Headlines

एक लाख अशोक खरात मिळून 1 अकबर होईल:शरद पोंक्षेंनी सम्राट अकबराशी केली खरातची तुलना; 'जोधा' काल्पनिक असल्याचा दावा

अभिनेते शरद पोंक्षे यांनी भोंदू अशोक खरातची तुलना थेट मुगल सम्राट अकबराशी केली आहे. एक लाख अशोक खरात एकत्र केले, तर एक अकबर तयार होईल. मुगल ए आझम चित्रपटात अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी इतिहासात अस्तित्वात नसलेले जोधा नामक पात्र घुसवण्यात आले, असे ते म्हणालेत. शरद पोंक्षे यांनी नांदेड येथे आयोजित परशुराम तजोत्सव व्याख्यानमालेत…

Read More

वेळापुरमध्ये पालखी सोहळा आणि शिवाचार्यांची मिरवणूक उत्साहात:वेळापूरचे मुक्तेश्वर शिवाचार्य यांच्या अमृत महोत्सव‎

वेळापूर (ता. माळशिरस) येथील श्री बृहन्मठ या वीरशैव लिंगायत धर्मातील मोठ्या मठांपैकी एक असलेल्या मठाचे मुक्तेश्वर शिवाचार्य यांचा अमृत महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रम आणि भव्य मिरवणुकीने साजरा करण्यात आला. या महोत्सवानिमित्त मठाचे शिवाचार्य सदाशिव यांनी ३ दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पहिल्या दिवशी ध्वजारोहणाने शुभारंभ झाला. गुरुगादीस रुद्राभिषेक, गणेशयाग व महारुद्रयाग स्वाहाकार, भजन-कीर्तन, संगीत आणि…

Read More

महात्मा फुले यांचे बहुजन वर्गाच्या उन्नतीसाठीचे योगदान अतुलनीय:महात्मा फुले जयंती कार्यक्रमात आमदार समाधान आवताडे यांचे प्रतिपादन‎

“क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या विचारांनी समाजाला नवदिशा दिली आणि समतेचा मार्ग दाखवला,” असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी केले. . क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त मंगळवेढा येथील माळी गल्ली येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत…

Read More

अर्थव्यवस्थेत भारत 6व्या स्थानावर घसरला, ब्रिटनने मागे टाकले:गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले, 18 एप्रिलच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. महिला आरक्षण अधिनियम 2023 लागू 16 एप्रिल रोजी रात्री उशिरा महिला आरक्षण अधिनियम-2023 लागू करण्यात आले आहे. निधन (मृत्यू) 2. भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (IOA) माजी अध्यक्ष नारायण रामचंद्रन यांचे निधन 16 एप्रिल रोजी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (IOA) माजी…

Read More

मिरवणुकीचा खर्च टाळत बुद्ध विहाराचे सुशोभीकरण:भाजप नेत्या रश्मी बागल यांच्याकडून अभिवादन‎

करमाळा तालुक्यातील मांगी गाव नेहमीच सामाजिक आणि आदर्श उपक्रमामुळे चर्चेत राहिले आहे. याच परंपरेला पुढे नेत दि. १४ एप्रिल रोजी भारताचे संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘नाचून नाही, तर वाचून’ या संदेशानुसार अत्यंत साधेपणाने आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. १३ एप्रिल रोजी मध्यरात्री महामानवांना अभिवादन करत फटाक्यांची आतषबाजी केली आणि भीमगीतांचा आनंद…

Read More

ऑस्कर देणाऱ्या संस्थेने शाहरुखचा व्हिडिओ शेअर केला:अभिनेता म्हणाला- स्वतःला जगाचा राजा असल्यासारखे वाटत आहे

ऑस्कर अकादमीने शुक्रवारी ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील प्रसिद्ध संवादाची क्लिप शेअर केली, ज्यावर प्रतिक्रिया देताना अभिनेता शाहरुख खान म्हणाला की त्याला जगाचा राजा असल्यासारखे वाटत आहे. खरं तर, अकादमीने चित्रपटातील अवॉर्ड नाईट सीनचा मोनोलॉग शेअर करत लिहिले, “नशिबाबद्दल एक गोष्ट… ते कधीच चुकत नाही.” यावर शाहरुखने एक्सवर पोस्ट रिट्विट करत लिहिले की, ओमच्या भाषणाने त्याला…

Read More

जितेंद्र शेळकेंचा अपघात नाही तर घातपातच:'व्यापम' घोटाळ्याशी तुलना करत नाना पटोलेंचा प्रहार, म्हणाले- खरातला जेलमध्येच मारले जाईल

भोंदू अशोक खरातच्या जमीन घोटाळ्यातील साक्षीदार, खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि शिर्डीतील नामांकित बांधकाम व्यावसायिक डॉ.जितेंद्र गणपतराव शेळके यांचा अपघात नाही, घातपातच झाला आहे, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. वाहन चालक काहीही जबाब देऊ द्या, हा घातपातच आहे. नेमके त्याला का मारले? आणखी कोणावर गुन्हे का दाखल करण्यात आले नाही,असा सवाल काँग्रेस…

Read More

शहराच्या विकासासाठी पालिका प्रशासनाचा पुढाकार:छत्रीतलाव आणि वडाळी उद्यानांच्या सौंदर्यीकरणावर भर; स्वच्छतेसाठी जनसहभागाचे आवाहन‎

शहराचा चेहरामोहरा बदलण्यासोबतच नागरी सुविधांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता विकासात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी शुक्रवार १७ रोजी सकाळी ६.३० वाजता शहरातील विविध भागांचा प्रत्यक्ष दौरा करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. शहर स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. दस्तूर…

Read More

तामिळनाडूमध्ये प्रवासी वाहन रस्त्यावरून घसरले; 9 जणांचा मृत्यू:केरळमधील 13 पर्यटक होते; हेअरपिन वळणावर अपघात; 5 जणांची प्रकृती गंभीर

तामिळनाडूच्या वलपरईमध्ये शुक्रवारी रस्ते अपघातात 9 लोकांचा मृत्यू झाला, तर 4 लोक गंभीर जखमी झाले. हा अपघात तेव्हा झाला, जेव्हा टेम्पो ट्रॅव्हलर अनियंत्रित होऊन हेअरपिन वळणावरून घसरून दरीत कोसळला. पोलिसांच्या माहितीनुसार, गाडी केरळमधील पेरिंथलमन्ना येथून आलेल्या 13 पर्यटकांना घेऊन वलपरईहून परत येत होती. 13व्या हेअरपिन वळणावर संतुलन बिघडले आणि वाहन घसरून 9व्या हेअरपिन वळणापर्यंत खाली…

Read More

महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्यांची जनता 'वाट' लावेल:काँग्रेसचे धोरण महिलाविरोधी, अमरावती अत्याचार प्रकरणाचा सखोल तपास होणार- चंद्रशेखर बावनकुळे

ज्या खासदारांनी काल महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान केले त्या खासदारांना कधीच निवडणूक जिंकता येणार नाही, त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. बहिणींना प्रतिनिधित्व मिळू नये म्हणून हा विरोध करण्यात आला, काँग्रेसने कधीही महिलांना सन्मान दिला नाही, असे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तर महिलांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या सर्वांना महाराष्ट्रातील आणि देशाची जनता उद्ध्वस्…

Read More