Headlines

विचार बदला, तरच वर्तन बदलेल- आदर्शऋषीजी महाराज:700 चिमुकल्यांनी गिरवले संस्कारांचे धडे, धर्म आणि विज्ञानाची अनोखी सांगड‎

मुलांनी केवळ ज्ञानी होण्यापेक्षा, प्राप्त केलेले ज्ञान आचरणात आणणे अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमचे विचार बदलतात, तेव्हा तुमचे वर्तन आपोआप सकारात्मक होते, असे प्रतिपादन पूज्य आदर्श ऋषीजी महाराज यांनी केले. श्री तिलोक रत्न धार्मिक परीक्षा बोर्डाच्या वतीने आयोजित ‘आनंद बालसंस्कार शिबिरा’च्या सांगता प्रसंगी ते बोलत होते. १ ते ६ मे दरम्यान रंगलेल्या या शिबिरात नगरसह…

Read More

पब्लिक पार्कच्या उभारणीसाठी निधी देणार:पालकमंत्री विखे,‎नेहरू मार्केटच्या‎ इमारतीचे भूमिपूजन‎

शहर वेगाने बदलत आहे. मात्र, मूळ शहरातील जुन्या पाऊलखुणा तशाच दिसत आहेत. शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे. नवीन नगर विकसित होत असताना जुन्या शहराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नागरिकांच्या गरजा वाढत आहेत व बदलती आहेत. त्यानुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे सांगत महापालिकेने शहराभोवती पब्लिक पार्कची उभारणी करावी. त्यातून शहराच्या सौंदर्यात भर पडेल व…

Read More

हट्टी गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट; दूषित पाण्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर:दोन विहिरींमध्ये पाणी असूनही गावाला दहा दिवसांआड पाणीपुरवठा‎

एकीकडे उन्हाचा तीव्र वाढता कडाका आणि दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई यामुळे हट्टी गावातील नागरिकांचे हाल होत आहेत. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन विहिरींमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असतानाही ग्रामस्थांना तब्बल दहा ते बारा दिवसांनी पाणी मिळत असल्या . गावात पुरेसे पाणी उपलब्ध असूनही नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना टँकरचे विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. आर्थिक परिस्थिती…

Read More

देशात 70 वर्षांत 20 लाख अपहरण:यापैकी 11 लाख एका दशकातच, एनसीआरबी गुन्हेगारीतील वाटा 3 पटीने वाढला

भारतात अपहरण आणि जबरदस्तीने पळवून नेण्याच्या घटना गेल्या दशकात अनपेक्षितपणे वाढल्या आहेत. अलीकडेच भोपाळमध्ये एका आयएएस अकादमीच्या संचालिकेच्या अपहरणाच्या आणि 1.89 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणामुळे देशातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिकृत आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, 1953 ते 2024 या वर्षांदरम्यान देशात एकूण 20 लाखांहून अधिक अशी प्रकरणे नोंदवली गेली. धक्कादायक बाब म्हणजे, या सात दशकांतील…

Read More

विकासाचा खरा जीडीपी हा कृषी, गावांमध्येच:कृषी विकास संस्थेचे अमितकुमार नाफडे यांचे मत‎

कोविड काळात बळीराजाने जगाला तारले. आपल्या विकासाचा खरा जीडीपी हा कृषी आणि गावांमध्येच आहे. म्हणूनच ग्रामीण भारत थांबला तर देश थांबेल. म्हणून शहरांप्रमाणेच गावांच्या विकासाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. पाण्याचे दुर्भिक्ष, स्थलांतर आणि त्यामुळे निर्माण होणारी मजूरटंचाई या समस्यांनी ग्रामीण भारत होरपळत आहे. त्यातुन बळीराजाला बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे. असे मत बुलढाणा…

Read More

Sai Pallavi Birthday Interesting Facts; Ramayana Sita

13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या रामायणमध्ये माता सीतेच्या भूमिकेत दिसणारी साई पल्लवी आज 34 वर्षांची झाली आहे. साई पल्लवी एकेकाळी एका डान्स रिॲलिटी शोमधील एक सामान्य स्पर्धक होती. लहानपणी ती कंगना रनोटच्या चित्रपटात ज्युनियर आर्टिस्ट म्हणूनही दिसली होती. आज तिच्या कौशल्याने आणि साधेपणाने साई पल्लवी दक्षिणेकडील टॉप अभिनेत्रींमध्ये समाविष्ट…

Read More

मनमाडला गुणवंतांमध्ये मुलींनी राखले वर्चस्व:केंद्राचा निकाल 90 तर शहरातील सहा विद्यालयांचा निकाल 100 टक्के; पूजा कुशवाह केंद्रात प्रथम‎

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ८) ऑनलाईन जाहीर झाला असून मनमाड केंद्राचा एकूण निकाल ९० टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात मुलींनी उल्लेखनीय यश मिळवत गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये बाजी मारली . सेंट झेवियर्स हायस्कूलमधील पूजा मुकुंद कुशवाह हिने ९६.२० टक्के गुण मिळवत केंद्रात अव्वल स्थान पटकावले. के. आर. टी….

Read More

कळवणमध्ये जनगणना प्रशिक्षण पूर्ण; कर्मचारी फिल्ड वर्कसाठी सज्ज:41 प्रशिक्षणार्थींचा सहभाग; अचूक माहिती संकलनावर समन्वयकांचा भर‎

भारत सरकारच्या आगामी जनगणना अभियानाच्या पार्श्वभूमीवर कळवण नगरपंचायतीअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षक व प्रगणकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले. ५, ६ आणि ७ मे या कालावधीत पार पडलेल्या या प्रशिक्षणानंतर आता संबंधित कर्मचारी प्रत्यक्ष जनगणना कार्यासाठी सज्ज झाले आहेत. या प्रशिक्षण सत्रात फिल्ड ट्रेनर यांनी जनगणनेची कार्यपद्धती, माहिती संकलन प्रक्रिया, ऑनलाइन प्रणालीचा प्रभावी वापर…

Read More

सुवेंदु आज बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, PM उपस्थित राहणार:कोलकाता परेड ग्राउंडमध्ये 1 लाख लोक येतील; वॉटरप्रूफ तंबू, झालमुडी स्टॉल; सुरक्षेसाठी 4000 जवान

सुवेंदु अधिकारी आज दुपारी 11 वाजता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. शपथविधी सोहळा कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर आयोजित केला जाईल. या सोहळ्यात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह एनडीएचे अनेक मोठे नेते उपस्थित राहतील. शुक्रवारी कोलकाता येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित आमदार दलाच्या बैठकीत सुवेंदु यांची नेतेपदी निवड करण्यात आली. बैठकीनंतर अमित शहा यांनी त्यांच्या…

Read More

संबळाच्या ठेक्यात देवी-म्हसोबाची सोंगे काढून आखाडी उत्सवाची सांगता:चांदवडच्या आखाडी उत्सवात घडले लोकसंस्कृतीचे जिवंत दर्शन

येथील गाडगेबाबा चौक (बहादूरपुरा) येथे श्री संत गाडगेबाबा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित आखाडी (देवी उत्सव) उत्सवात उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेली देवीमाता व म्हसोबा महाराज ही मानाची सोंगे काढून शुक्रवारी (दि. ८) पहाटे आखाडी उत्सवाची उत्साहात सांगता झाली . ऐतिहासीक ओळख असलेल्या चांदवड शहराने धार्मिक उत्सवांची परंपरा कायम ठेवत लोकसंस्कृती जोपासली आहे. शहरातील गाडगेबाबा चौक येथे…

Read More