Headlines

Pilots Fatigue Threatens Safety; Pilots Association Urges Strict DGCA Flight Duty Rules

Marathi News Business Pilots Fatigue Threatens Safety; Pilots Association Urges Strict DGCA Flight Duty Rules नवी दिल्ली14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दोन वैमानिकांच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर देशात व्यावसायिक वैमानिकांचा थकवा आणि त्यांच्या ड्युटीच्या तासांवरून वाद वाढला आहे. द एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) पत्र लिहून फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांची…

Read More

जगातील सर्वात रुंद बोगद्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पामुळे नवयुगा इंजिनिअरिंगचा पराक्रम

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडने भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगदा निर्माण करून कंपनीने दुसऱ्या ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’वर नाव कोरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवयुगा इंजिनिअरिंगच्या अभियांत्रिकी कौशल्याचे कौतुक केले. सह्याद्रीच्या कठीण डोंगररांगांमधून जाणारा हा…

Read More

1.40 कोटींची ऑनलाईन फसवणूक:पुणे सायबर पोलिसांकडून सातारा येथून एकाला अटक

शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १ कोटी ४० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी पुणे शहर सायबर पोलिसांनी एका आरोपीला सातारा येथून अटक केली आहे. सुशांत हनमंत निकम (वय ३८, रा. अपशिंगे, ता. जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात, आरोपींनी फिर्यादीशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला होता. त्यांना ‘तायकुन कॉईन कंपनी’ मार्फत…

Read More

नागपुरात मायलेकीचा दुर्दैवी अंत:सुसाईड नोटमध्ये सासरच्यांना मृतदेह देण्यास नकार; काय आहे नेमके प्रकरण?

नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका मायलेकीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगीत ढबाले (आई) आणि आकांक्षा ब्रम्हे (विवाहित मुलगी) अशी मृतांची नावे असून, या दोघी नंदनवन परिसरात एकत्र राहत होत्या. बुधवारी रात्री उशिरा त्यांनी राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ…

Read More

मावळमध्ये धरण, नदीत बुडून 4 पर्यटकांचा मृत्यू:महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या सुट्टीनिमित्त घडली घटना

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सुट्टीनिमित्त पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. जाधववाडी धरण आणि पवना नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या या तरुणांवर काळाने घाला घातला. या दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण मावळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पहिली हृदयद्रावक घटना नवलाख उंबरे येथील जाधववाडी धरण परिसरात घडली. अजय गारुडे, संतोष एडके…

Read More

नवापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव:1 लाख 40 हजार पक्षी नष्ट करण्याचे 'कलिंग ऑपरेशन' सुरू

नवापूर शहरात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, पशुसंवर्धन विभागाने आज १ मे रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास ‘कलिंग ऑपरेशन’ (पक्षी नष्ट करण्याची मोहीम) अधिकृतपणे सुरू केली आहे. शहरालगतच्या तीन प्रमुख पोल्ट्री फार्मचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे 40 कर्मचारी 10 अधिकारी…

Read More

'राजा शिवाजी' 1 मे रोजी प्रदर्शित:प्रदर्शनानिमित्त रितेश-जेनेलिया तुळजाभवानीच्या चरणी; तुळजाईचा आशीर्वाद घेत केली आरती

‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचे औचित्य साधत अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या दांपत्याने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी देवींची आरती करत त्यांनी पारंपरिक पद्धतीने कुलधर्म व कुलाचार केले. विशेष म्हणजे, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रितेश देशमुख दिग्दर्शित आणि जेनेलिया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असलेला…

Read More

एमपीमधील क्रूझ अपघातात पायलटसह 3 जणांना बडतर्फ केले:एक कर्मचारी निलंबित, बरगी धरणात 9 मृतदेह सापडले, 3 मुलांसह 4 अजूनही बेपत्ता

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील बरगी धरणात गुरुवारी संध्याकाळी सुमारे ५ वाजता पर्यटन विभागाचे एक क्रूझ अचानक आलेल्या जोरदार वादळामुळे बुडाले. आतापर्यंत ९ मृतदेह सापडले आहेत. प्रशासनानुसार, २८ लोकांना वाचवण्यात आले आहे. तीन मुलांसह ४ लोक बेपत्ता आहेत. शुक्रवार संध्याकाळपर्यंत बेपत्ता लोकांचा शोध लागला नाही. बचावकार्यादरम्यान तिथे जोरदार पाऊसही सुरू झाला. त्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आले आहे….

Read More

ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सरकारला इशारा:शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन आंदोलन करू

शेतकऱ्यांसह नागरिकांची मागणी नसताना शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास शासन का करीत आहे असा सवाल करीत सदर महामार्ग रद्द करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन आंदोलन करू असा इशारा ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शुक्रवारी ता एक सरकारला दिला आहे. पत्रादेवी ते पवनार हा शक्तीपीठ महामार्ग हिंगोली जिल्ह्यातून जात आहे. मात्र या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना…

Read More

बंगळुरूमध्ये जनगणनेसाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन:आवश्यक माहिती देण्यासही नकार दिला, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

बंगळुरूमध्ये राष्ट्रीय जनगणनेच्या कामादरम्यान एका महिला अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ज्याने महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली आणि काम करण्यापासून रोखले. पोलिसांनी सांगितले की, ही घटना 30 एप्रिल रोजी संध्याकाळी सुमारे 4 वाजता घडली. महिला गणक जनगणनेच्या कामासाठी टी दसरहल्ली परिसरातील मल्लासंद्रा येथील एका घरी गेल्या होत्या. त्याचवेळी…

Read More