Headlines

विमा नसलेल्या गाडीच्या मालक-चालकाला 44.75 लाखांचा दंड:पुणे अपघात न्यायाधिकरणाचा महत्त्वपूर्ण निकाल, कुटुंबाला 10 वर्षांनी न्याय

पुणे मोटार अपघात न्यायाधिकरणाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात विमा नसलेल्या वाहनाच्या मालक आणि चालकाला 44 लाख 75 हजार ३2३ रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. शिरूर-पुणे रस्त्यावर 2015 मध्ये झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या कुटुंबाला तब्बल 10 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. ही रक्कम 7 टक्के व्याजासह देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मृत…

Read More

मुंबईचे भूखंड लुटले जातायत अन् लोढांना केवळ जैन-मारवाड्यांची चिंता!:बाहेरच्या 'भैय्यांच्या' धमक्यांना भीक घालणार नाही; मुंबई बंद करून दाखवाच- संदीप देशपांडे

मुंबई मनपातील भूखंड लाटण्याचा प्रयत्न बाहेरील लोकं करत आहेत. नर्सिंग कॉलेजचा मोठा भूखंड जेएसडब्ल्यूला देण्यात येत आहे. एक भूखंड जैन इंटरनॅशनलला देण्यात येत आहे. महानगरपालिकेचे भूखंड लुटून खाण्याचे काम लोकं करत आहे, सत्तेमध्ये बसलेले लोकं मनपाचा खजिना लुटवत आहे, असे म्हणत मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे म्हणाले की,…

Read More

हॉलिडे होम आता फक्त छंद नाही, तर कमाईचे साधनही:2026 पर्यंत 37 हजार कोटींची बाजारपेठ; भाड्याने 12% पर्यंत परतावा

गोवा, अलिबाग, कसौली आणि कुमाऊंच्या टेकड्यांसारख्या पर्यटन स्थळांवर आता लोक फक्त सुट्ट्या घालवण्यासाठी घरे खरेदी करत नाहीत. एक नवीन ट्रेंड उदयास आला आहे. हा आहे ‘भाड्याचे उत्पन्न’ (रेंटल इन्कम) मिळवण्याचा. म्हणजे, जो कधी जीवनशैलीसाठी घेतलेला निर्णय होता, तो आता एक गुंतवणूक धोरण बनला आहे. डोंगराळ प्रदेशातील आणि किनारी भागातील घरे भाड्याने देणे नवीन नाही, पण…

Read More

FMCG Companies Price Hike Alert; Dabur, HUL Face Rising Costs

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनी डाबर इंडियाने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, पॅकेजिंग मटेरियलच्या वाढत्या किमती आणि मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावामुळे इनपुट कॉस्ट वाढली आहे. डाबर व्यतिरिक्त, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) आणि नेस्लेसारख्या कंपन्यांनाही महागाईच्या दबावाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत तुमच्या घराचे बजेट बिघडू शकते…

Read More

जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत शिकत राहावे:प्रा. डॉ. रावसाहेब पवार यांचे आवाहन, वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात‎

प्रतिनिधी|अहिल्यानगर विद्या प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व बीएड दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादाराम ढवाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोषाध्यक्ष प्रा. डॉ. रावसाहेब पवार यांनी हजेरी लावली. प्रा. डॉ. अमरनाथ कुमावत यांनी प्रास्ताविक केले. परिस्थिती कशीही असली तरी विद्यार्थ्यांनी शिक्षण थांबवू नये….

Read More

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण:एसआयटीच्या रडारवर छत्रपती संभाजीनगर विभाग; बनावट मान्यता, कागदपत्रांद्वारे लाटले अनुदान

राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचे लोण छत्रपती संभाजीनगरमध्येही पोहोचले आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी, तुकडीला मान्यता नसतानाही संचमान्यता देत नव्याने शिक्षक भरती केल्याचे विविध कागदपत्रांवरून समोर आले आहे. त्यात विशेष म्हणजे अनेक वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडीचे जावक क्रमांक शिक्षण विभागाच्या दप्तरी जुळत नसल्याचे समोर आले आहे. सुमारे 4 हजार मान्यतांची…

Read More

मुंबईत डिझेल पुरवठ्यात 5 ते 10 टक्क्यांची कपात:पेट्रोल पंपांवर तुटवडा, वाहनधारकांची धावपळ सुरू; मालवाहतूकदारांचे टेन्शन वाढले

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत डिझेल पुरवठ्याबाबत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील डिझेल पुरवठ्यात 5 ते 10 टक्क्यांची कपात करण्यात आल्याची माहिती समोर आली असून त्याचा परिणाम आता थेट पेट्रोल पंपांवर दिसू लागला आहे. काही भागांमध्ये डिझेलचा साठा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने वाहनधारकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेषतः मालवाहतूक, व्यावसायिक वाहने आणि डिझेलवर चालणाऱ्या…

Read More

दाभा गावात तीव्र पाणीटंचाई:ग्रामस्थांना 20 दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा, महिलांचे निवेदन

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा गावात गेल्या १५ ते २० दिवसांपासून शासकीय नळयोजनेचा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, महिलांनी थेट नांदगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नळ योजनेद्वारे २० दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून, स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत…

Read More

गुरूकुंज मोझरी गावामधून जाणारी पहाटेची अमरावती-गोंदिया बस बंद:दररोजच्या प्रवाशांचे होतायेत हाल, बस पुर्ववत सुरू करण्याची मागणी‎

गेल्या ३० वर्षांपासून अविरत सुरू असलेली अमरावती-नागपूर-गोंदि या ही पहाटेची महत्त्वाची बस सेवा मागील दोन आठवड्यांपासून अचानक बंद करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरील असंख्य प्रवाशांचे हाल होत असून, संतप्त प्रवाशांनी मोझरी बसस्थानक व्यवस्थापक तसेच विभागीय वाहतूक नियंत्रण, भंडारा यांना निवेदन सादर केले आहे. अमरावती मुख्य बसस्थानकावरून दररोज पहाटे ५:१५ वाजता सुटणारी ही बस अमरावती,…

Read More

24 वर्षीय युवकाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू:शेतातील वीज दुरुस्त करताना घडली घटना

चांदूर रेल्वे येथील सावंगी संगम परिसरात शेतातील वीजपुरवठा दुरुस्त करत असताना वीजेचा धक्का लागून २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अंकुश श्रावणजी नेवारे असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हा डीजे व्यवसायासोबतच विद्युत संबंधित छोटी-मोठी कामे करत असे. त्याच्या कुटुंबाची हडपा शिवारात सुमारे दोन एकर शेती असून,…

Read More