टँकरमुक्तीसाठी करंदीत प्रथमच बोअर ब्लास्टिंग:पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणी पातळी वाढणार, दहा बोअरमध्ये एकाच दिवशी स्फोट
नेहमीच टंचाईचा सामना करणाऱ्या पारनेर तालुक्यातील करंदी गावांत टँकरमुक्तीसाठी ग्रामपंचायतीने बोअर ब्लास्ट तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. तलावाजवळ असूनही, जलस्त्रोत असलेल्या विहिरीची पाणी पातळी कमी असल्याचे दिसून आले. तलावाच्या पाणीपातळीप्रमाणे विहिरीची पाणीपातळी वाढवण्यासाठी, रविवारी १० बोअरमध्ये स्फोट घडवण्यात आले. करंदी हे टंचाईग्रस्त गाव असून, या ठिकाणी उन्हाळ्यात टँकरने पाण्याचा पुरवठा करावा लागतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीने…