग आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. महिला आरक्षण विधेयकाशी संबंधित एक घटनादुरुस्ती (131) विधेयक केंद्र सरकारने नुकतेच लोकसभेत मांडले होते. या…

Read More

पुसली धरणात बुडून 3 सख्ख्या भावंडांचा मृत्यू:तिघांचेही मृतदेह पाण्यात तरंगताना आढळले, अंघोळीला गेल्याने घडली दुर्घटना

अमरावती जिल्ह्यातील पुसली धरणात 3 चिमुकल्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हे तिघेही रविवारपासून बेपत्ता झाले होते. त्यांचे मृतदेह सोमवारी दुपारी धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळले. एकाच घरातील 3 हसतीखेळती मुले एकाचवेळी काळाच्या पडद्याआड केल्यामु्ळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पंकज संतुलाल उईके (10), प्रिया संतुलाल उईके (8) व पवन संतुलाल…

Read More