Headlines

स्वयंरोजगारासाठी नागपूर, तर सर्वाधिक वेतनासाठी नवी मुंबई टॉप:एनएसओच्या ‘मिलियन प्लस सिटी’ सर्वेक्षणाचा जून 2026 अहवाल

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) देशातील १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या ४६ शहरांमध्ये मिलियन प्लस सर्वेक्षण केले आहे. याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. यात सर्वाधिक १० शहरे महाराष्ट्राची आहेत. संभाजीनगरला बेरोजगारीचा विळखा अधिक आहे. . मात्र नागपूर व ठाण्याच्या तुलनेत संभाजीनगरच्या नोकरदारांना वेतन अधिक आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबईच्या नोकरदारांना सर्वाधिक ५१,५१५ रुपयांचे वेतन आहे. मुंबई दुसऱ्या…

Read More

युझरनेम फीचरवर व्हॉट्सअ‍ॅप नंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारचा सवाल – सायबर गुन्हेगारीचा धोका, रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात

युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सअ‍ॅपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवण्यात आली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी ऑनलाइन फसवणूक, बनावट ओळख आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, अशी विचारणा सरकारने या प्रकरणी केली आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, सरकारने टेलिग्रामला विचारले आहे की, त्याला युझरनेम फीचर सुरू ठेवण्याची परवानगी का दिली…

Read More

थायलंडच्या ‘सायबर गुलामगिरी’तून भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्राची मोहीम:खा. अशोक चव्हाणांच्या पत्राची दखल; बीडच्या तरुणांचा समावेश

म्यानमार आणि थायलंडच्या सीमेवर ‘सायबर गुलामगिरी’च्या भयंकर विळख्यात अडकलेल्या शेकडो भारतीय तरुणांच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. थायलंड आणि म्यानमारमधील स्थानिक सुरक्षा यंत्रणांना सोबत घेऊन ही आंतरराष्ट्रीय बचाव मोहीम राबवली जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, नाशिक, सातारा जिल्ह्यांतील तरुणांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे यासंदर्भात…

Read More

भाजप नगरसेवक, जि.प. सदस्यांना बँकेच्या निवडणुकीची जबाबदारी:जिल्हा बँक महायुतीच्या ताब्यात घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न

स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि जिल्हा परिषदेनंतर आता भारतीय जनता पक्षाने आपला मोर्चा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वळवला आहे. जिल्हा बँक महायुतीच्या ताब्यात यावी म्हणून भाजपने नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना प्रचारासाठी लावले आहे. येत्या ४ जुलै रोजी जिल्हा बँकेसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर ५ जुलै रोजी मतमोजणी होईल….

Read More

1 कोटी महिलांना योजनांमध्ये 30%लाभ, बँक कर्ज मिळणार:देशात महाराष्ट्र पहिले राज्य – महिला शेतकरी विधेयक विधानसभेत मंजूर

शेतमालक असलेल्याच नव्हे तर शेतात राबणाऱ्या महिलांनाही शेतकरी म्हणून ओळख मिळवून देणारे महिला शेतकरी विधेयक २०२६ विधानसभेत एकमताने मंजूर झाले. यानुसार मासेमारी, कुक्कुटपालन, गौण वन उत्पादन (उदा. तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या) गोळा करणाऱ्या महिलांचीही शेतकरी अशीच नोंद होईल. ७/१२ वर नाव नसलेल्या ८० ते ९५ लाख महिलांसह राज्यातील सुमारे १ ते १.१५ कोटी महिलांना कायदेशीर ओळख,…

Read More

No need to contribute 12% of basic amount in PF; Pay only 1,800!, Employee-Company can continue to contribute 12% voluntarily

Marathi News National No Need To Contribute 12% Of Basic Amount In PF; Pay Only 1,800!, Employee Company Can Continue To Contribute 12% Voluntarily नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पगारदार कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूलभूत वेतनाच्या १२ टक्के रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (ईपीएफ)जमा करणे बंधनकारक होते. कंपनीलाही तितकेच योगदान देणे आवश्यक…

Read More

टिप्पणी:नागरिकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे, विरोध केल्यास गुन्हे- मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्टाने गुरुवारी मुंबई पोलिसांना खडे बोल सुनावले. न्यायमूर्ती माधव जामदार यांनी तोंडी टिप्पणी केली. ते म्हणाले- ‘सर्व नागरिकांना भारत सरकारचे गुलाम बनवले जात आहे. ते विरोध करू शकत नाहीत, ते आंदोलन करू शकत नाहीत- हे सर्व काय आहे? आता इतके पेपर लीक झाले की लोकांनी विरोध केला, तर तुम्ही गुन्हे दाखल कराल… हे काय…

Read More

संभाजीनगरातून ‘आयएसआय’च्या हेरांना चार वर्षांपासून रसद पुरवणारा गजाआड:राजस्थान सीआयडी पथकाकडून हर्सूलमध्ये आरोपी रफिक चांदला अटक

पाकिस्तानी गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयला माहिती पुरवणाऱ्या गुप्तहेरांना पैशांची रसद पुरवणाऱ्या एका एजंटला राजस्थान पोलिसांच्या सीआयडी पथकाने छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. रफिक चांद शेख (वय ४१, रा. सईदा कॉलनी, हर्सूल) असे या आरोपीचे नाव असून, त्याला ३० जून रोजी ताब्यात घेण्यात आले. तो गेल्या ४ वर्षांपासून या देशविघातक कृत्यात सक्रिय होता. या नेटवर्कशी जोडलेल्या…

Read More

15 वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला:हिंगोलीच्या बेग्या पवार कोठडीतील मृत्युप्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेप, वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

रिसोड पोलिस ठाण्याच्या कोठडीत १५ वर्षापूर्वी एका तरुणाच्या मृत्यू प्रकरणात वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला. जिल्हा न्यायमूर्ती जयसिंग झपाटे यांनी तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जन्मठेप ठोठावली. . केवळ ३४ दिवसांत तपास पूर्ण करत सीआयडीने दोषारोपपत्र सादर केले होते. त्यानुसार दोषींना कलम ३०२ अन्वये जन्मठेप, कलम २०१ नुसार पुरावा…

Read More

विद्यापीठाच्या उभारणीत कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा:सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभात कुलगुरू डॉ. बारहाते यांचे प्रतिपादन

कोणत्याही संस्थेच्या उभारणीत कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असतो. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विकासात कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्यामुळेच विद्यापीठ उभे राहू शकले, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. ते विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निरोप समारंभात बोलत होते. हा ‘कर्तव्यपूर्ती सोहळा’ संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मंचावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र…

Read More