वारीच्या तोंडावर पवित्र इंद्रायणी नदी फेसाळली:नाना पटोले विधानसभेत आक्रमक; 'नमामि इंद्रायणी'च्या कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न आषाढी वारीच्या अवघ्या चार दिवस आधी थेट विधानसभेत गाजला आहे. नदीपात्रात रासायनिक आणि औद्योगिक सांडपाण्यामुळे साबणासारखा पांढरा शुभ्र फेस साचल्याचे समोर आले आहे. या गंभीर परिस्थितीवरून काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत राज्य सरकारला धारेवर धरत, ‘नमामि इंद्रायणी’ योजनेच्या कोट्यवधी रुपयांच्या तरतुदीनंतरही नदीची ही अवस्था…