Headlines

विधान परिषद उमेदवार विप्लव बाजोरियांना तूर्त दिलासा नाही:पुढील सुनावणी 17 जूनला, सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता

अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज रद्द झालेले विप्लव बाजोरिया यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून तात्पुरता दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी १७ जून रोजी निश्चित केली आहे. बाजोरिया आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक १८ जून रोजी…

Read More

‘सैयारा’ नंतर पुन्हा एकत्र येतील अहान-अनीत:मोहित सूरी त्यांच्या सिग्नेचर शैलीतील रोमान्स आणि संगीताचे मिश्रण सादर करतील

‘सैयारा’च्या यशानंतर अहान पांडे आणि अनित पड्डाची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. सूत्रांनुसार, यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली दिग्दर्शक मोहित सूरी या दोन्ही कलाकारांना घेऊन एक नवीन म्युझिकल लव्ह स्टोरी बनवणार आहेत, ज्याचे चित्रीकरण याच वर्षाच्या शेवटी सुरू होईल. सूत्रांनुसार, हा अनटाइटल्ड चित्रपट ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 मध्ये फ्लोअरवर जाईल. चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली होईल…

Read More

निवडणूक अधिकाऱ्यांना शिवीगाळ, बाजोरिया पिता-पुत्रांवर गुन्हा:उमेदवारी अर्ज बाद झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांशी वाद

अमरावती विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारी अर्ज बाद ठरवल्यानंतर बाजोरिया पिता-पुत्रांविरुद्ध निवडणूक अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी संतोष काकडे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली. मंगळवारी (२ जून) सकाळी ११ वाजल्यापासून महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्रांची छाननी सुरू होती. जिल्हाधिकारी आणि…

Read More

ग्रामीण पोलिसांचे गावठी दारू अड्ड्यांवर धाडसत्र:मोर्शीत 4 लाख 30 हजार, तर माहुलीत 19 हजारांचे साहित्य नष्ट

मोर्शी आणि माहुली जहागीर पोलिसांनी बुधवार, ३ जून रोजी गावठी दारू अड्ड्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गावठी दारू, मोहा सडवा आणि संबंधित साहित्य जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आले. मोर्शी येथे ४ लाख ३० हजार रुपयांचा, तर माहुली जहागीर येथे १९ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. मोर्शी पोलिसांनी मध्यप्रदेशातील मुलताई…

Read More

गुरुदेवनगरात मध्यरात्री घरफोडी:6 लाख 27 हजार रुपयांची रोकड लंपास, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

तिवसा शहरातील गुरुदेव नगर परिसरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एका घरात धाडसी घरफोडी केली आहे. या घटनेत हेमराज उर्फ हेमंत सुरेशराव बोबडे यांच्या घरातून तब्बल ६ लाख २७ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. ही खळबळजनक घटना २ जूनच्या रात्री घडली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमराज…

Read More

कांदा उत्पादकांना मोठा दिलासा:नाफेड, एनसीसीएफच्या खरेदीवरील बाजार शुल्कातून सूट; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या ‘किंमत स्थिरता निधी’ योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांमार्फत होणाऱ्या कांदा खरेदीवर आता ‘बाजार शुल्क’ आकारले जाणार नाही. या शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यास शासनाने मान्यता दिली असून, तसे आदेशच पणन संचालनालयाने निर्गमित केले आहेत. कांद्याच्या दरातील घसरण आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात…

Read More

शेतकरी कर्जमाफी:अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग व जिल्हास्तरीय समित्यांची घोषणा, 6 जुलै पर्यंत पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार

राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध स्तरांवर समित्यांची स्थापना केली असून त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी ता. तीन काढले आहेत. तारीख सहा जुलै पर्यंत कर्जमुक्ती साठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना…

Read More

जून 2026 पासून पालकांच्या खिशाला कात्री:शालेय बस शुल्कात 15 टक्के वाढ; वाढती महागाई आणि देखभालीचा खर्च कारणीभूत

राज्यातील वाढती महागाई आणि इंधन दरवाढीचा फटका आता थेट शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना बसणार आहे. महाराष्ट्रातील शालेय बस चालक-मालक संघटनेने (SBOA) येत्या जून २०२६ पासून शालेय बस वाहतूक शुल्कात १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय केला आहे. नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ही दरवाढ लागू होणार असून, शासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने हा कठोर निर्णय घ्यावा…

Read More

प्रत्येक ग्रामपंचायतीत 'आपले सरकार सेवा केंद्र' सुरू करा:सेवा हक्क आयुक्त सुधाकर तेलंग यांचे निर्देश, तीन महिन्यांची दिली मुदत

सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्रांची’ संख्या वाढवण्याची मोठी गरज असून, जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये येत्या तीन महिन्यांत ही सेवा केंद्र सुरू करावीत, असे स्पष्ट निर्देश राज्य सेवा हक्क आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिले. तसेच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ‘आदर्श सेतू’ व ‘आदर्श सेवा केंद्र’ उभारावे, अशी सूचनाही त्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज…

Read More

प्रयागराज- युवकाने प्रॉपर्टीसाठी आई-वडील, बहिणीला मारले:मग मित्राने त्यालाच मारले, म्हणाला- जो आई-वडिलांचा नाही झाला, तो माझा काय होणार

प्रयागराजमध्ये करोडपती कुटुंबातील 4 सदस्यांच्या हत्येचा पोलिसांनी बुधवारी खुलासा केला. आई-वडील आणि बहिणीची हत्या मुलानेच आपल्या मित्रासोबत मिळून केली होती. हत्येनंतर दोघांनी घरातून दीड कोटी रुपयांचे दागिने लुटले. नंतर दागिन्यांच्या वाटणीवरून त्यांच्यात आपापसात भांडण झाले. यानंतर मित्राने मुलाची हत्या केली. घटनेनंतर त्याने दुकानाला बाहेरून कुलूप लावले आणि दागिने घेऊन पळून गेला. पोलिसांनी आरोपी मित्र सनी…

Read More