Headlines

"राजकमल उड्डाणपुलाचा खोळंबा; संथ कामावरून काँग्रेस आक्रमक:शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचा ठपका‎

रेल्वे स्टेशन ते राजकमल चौक उड्डाणपुल बंद असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील ट्रॅफिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. मात्र जनप्रतिनिधी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे एकूणच चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ८ रोजी अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम…

Read More

नगर परिषदेच्या वतीने 256 प्रगणकांना प्रशिक्षण:अचलपूर-परतवाडा शहरात जनगणनेची तयारी, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन‎

भारतीय जनगणना २०२७ च्या अनुषंगाने अचलपूर नगर परिषदेच्या वतीने अचलपूर-परतवाडा शहरातील जनगणना प्रक्रिया सुरळीत व अचूक पार पाडण्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली असून, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या २५६ प्रगणकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. जनगणना ही देशाच्या विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जात असल्याने प्रशासनाने यासाठी काटेकोर नियोजन सुरू केले आहे. नुकतेच छत्रपती शिवाजी…

Read More

प्रगती:हातरुण ग्रामपंचायतीमध्ये नोंदींसह विकासकामांची पाहणी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत माेहिम

बाळापूर तालुक्यातील हातरुण ग्राम पंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांची समीक्षा करण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या निरीक्षण समितीने भेट दिली. या भेटीदरम्यान समितीने ग्रामपंचायत कार्यालयातील ऑफलाइन व ऑनलाइन नोंदींची सखोल तपासणी केली. गावामध्ये प्रत्यक्ष राबविण्यात आलेल्या विकासकामांची पाहणी केली. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पंचायत समितीकडून आलेल्या या निरीक्षण समितीत अध्यक्ष एच. बी. गौतम( गट…

Read More

स्पॅम कॉल-खराब नेटवर्कसारख्या तक्रारी 15 दिवसांत निकाली काढा:अन्यथा 50 लाख दंड, TRAI ने तक्रार निवारणाचा मसुदा सादर केला

दूरसंचार नियामक ट्रायने टेलिकॉम कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याची तयारी केली आहे. स्पॅम, नको असलेले, फसवणुकीचे कॉल आणि मोबाईल सेवेच्या गुणवत्तेशी संबंधित तक्रारी आता त्यांना 24×7 ऐकाव्या लागतील. तक्रारींचे निवारण करण्यास 15 दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास कंपन्यांवर जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. या बाबी टेलिकॉम ग्राहक तक्रार निवारण (चौथी सुधारणा) विनियम-2026 च्या मसुद्याचा भाग…

Read More

महिला संघटनांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल बहिणींना सहकार्य करावे- ज्योती राठी:विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संगठनचा पदग्रहण साेहळा उत्साहात साजरा‎

सामाजिक संस्था समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतात. महिला संघटनांचे योगदान मोठे आहे. विशेषत: आर्थिकदृष्ट्या कमकुवत बहिणींना महिला संघटनांनी सहकार्य करून, समाजातील एका वर्गाला प्रगतीकडे घेऊन जावे, असे मार्गदर्शन अखिल भारतीय माहेश्वरी महिला संगठनच्या अध्यक्षा ज्योती राठी यांनी केले. विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संगठनच्या एकादश सत्राचा शानदार शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दशम सत्राची समाप्ती आणि…

Read More

प्रा. विजय आठवले यांना पीएचडी पदवी:जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीवर प्रकाशझाेत‎

जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळ बुलंद करण्यासाठी संघर्ष करणारे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय विश्वनाथ आठवले यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने आचार्य (पीएच डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ संतोष बनसोड यांच्या मार्गदर्शनात हा शोधप्रबंध सादर करण्यात आला होता. प्रा. आठवले यांच्या संशोधनाचा…

Read More

न्यू इंग्लिश हायस्कूलचा 90 टक्के निकाल; प्रफुल्ल चव्हाण सर्वप्रथम, शाळेतील विद्यार्थ्यांनी क्री डा क्षेत्रातही मारली बाजी‎

न्यू इंग्लिश हायस्कूलच्या एकूण ४३ विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबात शालेय क्रीडांगणावर नियमित सराव करून क्रीडा क्षेत्रात विभागीय व राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करत क्रीडा गुण सवलतीचे अतिरिक्त गुण मिळवले. प्रीती काकडे ही शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेत विदर्भातूत प्रथम मेरिट व महाराष्ट्रातून १६ वी मेरी आली होती. यशस्वी विद्यर्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अॅड . राजेश्वर देशपांडे तसेच…

Read More

weather up bihar rain rajasthan MP Maharashtra gujarat heatwave himachal jammu Kashmir snowfall

Marathi News National Weather Up Bihar Rain Rajasthan MP Maharashtra Gujarat Heatwave Himachal Jammu Kashmir Snowfall भोपाळ/लखनऊ/जयपूर/पाटणा39 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थानमध्ये शुक्रवारी पाऊस आणि गारपीट झाली. तर मध्य भारतात पुन्हा तीव्र उष्णता जाणवू लागली आहे. बिहारमधील पाटणासह 7 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी जोरदार पाऊस आणि वादळ आले….

Read More

उशीरा जाग:मोहोळ येथे महामार्गावर ट्रक पलटी, वाहतूक ठप्प‎, मोहोळमध्ये महामार्ग प्राधिकरणाचा गलथान कारभार

प्रतिनिधी | मोहोळ मोहोळ-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बडीशेपची वाहतूक करणारा ट्रक (क्र. टीएन ८८ ए ९३५८) शुक्रवारी (दि. ८ मे) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बॅरिकेट्सवरून पलटी झाला. या अपघातामुळे मोहोळ सर्विस रोडवर एसटी बससह मालवाहतूक गाड्यांची मोठी कोंडी झाली होती. मात्र, एनएचएआय कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने न पाहिल्याने हा ट्रक दिवसभर रस्त्यावरच पडून होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी…

Read More

उजनी कालव्यावरील पादचारी पूल दुरुस्ती काम निकृष्ट:शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, तीन महिन्यांपूर्वीची डागडुजी उखडली; लोखंडी पुलाऐवजी भक्कम सिमेंट पुलाची मागणी

पापरी (ता. मोहोळ) येथील उजनी डाव्या कालव्यावरील पादचारी पुलाची तीन-चार महिन्यांपूर्वी केलेली दुरुस्ती निकृष्ट झाल्याने हा पूल पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक बनला आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थी, शेतकरी व दूध व्यावसायिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत अ . पापरी येथील टेकळे वस्ती भागातून १९७८ मध्ये मुख्य उजनी डावा कालवा गेला आहे. कालव्याच्या पलीकडे शेतकऱ्यांच्या जमिनी असल्याने…

Read More