Headlines

अवघ्या 5 मिनिटांत विद्यार्थ्यांनी सोडवली अवघड गणिते!:अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती दूर करून त्यांना झटपट व अचूक गणित सोडविण्याची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने इन्स्पायर अबॅकस अँड वेदिक मॅथ अकॅडमी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. सुखकर्ता लॉन येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यासह देशभरातील ८७७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अकॅडमीच्या संचालिका अर्चना शेळके, सत्यशिला भद्रे आणि दादासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित स्पर्धेत विद्यार्थ्यांनी…

Read More

जायकवाडी:धरणामधील जलसाठा 67.60 टक्क्यांवर

नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गात घट झाल्याने जायकवाडी धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. बुधवारी (२९ जुलै) रात्री ९ वाजेपर्यंत जायकवाडी धरणात २० हजार ६८६ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. या आवकीमुळे धरणातील उपयुक्त जिवंत पाणीसाठा ६७.६० टक्क्यांवर पोहोचला असून, सध्या ५१.६० टीएमसी (१४६१.३१६ दशलक्ष घनमीटर) इतका जिवंत पाणीसाठा जमा झाला…

Read More

Parliament Monsoon Session | Paper Leak Bill In Rajya Sabha Today

नवी दिल्ली17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा गुरुवारी नववा दिवस आहे. विरोधक संसद मार्चदरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून सतत गदारोळ करत आहेत. तर सत्ताधारी पक्षही राहुल गांधींनी लोकसभेत ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ या विधानांबद्दल माफी मागावी अशी मागणी करत आहे. आजही संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी बुधवारी लोकसभेत अँटी-पेपर लीक (सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक) मंजूर…

Read More

भूसंपादनासाठी शेतकऱ्यांसोबत पुन्हा होणार संवाद:लासूर येथे 2 ऑगस्टला आमदार, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक‎

प्रस्तावित आरापूर औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने प्रशासन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने शेतकऱ्यांशी पुन्हा थेट संवाद साधण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवार, २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता लासूर स्टेशन येथील पांडव लॉन्समध्ये शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूसंपादन वाटाघाटीसाठी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीस छत्रपती संभाजीनगरचे…

Read More

चित्रपट 'रामायण' चे ट्रेलर रिलीज:ब्रह्म मुहूर्तावर सकाळी 4:15 वाजता जगभरात लॉन्च, दिवाळी 2026 रोजी पहिला भाग प्रदर्शित होईल

नितेश तिवारींच्या ‘रामायण’ चित्रपटाच्या पहिल्या भागाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. चित्रपट निर्मात्यांनी तो 30 जुलै रोजी सकाळी 4:15 वाजता, ब्रह्म मुहूर्ताच्या शुभ मुहूर्तावर जगभरात प्रदर्शित केला. ‘रामायण’चा ट्रेलर हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये एकाच वेळी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरची झलक – ट्रेलरबद्दल सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया ‘रामायण’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर…

Read More

महिलेला सर्पदंश:वेळेत उपचारांमुळे अनर्थ टळला

नांदर येथे महिलेला सापाने दंश केल्याची घटना बुधवारी घडली. आशा सेविकेच्या तत्परतेमुळे महिलेवर वेळेत उपचार झाल्याने अनर्थ टळला आहे. हुदाबी जावेद पठाण ( ३३) घरातील काम करत असताना त्यांना साप दिसला. त्यांनी हाताला ओढणी बांधून साप पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सापाने त्यांच्या हाताला दंश केला. दंश झाल्यानंतरही त्यांनी कोणाला काही न सांगता काम सुरू ठेवले….

Read More

गुरुपौर्णिमा:श्री मोहटादेवी विद्यालय येथे गुरुपौर्णिमा साजरी

भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या सचिव वंदनाताई मुखेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. धनंजय मुखेकर यांच्या प्रेरणेतून म्हारोळा येथील श्री मोहटादेवी विद्यालय व कै विठ्ठलराव धरपळे कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. अशोकराव मुखेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी काही निवडक विद्यार्थ्यांची…

Read More

जात पडताळणीतील समस्या दूर करण्याची केली मागणी:समस्येबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन

जात पडताळणी प्रक्रियेतील विलंब व त्रुटीचे कारणे दाखवत जात पडताळणीसाठी विलंब केला जात आहे. जात प्रमाणपत्र काढण्यासाठी जुने महसुली पुरावे, जसे की कोतवाल बुकची नक्कल, जुनी शाळा सोडल्याचा दाखला किंवा वडिलांच्या प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा. रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांचे जास्तीत जास्त पुरावे जोडले जातात अचूक वंशावळ जोडल्यावरच उप विभागीय अधिकारी जात प्रमाणपत्र दिले जाते तेच…

Read More

आषाढी एकादशीनिमित्त:लासूरला विठ्ठल नामाच्या गजरात ‘विठ्ठल गीती गावा-2026’ सोहळा

लासूर स्टेशन येथे आषाढी एकादशीनिमित्त स्वर-शारदा संगीत अकॅडमी व नवतरुण भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विठ्ठल गीती गावा–२०२६’ हा भक्तिमय संगीत सोहळा विश्वकर्मा मंदिरात उत्साहात पार पडला. पंचक्रोशीतील सुमारे ३०० वारकरी व विठ्ठलभक्तांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली. कार्यक्रमात बालकलाकारांसह भजनी मंडळाच्या सदस्यांनी संतांचे विविध अभंग सुरेल स्वरात सादर केले. संगीत अलंकार प्रा. अण्णासाहेब आढाव यांच्या…

Read More

जायकवाडीवर अवलंबित 25 हजार पांरपरिक मच्छीमारांचे होणार सर्वेक्षण:रोजगाराचा मार्ग मोकळा होणार‎

जायकवाडी धरणावर पिढ्यान्पिढ्या मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या पारंपरिक मच्छीमार कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. जलाशयावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या कहार, भोई आणि भिल्ल समाजातील मच्छीमार कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना विविध सरकारी रोजगाराभिमुख योजनांशी जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जायकवाडी मच्छीमार बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नगरसेवक बजरंग लिंबोरे…

Read More