"राजकमल उड्डाणपुलाचा खोळंबा; संथ कामावरून काँग्रेस आक्रमक:शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचा ठपका
रेल्वे स्टेशन ते राजकमल चौक उड्डाणपुल बंद असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील ट्रॅफिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. मात्र जनप्रतिनिधी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे एकूणच चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ८ रोजी अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम…