Headlines

एमपीत 27 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता:हरियाणातील गुरुग्राममध्ये वर्क फ्रॉम होम, मथुरेत रस्ते आणि निवासी परिसर पाण्याखाली

मान्सून ट्रफ, चक्रीवादळ (सायक्लोनिक सर्कुलेशन) आणि कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (लो प्रेशर एरिया) तयार झालेल्या मजबूत प्रणालीमुळे मध्य प्रदेशात पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी भोपाळ, विदिशा, रायसेन आणि शाजापूरमध्ये जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २७ ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारीही पावसाचा रेड अलर्ट आहे. यामुळे सर्व कार्यालये,…

Read More

छत्रपती संभाजीनगरातील खवड्या डोंगर प्रकरण:आयफोनचा वाद नव्हे, कौटुंबिक तणावातून संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

तिसगाव परिसरातील खवड्या डोंगर प्रकरणातील चांदगुडे परिवाराचा दुर्दैवी अंत झाला. यात कुणाल व मुरलीधर यांचा पडतानाचा स्पष्ट व्हिडिओ यापूर्वीच समोर आला होता, तर काही वेळाने संगीता खाली पडल्याचे समोर आले होते. मात्र तसा पुरावा समोर आला नव्हता. आता समाज माध्यमांवर नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात संगीता ह्या खाली पडताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे त्या…

Read More

खरगे म्हणाले- सरकारचा चोरट्या मार्गाने आरक्षण रद्द करण्याचा डाव:सरकारी पदे रिक्त ठेवल्याने संधी संपल्या, भाजपच्या धोरणाचा पर्दाफाश

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आरोप केला की, सरकार एससी, एसटी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस (EWS) वर्गांचे आरक्षण संपवण्याचा कट रचत आहे. ते म्हणाले की, सरकारी पदे जाणूनबुजून रिक्त ठेवली जात आहेत आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती वाढवली जात आहे. त्यांनी आरोप केला की, भाजपचे धोरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संवैधानिक अधिकार हिरावून घेण्याच्या दिशेने आहे. आता…

Read More

रिजिजू म्हणाले- राहुल यांच्या निशाण्यावर फक्त हिंदूच का?:अल्पसंख्याक महिलांवर का बोलत नाहीत; समाज विभागण्यासाठी मुलींना कमी लेखू नका

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या ‘पितृसत्ता मोडा’ या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी विचारले की, काँग्रेस पक्ष फक्त हिंदू परंपरांनाच लक्ष्य का करतो आणि अल्पसंख्याक महिलांच्या स्थितीवर शांत का राहतो. रिजिजू यांनी सोशल मीडिया एक्सवर काँग्रेसच्या सामाजिक सुधारणा करण्याच्या पद्धतीला सिलेक्टिव्ह म्हटले. ते म्हणाले की, काँग्रेस महिलांच्या बाजूने उभा…

Read More

विद्यार्थ्यांच्या ताटात स्वच्छ, सुरक्षित आहार द्या:‘एफडीए’चे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांच्या मुख्याध्यापकांना सूचना‎

शाळांमधील विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार पौष्टिक, सुरक्षित, स्वच्छ व अन्न सुरक्षा मानकांनुसार असावा. स्वयंपाकगृह व भांड्यांची स्वच्छता, अन्नधान्याची योग्य साठवणूक, स्वच्छ पाण्याचा वापर तसेच शिजविलेल्या अन्नाची सुरक्षित हाताळणी याबाबत मुख्याध्यापकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांनी केले. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि शिक्षण…

Read More

‘स्वच्छ परिसर अन‌् निरोगी समाज’चा संदेश:चांदवड येथील होमिओपॅथिक महाविद्यालयातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन‎

स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जागृती आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने श्रीमती के. बी. आबड होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटतर्फे दि. १ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत स्वच्छता अभियान महिना विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अभियानादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीबाबत जनजागृती केली. या अभियानांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांनी…

Read More

Demand for space for Sambhaji Maharaj’s statue in Phulambri

फुलंब्री शहरामधील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात धर्मवीर संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निवेदन आमदार सुहास शिरसाट यांनी सोमवार रोजी मुंबई येथे मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना दिल . फुलंब्री शहरामध्ये विविध महापुरुषांचे पुतळे उभारावे, यासाठी सुहास शिरसाट यांनी अनेक वेळा पुढाकार घेतला आहे. फुलंब्री शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज,…

Read More

ट्रकने अचानक वळण घेतल्याने ‎आयशरची धडक; चालकाचा मृत्यू‎:धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा येथील घटना, अर्धा तास वाहतूक ठप्प

पाचोड भंगार घेऊन जाणाऱ्या आयशरने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने आयशर चालकाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना धुळे-सोलापूर महामार्गावर मुरमा शिवारात सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघात घडताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी आयशर चालकाला बाहेर काढून रुग्णवाहकेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर मार लागल्याने उपचारदरम्यान त्याचा मृत्यू…

Read More

दुसऱ्या श्रावणी सोमवारी 80 हजार भाविक घृष्णेश्वराच्या चरणी लीन:पहाटेपासून रांगा, विश्वस्तांच्या सुरेख नियोजनामुळे होते एक तासात दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात आज श्रावणातील दुसऱ्या सोमवारी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. पहिल्या सोमवारप्रमाणेच दुसऱ्या सोमवारीही दर्शनासाठी रविवार रात्रीपासूनच भाविकांनी वेरूळ गावात येण्यास सुरुवात केली होती. . मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे ब्रह्ममुहूर्तावरच दर्शन रांगेला सुरुवात करण्यात आली. श्रावण महिन्याची तयारी गेल्या महिनाभरापासून सुरु असून, रविवार सायंकाळपासूनच पोलिस प्रशासन…

Read More

खुलताबाद येथे ‘पैरहन मुबारक’ जियारतची तयारी पूर्ण:12 लाख भाविक येण्याचा अंदाज, 25 ऑगस्टच्या रात्री 9 वाजेपासूनच जियारत सुरू होईल‎

ईद-ए-मिलादुन्नबी व हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खुलताबाद येथील ऐतिहासिक दरगाह हजरत ख्वाजा जैनोद्दीन शिराजी येथे पवित्र पैरहन मुबारक (पवित्र पोशाक) च्या जियारतची तयारी पूर्ण झाली आहे. या वर्षी सुमारे १० ते १२ लाख भाविक जियारतसाठी येण्याचा अंदाज दरगाहचे अध्यक्ष शरफोद्दीन मोहम्मद रमजानी यांनी व्यक्त केला आहे. हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांचा हा पवित्र पोशाक गेल्या…

Read More