Headlines

भावली धरणानजीक पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या 9 संशयितांची घटनास्थळी धिंड:काेर्टाने सुनावली तीन दिवसांची पोलिस कोठडी, मुख्य संशयित अद्याप फरार

भावली धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या नाशिक येथील कुटुंबावर जीवघेणा हल्ला करून दहशत माजवणाऱ्या नऊ संशयित आरोपींना इगतपुरी न्यायालयाने १८ जुलैपर्यंत म्हणजे तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत संशयितांना अटक केली आणि बुधवारी त्यांची भावली येथील घटनास्थळासह इगतपुरी शहरातून धिंड काढून कायद्याचा धाक दाखवला. सरकारी पक्षाने न्यायालयात संशयितांनी…

Read More

केतन अग्रवाल हत्याकांड:सिया आणि चेतनची केवळ मोबाइलवरच विवाहाची चर्चा, लॉजमध्ये प्रतीकात्मक लग्न केले नाही

पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणात एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यात केवळ मोबाइल चॅट्स आणि फोनवरील संभाषणापुरतीच लग्नाची चर्चा मर्यादित होती. प्रत्यक्षात त्यांचे कोणतेही गुपचूप लग्न झाले नसल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली आहे. या नवीन माहितीमुळे या प्रकरणातील ‘गुपचूप लग्नाच्या’…

Read More

केतन अग्रवाल खून प्रकरण:आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDA ची कारवाई, 8 लाखांचा संशयास्पद माल जप्त

पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पथकाने मार्केटयार्ड येथील सियाचे वडील प्रवीण गोयल यांच्या मालकीच्या पेढीवर धडक कारवाई केली. या कारवाईत विनापरवाना व्यवसाय आणि भेसळीच्या संशयावरून तब्बल 8 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात…

Read More

Maharashtra ST Bus 10 Percent Ticket Hike Extended Till July 2026

वाढत्या डिझेल दरांमुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर मोठा ताण पडत असल्याने, प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साध्या बसगाड्यांसाठी लागू करण्यात आलेली १० टक्के तात्पुरती भाडेवाढ आता ३१ जुलै २०२६ पर्यंत कायम राहणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग . डिझेल दरवाढीचा एसटीला फटका ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाकडून दररोज लाखो प्रवाशांना परवडणारी आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध…

Read More

कवठा शिवारात रोहित्र बसविताना विजेच्या धक्याने कामगाराचा मृत्यू:संतप्त नातेवाईकांनी मृतदेह आणला वसमतच्या विज कंपनीच्या कार्यालयात

वसमत तालुक्यातील कवठा शिवारात विज कपंनीचे रोहित्र बसविण्याचे काम सुरु असतांना एका कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ता. १५ घडली आहे. या प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी कामगाराचा मृतदेह वसमतच्या विज कंपनीच्या कार्यालयात आणून ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर याप्रकरणात वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विज कंपनीकडून…

Read More

अखेर सोलापूर-मुंबई विमानसेवा पूर्ववत:2 ऑगस्टपासून आठवड्यातून चार दिवस मिळणार सेवा, जाणून घ्या वेळापत्रक

महिनाभरापासून बंद पडलेली सोलापूर ते मुंबई ही महत्त्वपूर्ण मानली जाणारी विमानसेवा आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे ‘स्टार एअरलाईन’ कंपनीने २ ऑगस्ट २०२६ पासून ही सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सोलापूरच्या व्यापारी, नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य प्रवाशांना खूप मोठा…

Read More

ओबीसींसाठी स्वयंरोजगाराची संधी:विविध कर्ज योजनांसाठी प्रस्ताव मागवले

इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील नागरिकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने (MOBCFDC) विविध कर्ज योजनांसाठी प्रस्ताव मागवले आहेत. या योजनांतर्गत अत्यंत अल्प व्याजदराने किंवा बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. पात्र इच्छुकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक व्ही. एस. खोडे यांनी…

Read More

रिद्धपूरमध्ये डायरियाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले:आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे स्थिती नियंत्रणात

रिद्धपूर गावात डायरियाची लागण झालेल्या अनेक रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे येथील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले असून, लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला जाईल, अशी माहिती यंत्रणांनी दिली आहे. विश्रोळी धरणातून रिद्धपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला तब्बल सहा ठिकाणी गळती लागली होती. यामुळे…

Read More

गुरुकुंज मोझरी बसस्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव:पिण्याचे पाणी नाही, स्वच्छतागृहांना कुलूप; अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदाला हरताळ फासत गुरुकुंज मोझरी बसस्थानकाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. हे बसस्थानक अनेक समस्यांचे माहेरघर बनले असून, प्रवाशांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या बसस्थानकातून शिरजगाव, शिवणगाव, अनकवाडी, तळेगाव, वऱ्हा, कुऱ्हा यांसारख्या अनेक गावांतील शेकडो प्रवासी आणि महाविद्यालयीन…

Read More

चिखलदऱ्याला दररोज बससेवा द्यावी, हनी व्हिलेजवासीयांची मागणी:महाबळेश्वरप्रमाणे पर्यटन वाढीसाठी परिवहन मंत्र्यांसह पालकमंत्र्यांना निवेदन

विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा पर्यटन स्थळासाठी दररोज बससेवा सुरू करावी, अशी मागणी चिखलदराजवळील आमझरी येथील ‘हनी व्हिलेज’च्या रहिवाशांनी केली आहे. महाबळेश्वरच्या धर्तीवर पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी ही सेवा आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे चिखलदऱ्यासोबतच आमझरीचे मधही सर्वदूर पोहोचण्यास मदत होईल. आमझरी येथील रहिवाशांच्या वतीने सुनील भालेराव यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती…

Read More