ओबीसी आरक्षणाची 50 टक्के मर्यादेत कोंडी:ओबीसी मुक्ती मोर्चाची भुजबळ-बावनकुळेंच्या राजीनाम्याची मागणी
राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने ओबीसी आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेतील कोंडी आणि कोट्यात झालेल्या कपातीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी मोर्चाने केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या न्यायालयीन मर्यादेमुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप मोर्चाने केला आहे. निवडणूक आयोगाच्या…