अधिकाऱ्यांनी चिखलात अनुभवले बळीराजाचे कष्ट:पाडळी देशमुख येथे कृषी विभागातर्फे चारसूत्री भात लागवड आणि जीवामृत प्रात्यक्षिक
शेतात राबणारा शेतकरी हाच खऱ्या अर्थाने देशाचा कणा आहे. मात्र, त्याचे कष्ट किती अथांग असतात, याची प्रचिती मातीत उतरल्याशिवाय येत नाही, याचा प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्मा प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद आणि इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी मुसळधार पावसात थेट शेतात उतरून बळीराजाच्या कष्टांचा…