Headlines

टाळ-मृदुंगाच्या तालावर राहुरीकर झाले तल्लीन:दिंडी सोहळ्याने वेधले उपस्थितांचे लक्ष, विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश‎

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राहुरी येथील कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या भव्य दिंडी सोहळ्याने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण केले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी आणि पर्यावरण जनजागृतीच्या संदेशांनी सजलेल्या फलकांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. प्रशालेच्या वतीने इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातून सुरू झालेली ही…

Read More

सेन्सेक्समध्ये 300 अंकांपेक्षा जास्त घसरण, 76,400 वर:निफ्टीही 100 अंकांनी घसरला; आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 23 जुलै रोजी घसरण आहे. सेन्सेक्स 300 अंकांनी अधिक घसरणीसह 76,400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 100 अंकांची घसरण आहे, तो 23,900 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री आहे. कच्च्या तेलाची किंमत 96 डॉलरवर पोहोचली ब्रेंट क्रूडमध्ये आज सुमारे 2% ची वाढ आहे. ते…

Read More

आषाढीच्या मुहूर्तावर शेवगाव आगाराची नवी भरारी; ताफ्यात 5 आधुनिक बस

आषाढी एकादशीपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शेवगाव आगाराला नव्या ५ बस मिळाल्या आहेत. या बस उद्यापासून नियमित प्रवासी सेवेत दाखल होणार असून ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाचा लाभ मिळणार आहे. शेवगाव व पाथर्डी आगारासाठी प्रत्येकी १० नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार मोनिका राजळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप…

Read More

सौंदाळे येथे पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी केला रस्तारोको:रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी‎

सौंदाळा (ता.नेवासे) येथील गावठाण ते भेंडा-वडाळा रस्त्यालगत असलेला सुमारे दीड किलोमीटर लांबीचा पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त करून शेतकऱ्यांसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी बुधवारी शेतकऱ्यांनी भर पावसात नेवासे-शेवगाव राज्यमार्गावर सौंदाळा येथे रस्तारोको आंदोलन केले. सौंदाळा गावठाण ते भेंडा-वडाळा रस्त्यालगत असलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यावरील सर्व अतिक्रमण काढून हा रस्ता कायमस्वरूपी खुला करुन या रस्त्याचे अधिकृत सीमांकन करून…

Read More

दिल्ली येथील लाठीमाराचा निषेध; मोर्शीत विद्यार्थ्यांची तहसीलवर धडक:जिल्ह्यात निषेध आंदोलन, अंजनगाव बारीतही आंदोलनाला पाठिंबा‎

दिल्ली येथील जंतरमंतर परिसरात आपल्या न्याय मागण्यासाठी शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी चार्जचा मोर्शी शहरात सर्वपक्षीय कार्यकर्ते, विद्यार्थ्यांद्वारे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आल . दिल्ली जंतर-मंतर परिसरात विद्यार्थ्यांवर झालेली मारहाण ही अत्यंत निषेधार्ह व दुर्दैवी घटना आहे.कोणत्याही विद्यार्थ्यांवर त्याचे विचार मांडल्यामुळे किंवा लोकशाही मार्गाने आंदोलन केल्यामुळे हिंसाचार होणे…

Read More

चांदूर बाजार येथे विद्यार्थी, नागरिकांचा आक्रमक मोर्चा:दिल्लीतील लाठीचार्जचा केला निषेध, तहसीलदारांना निवेदन‎

दिल्ली येथील जंतर-मंतरवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर २० जुलै रोजी झालेल्या लाठीचार्ज व अश्रुधुराच्या वापराच्या निषेधार्थ चांदूर बाजार येथे शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी चौकातून दुपारी १२ वाजता निघालेल्या मोर्चा तहसील कार्यालयामध्ये पोहोचून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात जंतर-मंतर येथील घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने…

Read More

दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठी अण्णा हजारे मैदानात:अहिल्यानगरात आज मौन धरणे आंदोलन; पंतप्रधान मोदींना पाठवले पत्र

नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भक्कम पाठिंबा दिला आहे. देशात लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांना दडपशाहीने चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत, अण्णा हजारे आज अहिल्यानगरमध्ये एक दिवसीय ‘मौन धरणे’ आंदोलन करणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र…

Read More

आंदोलन हिंसक होणे अत्यंत दुःखद बाब:दीर्घकाळ शांततेनंतर सलमान खानने आंदोलनाला पाठिंबा दिला, म्हणाला- याला राजकीय रंग देऊ नका

घकाळ शांततेनंतर, जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांसोबत झालेल्या हिंसेविरोधात आवाज उठवणारे सलमान खान हे चित्रपट उद्योगातील पहिले सुपरस्टार बनले आहेत. त्यांनी केवळ विद्यार्थ्यांसोबत झालेल्या हिंसेचा तीव्र निषेध केला नाही, तर त्यांच्या आंदोलनाला योग्य ठरवले. त्यांनी आशा व्यक्त केली आहे की सरकार लवकरच त्यांना पाठिंबा देईल आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होईल. त्याचबरोबर अभिनेत्याने सांगितले की, हा केवळ विद्यार्थी…

Read More

गाळयुक्त शिवारने बदलले वीरगव्हाणचे चित्र:जिल्हा नियाेजन समितीच्या खर्चातून केलेल्या सोयीमुळे 150 शेतकऱ्यांना फायदा

शासनाच्या ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ या योजनेमुळे तिवसा तालुक्यातील भिवापूर ग्रा.पं. अंतर्गत वीरगव्हाण येथे जलसंधारणाचा एक आदर्श पॅटर्न निर्माण झाला. येथील जलाशयामुळे १५० शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली असून त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पड . राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या समितीचे अध्यक्ष आहे. यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनातूनच हा जलाशय बांधला गेला. विशेष…

Read More

जिल्ह्यात 24 तासांत 15.7 मिमीची नोंद; एका जणाचा बळी:4 घरे पडली, दोन दिवसांपासून संततधार पाऊस, जलसाठे वाढले, शेतकरी सुखावले‎

तब्बल दहा दिवसांनंतर जिल्ह्यात मंगळवारपासून सर्वदूर संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकरी सुखावले असून, पावसाच्या वार्षिक सरासरीतही चार टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे या पावसाने एक बळी घेतला असून, दोन तालुक्यातील चार घरेही जमीनदोस्त झाली. दरम्यान दर्यापूर तालुक्यातील गोळेगाव येथे वीज पडल्याने एका शेतकऱ्याला प्राण गमवावे लागले, तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ३, अमरावतीच्या ग्रामीण भागातील…

Read More