Headlines

राम नदी चित्रपट महोत्सव सुरू:ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ परांजपे यांच्या हस्ते उदघाटन, नदी परिसरातील नैसर्गिक अधिवास जतनाचे आवाहन

कोहिनूर कट्टातर्फे आयोजित कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ पर्यावरण व पाणी तज्ज्ञ तसेच गोमुखचे अध्यक्ष प्रा. विजय परांजपे यांच्या हस्ते महोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण करून त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. परांजपे यांनी राम नदीच्या पुनरुज्जीवनासाठी तिच्या उगमस्थानापासून संगमापर्यंत सखोल अभ्यास होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. नदीची वारी-परिक्रमा व्हावी आणि मानवनिर्मित…

Read More

मिरवणुकीचा खर्च टाळत बुद्ध विहाराचे सुशोभीकरण:भाजप नेत्या रश्मी बागल यांच्याकडून अभिवादन‎

करमाळा तालुक्यातील मांगी गाव नेहमीच सामाजिक आणि आदर्श उपक्रमामुळे चर्चेत राहिले आहे. याच परंपरेला पुढे नेत दि. १४ एप्रिल रोजी भारताचे संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘नाचून नाही, तर वाचून’ या संदेशानुसार अत्यंत साधेपणाने आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. १३ एप्रिल रोजी मध्यरात्री महामानवांना अभिवादन करत फटाक्यांची आतषबाजी केली आणि भीमगीतांचा आनंद…

Read More

कृती सेननने 'मिमी' चित्रपटाच्या वेळी एग्स फ्रीज केले:म्हणाली- लग्न किंवा मुले स्वतःच्या इच्छेने व्हायला पाहिजेत, आई होण्याचे कोणतेही दडपण नको आहे

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने खुलासा केला आहे की, तिने तिच्या ‘मिमी’ चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिची अंडी (एग्स) फ्रीज केली होती. ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या एका मुलाखतीत कृतीने सांगितले की, या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला वजन वाढवायचे होते. कारण एग फ्रीजिंगच्या प्रक्रियेत शरीरात जडपणा येतो, म्हणून तिने या वेळेचा हुशारीने वापर केला. 35 वर्षीय कृतीने सांगितले की, तिला…

Read More

सरकारने म्हटले- कोर्ट धार्मिक परंपरेला अंधश्रद्धा म्हणू शकत नाही:तुम्ही तज्ज्ञ नाही, कोर्टाने म्हटले- आम्हाला रिव्ह्यू करण्याचा पूर्ण अधिकार

धार्मिक स्थळांवरील महिलांसोबत होणाऱ्या भेदभावाच्या खटल्याच्या सुनावणीचा सर्वोच्च न्यायालयाचा बुधवारी दुसरा दिवस होता. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, “एक धर्मनिरपेक्ष न्यायालय एखाद्या धार्मिक प्रथेला सहजपणे अंधश्रद्धा ठरवू शकत नाही, कारण अशी गोष्ट ठरवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे नसते.” ते पुढे म्हणाले, “नागालँडमधील एखाद्या समुदायासाठी जी गोष्ट धार्मिक मानली जाते, ती मला अंधश्रद्धा वाटू शकते. आपला समाज खूप…

Read More

सुनेत्रा पवारांच्या जागेसाठी राष्ट्रवादीत जोरदार लॉबिंग:राज्यसभेसाठी पाच बडे नेते रिंगणात; महिला आयोगाच्या पदावरही चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाला संधी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी या जागेसाठी रस दाखवल्याने राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत स्पर्धा वाढल्याचे चित्र दिसत आहे. राज्यसभेच्या जागेसोबतच पक्षातील इतर महत्त्वाच्या रिक्त पदांवरही लवकरच निर्णय होण्याची…

Read More

अहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासन, न्यायव्यवस्थेत उल्लेखनीय योगदान:गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम‎

अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यात शिक्षण, शेती, न्यायव्यवस्था व प्रशासन व्यवस्थेमध्ये उल्लेखनीय योगदान देऊन जनकल्याणाची महत्त्वपूर्ण कामे केली. म्हणून त्यांचे कार्य वंदनीय आहे, असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले. महर्षी विवेका . या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, अहिल्यादेवींनी संस्कृत शिक्षणाला मोठे प्रोत्साहन…

Read More

वीज कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यांची 10 लाखांची फसवणूक:एपीके फाईल पाठवून काढले खात्यातील पैसे, हिंगोली पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई महानगर गॅस पाईपलाईनचे पैसे थकीत असून तातडीने पैसे भरा असा संदेश देत एपीके फाईल पाठवून विज कंपनीच्या अधिक्षक अभियंत्याच्या खात्यातील १० लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ९ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या भामट्यांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील विज…

Read More

'ॲट्रॉसिटी'अंतर्गत मृत व्यक्तींच्या 889 वारसदारांना शासकीय नोकरी:पुणे जिल्ह्यातील 18 वारसदारांना मिसाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण

सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंगळवारी माहिती दिली की, ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत मृत झालेल्या व्यक्तींच्या 889 पात्र वारसदारांना शासन सेवेत संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अनुसूचित जाती आणि जमातींवरील अत्याचारग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागात आयोजित कार्यक्रमात मिसाळ बोलत…

Read More

राज्यात पावसाची जोरदार हजेरी:मुंबई मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली; तर पालघर, हिंगोलीत शेतकरी सुखावला

राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. जून महिना संपत आलेला असतानाच सुरू झालेल्या या पावसामुळे रखडलेल्या शेतीच्या कामांना आणि पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे. मुंबईसह उपनगरे, पालघर, भिवंडी आणि हिंगोली जिल्ह्यात आज पावसाचा जोर प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळाले. या पावसामुळे कुठे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे, तर कुठे पाणीटंचाईचे संकट टळल्याने नागरिकांना…

Read More

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत इंधन टंचाई:पंपांवर लांबलचक रांगा; डबल इंजिन सरकारच्या इंजिनचे तेल पंण संपले का, विरोधकांची टीका

इराण विरुद्ध अमेरिका, इस्त्रायल युद्धामुळे जगातील अनेक देशांत इंधन टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा मोठा फटका आता महाराष्ट्राला बसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पेट्रोल पंपांवर पेट्रोल – डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंधन मिळवण्याच्या शर्यतीत काही ठिकाणी वादाच्याही घटना घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत…

Read More